शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

ठाणे स्टेशन आणि रेल्वे पुलावरील फेरीवाले गायब

By अजित मांडके | Updated: October 6, 2022 16:08 IST

ठाणे रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा वाढताना दिसून आली आहे. रेल्वे पुलावरुन चालतांना बाकडय़ाचा अडथळा वाटल्याने फेरीवाल्याला विचारणा करणाऱ्या ५२ वर्षीय महिलेला फेरीवाल्यांच्या टोळकीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

ठाणे - ठाणे स्टेशन फेरीवाला मुक्त राहील असा दावा महापालिकेकडून केला जात होता. मात्र या फेरीवाल्यांचे प्रस्थ पुन्हा या भागात वाढल्याचे दिसून आले आहे. याच फेरीवाल्यांचा फटका एका ५२ वर्षीय महिलेला बसला. फेरीवाल्यांकडून त्यांना मारहाण झाल्याची घटना पुढे आली. या संदर्भातील वृत्त प्रसिध्द होताच, स्टेशन परिसरातील आणि रेल्वे पुलावरील फेरीवाले गायब झाल्याचे दिसून आले आहे. पालिकेने आता रेल्वे पोलिसांकडून या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याचे बोलले जात आहे. मात्र फेरीवाल्यांना पाठीशी घातले जात असल्याने पुन्हा त्यांची मजल वाढल्याचेच दिसून आले आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांची मुजोरी पुन्हा एकदा वाढताना दिसून आली आहे. रेल्वे पुलावरुन चालतांना बाकडय़ाचा अडथळा वाटल्याने फेरीवाल्याला विचारणा करणाऱ्या ५२ वर्षीय महिलेला फेरीवाल्यांच्या टोळकीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरानंतर दोन फेरीवाल्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र फेरीवाल्यांचे प्रस्थ पुन्हा ठाण्यात वाढतांना दिसत आहे. कोरोनाच्या काळात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्तांना आपली दोन बोटे गमवावी लागली होती. त्यानंतर आणखी एका घटनेत फेरीवाल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांवर चाकू घेऊन धावून जाण्याचा प्रयत्न केला होता. 

घटनेनंतर फेरीवाल्यांवर पालिकेकडून कारवाई केली गेली होती. तसेच स्टेशन परिसर देखील फेरीवालामुक्त करण्यात आला होता. परंतु आता नवरात्रोत्सवाच्या काळात स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचे प्रस्थ पुन्हा वाढल्याचे दिसून आले आहे. सॅटीसखाली आणि वरील बाजूस देखील फेरीवाल्यांनी रस्ते अडविल्याचे चित्र दिसून आले आहे. पालिका कारवाई करण्यासाठी येत असतांना त्याची माहिती अगावू स्वरुपात या फेरीवाल्यांना दिली जात असल्याने फेरीवाल्यांना पाठीशीच घालण्याचा प्रकार आजही शहरात सुरु असल्याचेच दिसत आहे.

सर्वसामान्य ठाणेकरांनाही त्याचा फटका आता बसू लागला आहे. त्यातूनच महिलेवर फेरीवाल्यांच्या टोळक्याने हल्ला केल्याचे दिसून आले आहे. रविवारी ही घटना घडल्यानंतर दोघांना अटक करण्यात आले असले तरी देखील फेरीवाल्यांचा माज मात्र काही कमी झाल्याचे दिसत नाही. आता या संदर्भातील वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर अचानक या परिसरातील फेरीवाले गायब झाले असून नागरीकांना येथून चालण्याचा मार्ग सुकर झाला आहे. गुरुवारी सॅटीसखाली काही तुरळक फेरीवाले दिसत होते. मात्र रेल्वेच्या पुलावर एकही फेरीवाला दिसून आला नाही. परंतु केवळ हल्ला झाल्यावरच ही कारवाई फेरीवाल्यांवर होणार आहे का? त्यांच्यावर कायमचा अंकुश कोण बसविणार असा सवाल आता ठाणेकर करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणे