शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

केंद्राच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचण्यासाठी नियोजन करावे – डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: November 23, 2023 18:22 IST

Thane News: ठाणे शासकीय योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत यासाठी 'विकसित भारत संकल्प यात्रा' ही देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून आखण्यात आली आहे.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे - शासकीय योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत यासाठी 'विकसित भारत संकल्प यात्रा' ही देशव्यापी मोहिम केंद्र शासनाकडून आखण्यात आली आहे. १५ नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही' विकसित भारत संकल्प यात्रा' मोहिम २६ जानेवारी २०२४ पर्यत सुरु राहणार आहे. या मोहिमेतील सर्व योजना या तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोहचाव्यात यासाठी ठाणे महापालिकेने महापालिका क्षेत्रातील तळागाळातील लोकांसाठी जनजागृती करणे, सोशल मिडीया उदा. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या माध्यमातून या योजनांची माहिती पोहचविणे व यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहभागी करुन घ्यावे असे केंद्र शासनास अभिप्रेत आहे.

गुरूवारी ठाणे महानगरपालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष, माजी खा. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, वर्षा दिक्षीत, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे, उपनगरअभियंता विकास ढोले, घनकचरा विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी शिंदे, यांच्यासह ठाणे महापालिकेच्या विविध विभागाचे संबंधित अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या योजनांची माहिती करुन घेण्यासाठी आज ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही मोहीम देशभरात राबविली जाणार आहे. प्रत्येक गरजू भारतीय लाभार्थ्याचा शोध घेवून सर्व लाभार्थ्यापर्यंत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ पोहोचविणे गरजेचे आहे.

या मोहिमेद्वारे प्रत्येक नागरिकाचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी सर्व स्तरांवरुन प्रयत्न केले जाणार आहेत. या योजनांमध्ये ठाणे महानगरपालिका अंतर्गतच्या 'पीएम स्वनिधी योजना, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, पीएम ई- बस आणि अमृत योजना' आदी सुरू असलेल्या योजनांची सद्यस्थिती व माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. सद्यस्थितीत सोशल मिडीया हे नागरिकांपर्यत पोहचण्याचे प्रभावी माध्यम असल्याने विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेची माहिती व सहभाग घेण्याचे आवाहन जर फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून केले तर याचा फायदा नागरिकांना नक्की होण्यास मदत होणार आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातही ठाणेकरांचे योगदान हे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या माध्यमातूनही जनजागृती करण्यात यावी असेही डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी नमूद केले.

टॅग्स :thaneठाणे