शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

ठाणे स्टेशन आणि रेल्वे पुलावरील फेरीवाले गायब

By अजित मांडके | Updated: October 6, 2022 16:08 IST

ठाणे रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा वाढताना दिसून आली आहे. रेल्वे पुलावरुन चालतांना बाकडय़ाचा अडथळा वाटल्याने फेरीवाल्याला विचारणा करणाऱ्या ५२ वर्षीय महिलेला फेरीवाल्यांच्या टोळकीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

ठाणे - ठाणे स्टेशन फेरीवाला मुक्त राहील असा दावा महापालिकेकडून केला जात होता. मात्र या फेरीवाल्यांचे प्रस्थ पुन्हा या भागात वाढल्याचे दिसून आले आहे. याच फेरीवाल्यांचा फटका एका ५२ वर्षीय महिलेला बसला. फेरीवाल्यांकडून त्यांना मारहाण झाल्याची घटना पुढे आली. या संदर्भातील वृत्त प्रसिध्द होताच, स्टेशन परिसरातील आणि रेल्वे पुलावरील फेरीवाले गायब झाल्याचे दिसून आले आहे. पालिकेने आता रेल्वे पोलिसांकडून या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याचे बोलले जात आहे. मात्र फेरीवाल्यांना पाठीशी घातले जात असल्याने पुन्हा त्यांची मजल वाढल्याचेच दिसून आले आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा वाढताना दिसून आली आहे. रेल्वे पुलावरुन चालतांना बाकडय़ाचा अडथळा वाटल्याने फेरीवाल्याला विचारणा करणाऱ्या ५२ वर्षीय महिलेला फेरीवाल्यांच्या टोळकीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरानंतर दोन फेरीवाल्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र फेरीवाल्यांचे प्रस्थ पुन्हा ठाण्यात वाढतांना दिसत आहे. कोरोनाच्या काळात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्तांना आपली दोन बोटे गमवावी लागली होती. त्यानंतर आणखी एका घटनेत फेरीवाल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांवर चाकू घेऊन धावून जाण्याचा प्रयत्न केला होता. 

घटनेनंतर फेरीवाल्यांवर पालिकेकडून कारवाई केली गेली होती. तसेच स्टेशन परिसर देखील फेरीवालामुक्त करण्यात आला होता. परंतु आता नवरात्रोत्सवाच्या काळात स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचे प्रस्थ पुन्हा वाढल्याचे दिसून आले आहे. सॅटीसखाली आणि वरील बाजूस देखील फेरीवाल्यांनी रस्ते अडविल्याचे चित्र दिसून आले आहे. पालिका कारवाई करण्यासाठी येत असतांना त्याची माहिती अगावू स्वरुपात या फेरीवाल्यांना दिली जात असल्याने फेरीवाल्यांना पाठीशीच घालण्याचा प्रकार आजही शहरात सुरु असल्याचेच दिसत आहे.

सर्वसामान्य ठाणेकरांनाही त्याचा फटका आता बसू लागला आहे. त्यातूनच महिलेवर फेरीवाल्यांच्या टोळक्याने हल्ला केल्याचे दिसून आले आहे. रविवारी ही घटना घडल्यानंतर दोघांना अटक करण्यात आले असले तरी देखील फेरीवाल्यांचा माज मात्र काही कमी झाल्याचे दिसत नाही. आता या संदर्भातील वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर अचानक या परिसरातील फेरीवाले गायब झाले असून नागरीकांना येथून चालण्याचा मार्ग सुकर झाला आहे. गुरुवारी सॅटीसखाली काही तुरळक फेरीवाले दिसत होते. मात्र रेल्वेच्या पुलावर एकही फेरीवाला दिसून आला नाही. परंतु केवळ हल्ला झाल्यावरच ही कारवाई फेरीवाल्यांवर होणार आहे का? त्यांच्यावर कायमचा अंकुश कोण बसविणार असा सवाल आता ठाणेकर करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणे