शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विविध विकास कामांच्या भूमिपुजनासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा; सरनाईकांची CM शिंदेंकडे मागणी

By अजित मांडके | Updated: March 5, 2024 15:49 IST

लोकसभा-२०२४ च्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आपण आपली वेळ द्यावी अशी मागणीही त्यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

ठाणे :  नागला बंदर येथील खाडी किनारा विकसित करणे, पोखरण रोड नं. २ येथील लक्ष्मी-नारायण रेसिडेन्सीच्या सुविधा भुखंडावर मराठा भवन उभारणे, लिटील फ्लॉवर शाळेसमोरील आरक्षित जानकादेवी मैदानाला कुंपन भिंत व लेव्हलिंग करून सुशोभिकरण करणे, शिवाईनगर येथील कै. सुधाकर चव्हाण इमारतीचे भुमिपूजन करणे आदींसह इतर विकास कामांच्या भुमीपुजन करण्याच्या कामासंदर्भात मंगळवारी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची वेळ घेतली.

यावेळी त्यांनी विविध विकास कामांसदर्भात त्यांच्या समवेत चर्चा केला. यावेळी शिवाई नगर भागात कै. सुधाकर चव्हाण यांच्या नावाने बुहुउद्देशीय इमारत उभारली जाणार आहे. त्याचे भुमीपुजन देखील लवकरच केले जाणार असून त्यासाठी २५ कोटींचा निधी राज्य शासनाने मंजुर केल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या कामांच्या भुमीपुजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ काढावा अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

समतानगर मधील राजीव गांधी नगर, आनंदराम नगर, मिलिंद हौसिंग सोसायटी तसेच लोकमान्यनगर मधील सिध्दिविनायक सोसायटी या परिसरातील सर्व रहिवाश्यांनी १९९७ साली ठाणे महानगर पालिकेच्या रस्ता रूंदीकरणासाठी स्वत:च्या घरांची जागा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळेच या ठाणे शहराचा चेहरामोहरा बदलेला आपल्याला दिसून आला. त्यामुळे राज्य शासनाच्या नियमानुसार ३२३ स्के. फुट कारपेट म्हणजेच दोन बाथरूमसह वन बीएचकेची घरे या परिसरातील सुमारे ४५० रहिवाश्यांना मोफत देऊन त्यांचे पुर्नवसन करण्याची मागणी देखील सरनाईक यांनी लावून धरली होती. अखेर त्याचा मार्ग देखील आता मोकळा झाला असून त्या कामाचे भुमीपुजन देखील लोकसभा निवडणुकीच्या आचरसंहितेच्या आत करावे अशी मागणी त्यांनी केली.

ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघात सरनाईक यांच्या माध्यमातून विविध विकाम कामे हाती घेण्यात आली आहेत. वसंतविहार येथील स्थानिक नागरिकांसाठी पार्किंग, बँक्वेट हॉल, तसेच चिंतामणराव देशमुख प्रशिक्षण संस्थेचे भुमिपूजन करणे, लोकमान्यनगर येथील सिध्दिविनायक पुर्नवसाहत, आनंदराम नगर व राजीव गांधीनगर या वसाहतींचा विकास करणे, तसेच एम.एम.आर.डी.ए. तर्फे करण्यात येणाऱ्या घोडबंदर रोडच्या सर्व्हिस रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे. या सर्व विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी लोकसभा-२०२४ च्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापुर्वी आपण आपली वेळ द्यावी अशी मागणीही त्यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे