शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडच्या शांती नगरमधील फेरीवाल्यांचा पालिका पथकावर हल्ले सुरूच

By धीरज परब | Updated: January 6, 2024 18:22 IST

मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर मधील फेरीवाल्यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या पथकावर हल्ले सुरूच ठेवले असून ४ जानेवारीच्या रात्री १७ ...

मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर मधील फेरीवाल्यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या पथकावर हल्ले सुरूच ठेवले असून ४ जानेवारीच्या रात्री १७ फेरीवाल्यांवर नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेरीवाल्यांचे पालिका पथकावर होणारे हल्ले म्हणजे गुंडगिरी असून त्यांच्या विरोधात पालिकेसह पोलिसांनी देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 

मीरारोडच्या शांती नगर मधील फेरीवाल्यांनी एका वृद्ध दुकानदारास दुचाकी उभी करण्यावरून केलेल्या मारहाणी नंतर स्थानिक दुकानदार व नागरिकां मधील फेरीवाल्यांच्या जाचा बद्दलचा संताप उफाळून आला. तेव्हापासून आजी माजी आमदार, माजी नगरसेवक आदींनी देखील ह्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाईची मागणी चालवली आहे. 

शांती नगर मधील फेरीवाल्यांच्या जाचा बद्दल स्थानिक नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्या आहेत. आंदोलने देखील झाली आहेत. परंतु ह्यातून चालणारे मोठे अर्थपूर्ण कारणामुळे फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नव्हती. पण दुकानदारास मारहाणीच्या घटनेनंतर नागरिक, व्यापारी, आमदार व राजकारणी आदींनी कारवाईची आग्रही मागणी केल्याने पालिका नियमित कारवाई करू लागली आहे. 

महापालिकेवर विविध स्वरूपाचे आरोप करणाऱ्या फेरीवाल्यांनी आपले धंदे लावण्यास सुरवात केली असता तक्रारी होऊन महापालिका सुद्धा प्रतिबंधात्मक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी थोडेफार प्रयत्न करू लागली आहे . त्यातूनच ३ जानेवारी रोजी कारवाईसाठी आलेल्या  प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत सह पालिका कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्यांनी हल्ला चढवला . सरकारी कामात अडथळा आणला. त्या रात्री नया नगर पोलिसांनी अंकित जयस्वाल, महेश जयस्वाल, सुनील रामदास ठक्कर, आयेशा सय्यद, समीर शेख, मुन्वर मिरझा ह्या ६ जणांवर सरकारी एकमत अडथळा आणण्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. 

४ जानेवारी रोजी देखील अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण सह पालिका पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला चढवला. तेथील रुपाली साडी सेंटर जवळ फेरीवाल्यांनी अनधिकृत रित्या जमाव गोळा करून चव्हाण यांच्या सह संबंधित अधिकारी - कर्मचारी यांना विरोध केला. फेरीवाल्यांनी कारवाई बंद पडून अधिकारी - कर्मचारी यांना धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा आणला.गणेश दीनानाथ यादव, अंकित जयस्वाल, महेश जयस्वाल, सुनील रामदास ठक्कर, आयेशा सय्यद, समीर शेख, मुनावर मिरझा ह्या ७ जणांवर व अन्य १० फेरीवाल्यांवर सरकारी एकमत अडथळा आणण्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.