शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

आदित्य ठाकेरांचा तो कॉमेडी शोच; नरेश म्हस्के यांची गंभीर टिका

By अजित मांडके | Updated: February 19, 2024 16:35 IST

आदित्य ठाकरे यांचा ठाण्यात कॉमेडी शो होता, यापुढे त्यांना नकाला करणे हाच एकमेव उद्योग राहणार आहे. दुसरे

अजित मांडके, ठाणे : आदित्य ठाकरे यांचा ठाण्यात कॉमेडी शो होता, यापुढे त्यांना नकाला करणे हाच एकमेव उद्योग राहणार आहे. दुसरे काहीच काम त्यांच्याकडे शिल्लक राहणार नाही म्हणून ते तमाशा मधील विदुषकाप्रमाणे काम करीत असून लोकांना हसविण्याचे काम करीत असल्याची टिका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यावर केली आहे.

रविवारी आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातील विविध शाखांना भेटी दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान करीत राजीनामा द्या, मी ठाण्यातून लढतो असे थेट आव्हान दिले. त्यानंतर या संदर्भात सोमवारी म्हस्के यांनी आदित्य यांच्यावर गंभीर टिका केली.  एक पात्र असते, त्या नाच्या म्हणत नाही, त्या पात्राचे काम असते लोकांना हसवणे ते काम त्यांनी केले. पक्षाची वाताहत झालेली आहे, जे शिल्लक राहिलेले आहेत, ते देखील परतीच्या मार्गावर आहेत, त्यामुळे आधी घर सांभाळा मग आव्हान द्या असेही ते म्हणाले. ठाण्यात त्यांनी केवळ एक नक्कल करण्यापलिकडे काहीच केले नसून तो एक कॉमेडी शो होता, अशी टिकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे  यांच्यावर बोलण्या इतके आपण तेवढे मोठे झालेला नाहीत, याचीही आठवण म्हस्के यांनी करुन दिली. आधी पुरषांच्या आवाजात बोला नंतर आव्हान द्या, असेही ते म्हणाले. 

आधी तुम्हाला खासदार शिंदे यांनी कल्याणचे आव्हान दिले आहे, ते तरी आधी स्विकारा आणि निवडणुका लागल्यावर या समोरा समोर मग बघूया आव्हान कोणाचे आहे, ते  स्वत: ज्या ठिकाणी राहतात, तो मतदार संघ सोडून वरळी सारख्या  सुरक्षित मतदार संघाची निवड केली. आता परत सुरक्षित मतदार संघ शोधत असल्याचीही टिका त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा मागण्याआधी तुम्ही आमदाराकीचा राजीनामा देतो सांगितले दिला राजीनामा का? असा सवालही त्यांनी केला.  रविवारी झालेल्या तीन ते चार ठिकाणांच्या कार्यक्रमात तीच तीच माणसे दिसत होती.  बाहेरचे उसणे आवासन कशाला आणता. म्हस्के यांनी शिंदे यांनीच आमदारकीचे तिकीट नाकारले होते, अशी टिकाही आदीत्य यांनी केली होती. त्यावर म्हस्के यांनी प्रतिउत्तर देत आमचा आमच्या माणसावर विश्वास आहे, आमच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करु नका, पदासाठी आम्ही शिंदे सोबत नाही.

 शिवसैनिकांची बाजू घेणारा, त्यांच्या मागे उभा राहणारा, बाळासाहेबांचे विचार अंगीकारलेला माणूस असल्याने आम्ही शिंदे यांच्या सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमच्यात गैरसमज करण्याचा प्रयत्न करु नका आमच्यात भांडणे लावण्याचे काम करु नका आम्ही ते करणारही नाही असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे हे सहानभुती घेत असल्याच्या मुद्यावर म्हस्के यांना छेडले असता,  वर्षा सोडल्यापासून सहानभुती कोण घेत आहे, त्याचा प्रयत्न कोण करतेय,  असा सवालही त्यांनी केला. इलाका हमारा धमाका हमारा होंगा, असे म्हणणाऱ्यांनी आधी ठाण्यात किती लोक तुमच्या बरोबर आहेत याचे आत्मपरिक्षण करावे आणि हा तुमचा नाही, धर्मवीर आनंद दिघे यांचा हा इलाका आहे, असल्याचेही त्यांनी आदित्य यांना सुनावले.  ठाणे तुमचे म्हणताय मग नगरसेवक यांच्या सोबत का राहिले नाही, याचा विचार करावा, जे शिल्लक राहिले आहेत, ते देखील परतीच्या मार्गावर असल्याचा दावाही त्यांनी केला.  त्यामुळे आपल्या सोबत कोण आहे, त्याचे आत्मपरिक्षण करा मग ठाण्यावर दावा करा असे आव्हानही त्यांनी दिले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेPoliticsराजकारण