शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठाण्यातील तिन्ही मतदारसंघांत दोन हजार कोटींचा सट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:29 IST

आयपीएलच्या क्रिकेटवर चालणाऱ्या सट्टा बाजारात यावेळी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि पक्षनिहाय कोणाला किती जागा मिळतील, यावरूनही मोठी बोली लागली होती.

- जितेंद्र कालेकर ठाणे : आयपीएलच्या क्रिकेटवर चालणाऱ्या सट्टा बाजारात यावेळी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि पक्षनिहाय कोणाला किती जागा मिळतील, यावरूनही मोठी बोली लागली होती. ठाण्यात शिवसेनेचे विजयी उमेदवार राजन विचारे आणि राष्टÑवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार आनंद परांजपे यांच्यासाठीही सर्वाधिक बोली लागली होती. परांजपे जिंकले तर रुपयाला दहा रुपये आणि विचारे जिंकले तर २५ रुपये अशी बोली लागली होती. यात किमान दीड ते दोन हजार कोटींची उलाढाल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.निवडणुकीच्या प्रचारापासून ते अगदी मतदान आणि त्यानंतर अगदी मतमोजणीपर्यंत ठाण्यात दुरंगी लढतीचे चित्र होते. तसेच चित्र भिवंडीत होते. कल्याणमध्ये मात्र शिवसेना एकतर्फी जागा जिंकेल, असे भाकित वर्तवले जात होते. तरीही, ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्टÑवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यात मतमोजणीपर्यंत तरी फिफटीफिफटी (दुरंगी) लढत होईल, असे चित्र होते. तिकडे भिवंडीत भाजपचे कपिल पाटील यांना दगाफटका होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर कपिल पाटील आणि काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्यावरही सट्टा बाजारात चांगलीच बोली रंगली होती. जिथे कपिल पाटील यांच्या विजयासाठी ३५ रुपये तिथे टावरे यांच्या विजयासाठी ५० ते अगदी १०० रुपयांपर्यंत बोली लागली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.बुकींच्या क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार कोणताही खेळ हा दोन रुपयांमध्ये विभागला जातो. तसाच इथे पक्ष आणि उमेदवारनिहायदेखील सट्टा लावला गेला. त्यामुळे ही मोठी उलाढाल ठरली.एका बुकीने दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात अनेकांनी परांजपे जिंकतील, यावर बोली लावून लाखोंचा जुगार खेळला. तर, तिकडे कपिल पाटील यांचा पराभव होईल, अशी बोली लावून रुपयाला दोन रुपये अशी बोली नेली. तर, काही ठिकाणी हाच दर अगदी १० रुपयांपर्यंत होता. म्हणजेच, सट्टाबाजाराचा कल हा काँग्रेसचे सुरेश टावरे जिंकतील असाच होता, तरीही तिथे पाटील निवडून आले. तर, ठाण्यात फिफटीफिफटी चान्सेस आहेत, असे सांगणाऱ्यांनी परांजपे यांना कौल देऊन त्यांच्या विजयाच्या बाजूने लाखोंचा सट्टा लावला होता. त्यामुळे रुपयाला अगदी दहा रुपये आणि २५ रुपयांपर्यंत परांजपे चालले, तर विचारे रुपयाला दोन रुपये १० रुपये असा दर लागला.तिकडे कल्याणमध्ये मात्र राष्टÑवादीच्या बाबाजी पाटील आणि शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातील लढत एकतर्फी होण्यावरच कल अधिक असल्यामुळे तिथे फारशी बोली लागली नसल्याचे जाणकारांचे मत होते.बाबाजी पाटील यांच्यासाठी १० रुपये, तर डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी १० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंतची बोली होती. अर्थात, ज्यांनी परांजपे, टावरे आणि बाबाजी पाटील जिंकतील, असा दावा करून बोली लावली, त्यांना मात्र या जुगारात हार पत्करावी लागल्याचे आता स्पष्ट झाले आहे.>आघाडीच्या जागांवर१० हजार कोटींची उलाढालअनेकांनी तर थेट एनडीए आणि आघाडीला किती जागा मिळतील, यावरूनही बोली लावली होती. गुजरात येथून चालणाºया एका आॅनलाइन वेबपोर्टलद्वारे तर भाजपला २४५ की २४८ जागा मिळतील, यावरून १०० रुपये ते एक हजार रुपये असा दर लावला होता. यातही कमीतकमी एक हजार आणि जास्तीतजास्त १० लाखांपर्यंत एकावेळच्या खेळाची मर्यादा होती. त्यामुळे यातही किमान १० हजार कोटींची उलाढाल झाल्याचे बोलले जाते. मात्र, हा सट्टा वेबवर आॅनलाइनच खेळला जात असल्याने सट्टेबाजांना एकीकडे संरक्षण मिळते, तर दुसरीकडे त्यात किती उलाढाल झाली हे गुपित राहते.