शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

ठाण्यात एसटीला यंदा ३९ कोटींचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:25 IST

कोकणातील गणपती उत्सवासह यात्रा, लग्न समारंभ, सहली आदी प्रासंगिक करारांसाठी धावाधाव करून रोजची प्रवासी सेवाही न चुकता दिली जात आहे.

सुरेश लोखंडे।ठाणे : मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात एसटी महामंडळाची सेवा तब्बल ३९ कोटी रुपयांच्या तोट्यात धावत असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, मागील वर्षाचा तोटा काही अंशी कमी करण्यास यश मिळाल्याचे समाधान येथील अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे.कोकणातील गणपती उत्सवासह यात्रा, लग्न समारंभ, सहली आदी प्रासंगिक करारांसाठी धावाधाव करून रोजची प्रवासी सेवाही न चुकता दिली जात आहे. तरीदेखील ठाणे विभागाचा तोटा भरून काढण्यास एसटी कासवगतीत आहे. मागील आर्थिक वर्षात म्हणजे २०१६-१७ मध्ये सुमारे ४५ कोटी रुपयांपेक्षा अधिक ठाणे विभाग तोट्यात होता. यंदाच्या अर्थसंकल्पाचा अभ्यास केला असता सुमारे सहा कोटी रुपयांनी हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी वर्षभर धावल्याचे दिसून येत आहे. मात्र, जिल्ह्यातील काही डेपोंच्या उत्पन्नाबाबत ठाणे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण म्हणाले की, ठाणे या मध्यवर्ती आगारात यंदा ५१ लाखांचा फायदा झाला. याशिवाय, ठाणे क्र.१ ला एक कोटी रुपये तर भिवंडीला सुमारे ११ कोटींचे उत्पन्न मिळाल्याचा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला.कल्याण बस आगारास वर्षभरात दोन कोटी १९ लाख रुपये, मुरबाडला दोन कोटी ९८ लाख विठ्ठलवाडी बस आगारापासून केवळ १६ लाख ८० हजारांचे उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. फायदा जरी झालेला दिसत नसला, तरी सुमारे सहा कोटींचा तोटा कमी करण्यासाठी यश मिळाल्याचे ते म्हणाले. यात ठाणे क्र.१ ने एक कोटी २६ लाख तर ठाणे क्र.२ ने सुमारे ६६ लाखांनी तोटा भरून काढला. याशिवाय भिवंडीने एक कोटी चार लाख रुपये, शहापूरने पाच लाख ९३ हजार, कल्याण आगारने एक कोटी १० लाख, मुरबाडने ८१ लाख आणि विठ्ठलवाडीने ६२ लाखांनी मागील तोटा भरण्यासाठी प्रयत्न केल्याचे चव्हाण म्हणाले.उन्हाळी सुटीसाठी बसेसउन्हाळी सुटीत गावी जाणाºया प्रवाशांवर लक्ष केंद्रित करून राज्यात २६ बस सोडल्या आहेत. यामध्ये ठाणे क्र.१ येथून मुरूड, शिंदी, चिपळूण, कावळे या मार्गांवर तर ठाणे क्र.२ येथून तुळजापूर, कराड, फलटण, पंढरपूर आदी मार्गांवर त्या सोडल्या आहेत. तर भिवंडी येथून कोल्हापूर, अहमदपूर, शेगाव या शहरांसाठी गाड्या सोडल्या आहेत.शहापूर येथून साक्रीसाठी तर कल्याण ते अक्कलकुवा बसेससह विठ्ठलवाडी येथून भगवानगड व बुलडाण्याला आणि वाडा येथून पंढरपूरला दोन बसेस सुरू केल्या आहेत. याप्रमाणेच वातानुकूलित २३ शिवशाही बसेस तोटा भरून काढण्यास मदत करण्याची अपेक्षा आहे. त्यातून नुकत्याच डोंबिवली-पुणे, ठाणे-कोल्हापूर व शेगाव येथे शिवशाही धावली.