शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात गोवर लसीकरण वाढविण्यासाठी पालिका घेणार धर्मगुरुंची मदत

By अजित मांडके | Updated: November 29, 2022 17:10 IST

ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला 54 जणांना गोवरची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

ठाणे  - गोवरला रोखण्यासाठी ठाणो महापालिकेने पावले उचलली असली तरी देखील ठाण्यातील काही भागातील नागरीकांमध्ये आजही गैरसमज असल्याचे दिसत आहे. लसीकरणाबाबत नागरीकांमध्ये अफवा असल्याने ते लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता महापालिकेने यावर धर्मगुरुंची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार मुंब्रा व इतर काही भागात धर्मगुरुंच्या माध्यमातून जनजागृती करुन लसीकरण आणि सर्व्हेला सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.

ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला 54 जणांना गोवरची लागण झाल्याचे आढळून आले आहे. गोवरला रोखण्यासाठी महापालिकेने मुंब्रा व इतर भागात सर्व्हे सुरू केला आहे. मात्र मुंब्य्रात सर्व्हे करण्यासाठी जाणाऱ्या महापालिकेच्या पथकाला अतिशय वाईट अनुभव येत असल्याचे दिसून आले आहे. तोंडावर दरवाजा बंद करणे, लसीकरण आज नको उद्या या असे सांगून दुसऱ्या दिवशी घराला टाळे लावून बाहेर निघून जाणो असे काही प्रकार घडले आहेत. त्यामुळे सव्र्हे आणि लसीकरण करायचे कसे असा पेच महापालिकेच्या पथकांना सतावू लागला आहे.

आता यावर उपाय म्हणून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागाला हाताशी धरुन या भागातील धर्मगुरुंची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार धर्मगुरुंच्या माध्यमातून येथील नागरीकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर लसीकरण आणि सव्र्हेची मोहीम वेगाने सुरु केली जाईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच येथीळ शाळांमध्ये देखील जनजागृती केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्यानुसार शाळेतील शिक्षकांनी एखाद्या मुलाला ताप आला असेल तर त्याला लागलीच घरी पाठविणो गरजेचे असल्याचे पालिकेने सांगितले आहे. तसेच या विषयीची माहिती महापालिकेला कळविणो गरजेचे असल्याचे सांगितले आहे. कोरोना काळात देखील अशाच पध्दतीने महापालिकेने धर्मगुरुंची मदत घेतली होती. त्यानुसार त्यावेळेस ज्या पध्दतीने यश आले त्याच पध्दतीने आता देखील यश येईल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :thaneठाणे