शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

उल्हासनगरात फाळणीच्या थरारक क्षणांच्या आठवणी, सर्वांच्याच अंगावर आला शहारा

By सदानंद नाईक | Updated: August 15, 2022 17:11 IST

देशाच्या फाळणी वेळी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील तब्बल ९६ हजार निर्वासित नागरिकांना कल्याण शहरा जवळील ब्रिटिशकालीन लष्करी वसाहतीत वसविण्यात आले. शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीवरून या निर्वासितांच्या वस्तीला उल्हासनगर हे नाव देण्यात आले.

सदानंद नाईक -

उल्हासनगर - निर्वासिताचे शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगरमधील टाऊन हॉल येथे १४ ऑगस्ट हा दिवस विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणून पाळण्यात आला. यावेळी फाळणी अनुभवलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी जुन्या आठवणीला उजाळा देताच, जिल्हाधिकारी संजय नार्वेकर यांच्यासह उपस्थितांच्या अंगावरही शहारा उभा राहिला. 

देशाच्या फाळणी वेळी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील तब्बल ९६ हजार निर्वासित नागरिकांना कल्याण शहरा जवळील ब्रिटिशकालीन लष्करी वसाहतीत वसविण्यात आले. शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीवरून या निर्वासितांच्या वस्तीला उल्हासनगर हे नाव देण्यात आले. फाळणीची सर्वाधिक झाळ या नागरिकांना बसली. जमीन जुमला आणि आपले नातेवाईक सोडून हे लोक येथे आले होते. यांमध्ये सर्वाधिक लोक हे सिंधी समाजाचे होते. व्यवसायाभिमुख असलेल्या सिंधी समाजाने आज सर्वच क्षेत्रात नावलौकिक मिळविला. देशाच्या अमृत महोत्सवा निमित्त १४ ऑगस्ट रोजी टाऊन हॉलमध्ये विभाजन विभाषिका दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जेष्ठ नागरिक व स्वातंत्र सेनानी यांचा जिल्हाधिकारी संजय नार्वेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

देशाच्या फाळणीचे थरारक क्षण येथील जेष्ठ नागरिक व स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय सांगू लागताच सर्वांच्याच अंगावर काटा उभा राहिला. जिल्हाधिकारी संजय नार्वेकर यांनी निर्वासित सिंधी समाजाचे कौतुक केले. कार्यक्रमाला आमदार कुमार आयलानी, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त अजीज शेख, उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, तहसीलदार कोमल ठाकूर, आदी उपस्थित होते. 

देशाची फाळणी झाली त्याचा अनुभव असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यावेळी भोगलेल्या वेदनांविषयी आताच्या पिढीला माहिती व्हावी. यासाठी अशा प्रकारचा स्मृती दिन पहिल्यांदाच देशात आणि राज्यात आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले. 

ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर येथे निर्वासीतांची संख्या जास्त असल्याने याठिकाणी हा कार्यक्रम घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. स्वातंत्र्य चळवळीची चेतना जागविण्याचे काम अमृत महोत्सवाच्या माध्यमातून हेत असल्याचे सांगत उल्हासनगरमधील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचे नेहमीच प्राधान्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी आमदार आयलानी यांनी मनोगत व्यक्त केले. फाळणीचा काळ अनुभवलेल्या देविदास जयसवानी आणि मीना रुपचंदानी यांनी आपले अनुभव कथन केले. यावेळी तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय, माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला. उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांनी प्रास्ताविक केले

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनulhasnagarउल्हासनगर