शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

उल्हासनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात, सर्वत्र धूळ, खोदलेल्या रस्त्याच्या दुरस्तीला मुहूर्त नाही

By सदानंद नाईक | Updated: February 17, 2024 17:32 IST

उल्हासनगरसाठी ४२३ कोटीच्या भुयारी गटार योजनेला अमृत योजने अंतर्गत मंजुरी मिळाली असून गटाराचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे.

उल्हासनगर : शहरात भुयारी गटारीचे पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते दुरुस्त केले नसल्याने, सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. याप्रकाराने महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग पुन्हा वादात सापडले आहे.

 उल्हासनगरसाठी ४२३ कोटीच्या भुयारी गटार योजनेला अमृत योजने अंतर्गत मंजुरी मिळाली असून गटाराचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. गटारीचे पाईप टाकल्यानंतर खोदलेले रस्ते पक्के दुरुस्त केले जात नसल्याने, सर्वत्र माती व धुळीचे साम्राज्य शहरात निर्माण झाले. खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी महापालिकेची की ठेकेदारांची? असा प्रश्न निर्माण झाला. या धुळीने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून उल्हासनगरचे नाव घेतले जात आहे. खोदलेल्या रस्त्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली आहे. महापालिका बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचे, सुरू असलेल्या कामावर कोणतेही नियंत्रण नसल्याची टीका होत आहे. तसेच भुयारी गटार योजना ब्ल्यूपिंट शिवाय सुरू असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. जुन्या भुयारीगटार पाईप पेक्षा कमी व्यासाचे पाईप टाकले जात असल्याने, भविष्यात योजना फसण्याची शक्यता विविध राजकीय पक्षाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

आरोप-प्रत्यारोप मध्ये सापडलेल्या भुयारी गटार योजनेबाबत आयुक्त अजीज शेख, शहर अभियंता संदीप जाधव व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे सविस्तर माहिती देत नसल्याने, योजना संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्या पैकी एकाही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी ठेकेदारांची आहे. महापालिकेचे प्रमुख म्हणून आयुक्त अजीज शेख यांनी खोदलेले रस्ते दुरस्ती करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला द्या. अशी मागणी होत आहे. 

रस्ता दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारांची

शहरात सुरू असलेल्या भुयार गटार योजनेसाठी खोदलेले रस्ते १८ दिवसात दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदारांची आहे. रस्ते दुरुस्तीची कारवाई केली जाणार आहे. 

परमेश्वर बुडगे  (कार्यकारी अभियंता-पाणी पुरवठा विभाग) 

भुयारी गटार योजनेची चौकशीची मागणी 

शहरात ४२३ कोटीच्या निधीतून भुयारी गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. मात्र टाकण्यात येत असलेल्या अर्धा फुटाच्या आकाराच्या पाईप मधून मैला वाहून जाणार का? असा प्रश्न विविध राजकीय पक्षाचे नेते करीत आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर