शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

मीरारोडच्या शांती नगरमधील फेरीवाल्यांचा पालिका पथकावर हल्ले सुरूच

By धीरज परब | Updated: January 6, 2024 18:22 IST

मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर मधील फेरीवाल्यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या पथकावर हल्ले सुरूच ठेवले असून ४ जानेवारीच्या रात्री १७ ...

मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर मधील फेरीवाल्यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या पथकावर हल्ले सुरूच ठेवले असून ४ जानेवारीच्या रात्री १७ फेरीवाल्यांवर नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेरीवाल्यांचे पालिका पथकावर होणारे हल्ले म्हणजे गुंडगिरी असून त्यांच्या विरोधात पालिकेसह पोलिसांनी देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 

मीरारोडच्या शांती नगर मधील फेरीवाल्यांनी एका वृद्ध दुकानदारास दुचाकी उभी करण्यावरून केलेल्या मारहाणी नंतर स्थानिक दुकानदार व नागरिकां मधील फेरीवाल्यांच्या जाचा बद्दलचा संताप उफाळून आला. तेव्हापासून आजी माजी आमदार, माजी नगरसेवक आदींनी देखील ह्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाईची मागणी चालवली आहे. 

शांती नगर मधील फेरीवाल्यांच्या जाचा बद्दल स्थानिक नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्या आहेत. आंदोलने देखील झाली आहेत. परंतु ह्यातून चालणारे मोठे अर्थपूर्ण कारणामुळे फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नव्हती. पण दुकानदारास मारहाणीच्या घटनेनंतर नागरिक, व्यापारी, आमदार व राजकारणी आदींनी कारवाईची आग्रही मागणी केल्याने पालिका नियमित कारवाई करू लागली आहे. 

महापालिकेवर विविध स्वरूपाचे आरोप करणाऱ्या फेरीवाल्यांनी आपले धंदे लावण्यास सुरवात केली असता तक्रारी होऊन महापालिका सुद्धा प्रतिबंधात्मक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी थोडेफार प्रयत्न करू लागली आहे . त्यातूनच ३ जानेवारी रोजी कारवाईसाठी आलेल्या  प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत सह पालिका कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्यांनी हल्ला चढवला . सरकारी कामात अडथळा आणला. त्या रात्री नया नगर पोलिसांनी अंकित जयस्वाल, महेश जयस्वाल, सुनील रामदास ठक्कर, आयेशा सय्यद, समीर शेख, मुन्वर मिरझा ह्या ६ जणांवर सरकारी एकमत अडथळा आणण्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. 

४ जानेवारी रोजी देखील अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण सह पालिका पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला चढवला. तेथील रुपाली साडी सेंटर जवळ फेरीवाल्यांनी अनधिकृत रित्या जमाव गोळा करून चव्हाण यांच्या सह संबंधित अधिकारी - कर्मचारी यांना विरोध केला. फेरीवाल्यांनी कारवाई बंद पडून अधिकारी - कर्मचारी यांना धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा आणला.गणेश दीनानाथ यादव, अंकित जयस्वाल, महेश जयस्वाल, सुनील रामदास ठक्कर, आयेशा सय्यद, समीर शेख, मुनावर मिरझा ह्या ७ जणांवर व अन्य १० फेरीवाल्यांवर सरकारी एकमत अडथळा आणण्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.