शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भिवंडी शहरातील स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपूल दुरुस्तीनंतर वाहतुकीस खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 21:12 IST

नागरिकांची वाहतूक कोंडीतून झाली सुटका

- नितिन पंडीत 

भिवंडी- दुरुस्ती कामासाठी मागील चार महिन्यांपासून बंद असलेला स्व. राजीव गांधी उड्डाणपूल दुरुस्ती नंतर पुन्हा एकदा वापरात आला असून बुधवारी महापौर प्रतिभा पाटील यांच्या शुभहस्ते उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला . यावेळी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख,उपमहापौर इम्रान वली खान,नगरसेवक हलीम अन्सारी,अर्षद अन्सारी शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड आदी उपस्थित होते . 

२००६मध्ये बनविण्यात आलेला स्व राजीव गांधी उड्डाणपूल ठेकेदाराने कमकुवत बनविल्याने २०१९ मध्ये उड्डाणपुलावर भगदाड पडले होते. त्यामुळे या पुलावरून अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी करण्यात आली होती. या पुलाचे परीक्षण व्हीजेटीआय संस्थेतील तज्ञांनी केल्या नंतर ही बाब समोर आली. त्यांनतर उड्डाणपुलावरील खड्डयांनी रस्त्याची चाळण झाली असताना पालिकेने मागणी केल्याने शासनाकडून ७ कोटी तर अतिरिक्त खर्च म्हणून मनपाने ३ कोटी रुपये असे सुमारे १० कोटी रुपये या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आले आहेत. 

उड्डाणपुलाच्या दुरुस्ती नंतर धामणकर नाका ते वंजारपट्टी नाका या मार्गावरील वाहनांची वाहतूक कोंडी तून सुटका होणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी महापौर प्रतिभा पाटील यांनी दिली असून उड्डाणपूल सध्या हलक्या वाहनांसह दुचाकी वाहनांना खुला करण्यात आला असून तज्ञांचा सल्ला घेऊन त्याचे परीक्षण केल्या नंतरच उड्डाणपूल अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे .

दरम्यान चार महिन्यां नंतर उड्डाणपूल खुला झाला परंतु अवजड वाहतूक सुरू होणार नसल्याने रस्त्यावरील वाहतूक कोंडी तशीच राहणार असून स्व राजीव गांधी व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल हाईट बेरिकेटिंग लावून मोठ्या वाहनांसाठी बंदी घातल्याने या दोन्ही उड्डाणपुलाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला असल्याची प्रतिक्रिया नागरीकांमधून दिली जात आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीthaneठाणे