शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

भिवंडी शहरातील स्वर्गीय राजीव गांधी उड्डाणपूल दुरुस्तीनंतर वाहतुकीस खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 21:12 IST

नागरिकांची वाहतूक कोंडीतून झाली सुटका

- नितिन पंडीत 

भिवंडी- दुरुस्ती कामासाठी मागील चार महिन्यांपासून बंद असलेला स्व. राजीव गांधी उड्डाणपूल दुरुस्ती नंतर पुन्हा एकदा वापरात आला असून बुधवारी महापौर प्रतिभा पाटील यांच्या शुभहस्ते उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला . यावेळी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख,उपमहापौर इम्रान वली खान,नगरसेवक हलीम अन्सारी,अर्षद अन्सारी शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड आदी उपस्थित होते . 

२००६मध्ये बनविण्यात आलेला स्व राजीव गांधी उड्डाणपूल ठेकेदाराने कमकुवत बनविल्याने २०१९ मध्ये उड्डाणपुलावर भगदाड पडले होते. त्यामुळे या पुलावरून अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी करण्यात आली होती. या पुलाचे परीक्षण व्हीजेटीआय संस्थेतील तज्ञांनी केल्या नंतर ही बाब समोर आली. त्यांनतर उड्डाणपुलावरील खड्डयांनी रस्त्याची चाळण झाली असताना पालिकेने मागणी केल्याने शासनाकडून ७ कोटी तर अतिरिक्त खर्च म्हणून मनपाने ३ कोटी रुपये असे सुमारे १० कोटी रुपये या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आले आहेत. 

उड्डाणपुलाच्या दुरुस्ती नंतर धामणकर नाका ते वंजारपट्टी नाका या मार्गावरील वाहनांची वाहतूक कोंडी तून सुटका होणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी महापौर प्रतिभा पाटील यांनी दिली असून उड्डाणपूल सध्या हलक्या वाहनांसह दुचाकी वाहनांना खुला करण्यात आला असून तज्ञांचा सल्ला घेऊन त्याचे परीक्षण केल्या नंतरच उड्डाणपूल अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे .

दरम्यान चार महिन्यां नंतर उड्डाणपूल खुला झाला परंतु अवजड वाहतूक सुरू होणार नसल्याने रस्त्यावरील वाहतूक कोंडी तशीच राहणार असून स्व राजीव गांधी व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल हाईट बेरिकेटिंग लावून मोठ्या वाहनांसाठी बंदी घातल्याने या दोन्ही उड्डाणपुलाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला असल्याची प्रतिक्रिया नागरीकांमधून दिली जात आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीthaneठाणे