शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

मीरा भाईंदरच्या नागरिकांना १० तास उशिराने व कमी मिळणार पाणी

By धीरज परब | Updated: April 15, 2023 18:05 IST

- एमआयडीसीच्या जलवाहिनीचा एअर व्हॉल्व उडाल्याने मीरा भाईंदर शहराचा पाणी पुरवठा १० तास बंद झाला .

मीरारोड - एमआयडीसीच्या जलवाहिनीचा एअर व्हॉल्व उडाल्याने मीरा भाईंदर शहराचा पाणी पुरवठा १० तास बंद झाला . त्यामुळे नागरिकांना १० तास उशिरा व कमी दाबाने पाणी मिळणार आहे . 

मीरा भाईंदर शहरास स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) कडून पाणी पुरवठा करण्यात येतो. शनिवारी सकाळी बदलापूर येथील एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनी वरील एअर व्हॉल्व उडाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाऊ लागले . त्यामुळे एमआयडिसीने मीरा भाईंदर चा पाणी पुरवठा सकाळी ६ वाजल्या पासून बंद करण्यात आला . एअर व्हॉल्व च्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून दुपारी ४ च्या सुमारास साकेत पंपिंग येथून पाणी पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला . 

१० तास शहराचा पाणी पुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांना देखील नियोजित तासाने पाणी पुरवठा न होता साधारण  १० तास उशिराने पाणी मिळेल व कमी दाबाने मिळेल . स्टेम प्राधिकरणाचे पाणी सुरु राहणार असले तरी शहरातील पाणी पुरवठा पूर्ववत होण्यास दोन दिवस जाणार असल्याने नागरिकांनी पाणी काटकसरीने व जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी केले आहे .