शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

ठाण्यात एसटीला यंदा ३९ कोटींचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:25 IST

कोकणातील गणपती उत्सवासह यात्रा, लग्न समारंभ, सहली आदी प्रासंगिक करारांसाठी धावाधाव करून रोजची प्रवासी सेवाही न चुकता दिली जात आहे.

सुरेश लोखंडे।ठाणे : मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात एसटी महामंडळाची सेवा तब्बल ३९ कोटी रुपयांच्या तोट्यात धावत असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, मागील वर्षाचा तोटा काही अंशी कमी करण्यास यश मिळाल्याचे समाधान येथील अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे.कोकणातील गणपती उत्सवासह यात्रा, लग्न समारंभ, सहली आदी प्रासंगिक करारांसाठी धावाधाव करून रोजची प्रवासी सेवाही न चुकता दिली जात आहे. तरीदेखील ठाणे विभागाचा तोटा भरून काढण्यास एसटी कासवगतीत आहे. मागील आर्थिक वर्षात म्हणजे २०१६-१७ मध्ये सुमारे ४५ कोटी रुपयांपेक्षा अधिक ठाणे विभाग तोट्यात होता. यंदाच्या अर्थसंकल्पाचा अभ्यास केला असता सुमारे सहा कोटी रुपयांनी हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी वर्षभर धावल्याचे दिसून येत आहे. मात्र, जिल्ह्यातील काही डेपोंच्या उत्पन्नाबाबत ठाणे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण म्हणाले की, ठाणे या मध्यवर्ती आगारात यंदा ५१ लाखांचा फायदा झाला. याशिवाय, ठाणे क्र.१ ला एक कोटी रुपये तर भिवंडीला सुमारे ११ कोटींचे उत्पन्न मिळाल्याचा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला.कल्याण बस आगारास वर्षभरात दोन कोटी १९ लाख रुपये, मुरबाडला दोन कोटी ९८ लाख विठ्ठलवाडी बस आगारापासून केवळ १६ लाख ८० हजारांचे उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. फायदा जरी झालेला दिसत नसला, तरी सुमारे सहा कोटींचा तोटा कमी करण्यासाठी यश मिळाल्याचे ते म्हणाले. यात ठाणे क्र.१ ने एक कोटी २६ लाख तर ठाणे क्र.२ ने सुमारे ६६ लाखांनी तोटा भरून काढला. याशिवाय भिवंडीने एक कोटी चार लाख रुपये, शहापूरने पाच लाख ९३ हजार, कल्याण आगारने एक कोटी १० लाख, मुरबाडने ८१ लाख आणि विठ्ठलवाडीने ६२ लाखांनी मागील तोटा भरण्यासाठी प्रयत्न केल्याचे चव्हाण म्हणाले.उन्हाळी सुटीसाठी बसेसउन्हाळी सुटीत गावी जाणाºया प्रवाशांवर लक्ष केंद्रित करून राज्यात २६ बस सोडल्या आहेत. यामध्ये ठाणे क्र.१ येथून मुरूड, शिंदी, चिपळूण, कावळे या मार्गांवर तर ठाणे क्र.२ येथून तुळजापूर, कराड, फलटण, पंढरपूर आदी मार्गांवर त्या सोडल्या आहेत. तर भिवंडी येथून कोल्हापूर, अहमदपूर, शेगाव या शहरांसाठी गाड्या सोडल्या आहेत.शहापूर येथून साक्रीसाठी तर कल्याण ते अक्कलकुवा बसेससह विठ्ठलवाडी येथून भगवानगड व बुलडाण्याला आणि वाडा येथून पंढरपूरला दोन बसेस सुरू केल्या आहेत. याप्रमाणेच वातानुकूलित २३ शिवशाही बसेस तोटा भरून काढण्यास मदत करण्याची अपेक्षा आहे. त्यातून नुकत्याच डोंबिवली-पुणे, ठाणे-कोल्हापूर व शेगाव येथे शिवशाही धावली.