शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात प्रहार जनशक्तीचे ठिय्या आंदोलन खोदलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत पालिका अनभिज्ञ

By सदानंद नाईक | Updated: February 20, 2024 19:03 IST

उल्हासनगरात भुयारी गटार योजनेतून संपूर्ण शहरात रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे.

उल्हासनगर : भुयारी गटारीसाठी खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने, शहरातील प्रदूषणात वाढ झाल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे चौकात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. महापालिका उपायुक्त सुभाष जाधव यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले असून यावर लवकर तोडगा न काढल्यास आयुक्तांच्या दालनात पुढील आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे स्वप्नील पाटील यांनी दिला आहे. 

उल्हासनगरात भुयारी गटार योजनेतून संपूर्ण शहरात रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यापासून रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. मात्र खोदलेले रस्ते दुरुस्त केले नसल्याने, सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. यातून मुलांना व वृद्धांना श्वसनाचा त्रास होत असल्याचा आरोप विविध राजकीय पक्षाच्या वतीने केला आहे. शहराचे प्रदूषण सरासरी २०० च्या पुढे गेले असल्याने, नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाल्याचा आरोप प्रहार जनशक्तीचे प्रधान पाटील यांनी केला. महापालिकेच्या वतीने रस्त्याने मशिनद्वारे पाणी मारण्यात येते. मात्र तात्पुरत्या उपाययोजनेवर टीका होत आहे. 

शहरात खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने, धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन प्रदूषणात वाढ झाली. या निषेधार्थ प्रहार जनशक्तीचे स्वप्नील पाटील, प्रधान पाटील, सामाजिक संघटनेचे शैलेश तिवारी आदींच्या नेतृत्वाखाली धर्मवीर आनंद दिघे चौकात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाल्याचा आरोप स्वप्नील पाटील यांनी केला. महापालिकेने याबाबत उपाययोजना केला नसल्यास, आयुक्त दालना घुसून आंदोलन करण्याचा इशारा दिली आहे. 

चौकट एमएमआरडीए सोबत चर्चा....उपायुक्त सुभाष जाधव शहरात खोदण्यात आलेल्या रस्त्याची दुरुस्ती टप्प्याटप्प्याने केली जाणार असून याबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती महापालिका उपयुक्त सुभाष जाधव यांनी दिली आहे.

 निकृष्ट कामाचा आरोप शहराची लोकसंख्या ९ लाखा पेक्षा जास्त असून शहरात टाकण्यात येणारे भुयारी गटार पाईप अर्धा फूट, एक फूट व्यासाचे आहेत. इतक्या लहान आकाराच्या पाईपमधून इमारतीचा मैला व सांडपाणी जाणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. यापूर्वीचे गटार पाईप यापेक्षा मोठे असून गटारीचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला. गटारीचे पाईप नव्याने टाकण्यात येत असून चेंबर मात्र जुनेच का? असा प्रश्नही नागरिक व्यक्त केला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर