शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पाणीकपात रद्द केल्याने ठाणेकरांना दिलासा

By admin | Updated: November 4, 2015 23:36 IST

ऐन दिवाळीच्या आधीच शहरात पाणीकपात लागू झाल्याने याचे पडसाद बुधवारी झालेल्या महासभेतही उमटले. किमान दिवाळीच्या काळात ती रद्द करण्याची मागणी नगरसेवकांनी

ठाणे : ऐन दिवाळीच्या आधीच शहरात पाणीकपात लागू झाल्याने याचे पडसाद बुधवारी झालेल्या महासभेतही उमटले. किमान दिवाळीच्या काळात ती रद्द करण्याची मागणी नगरसेवकांनी केल्यानंतर महापालिकेने स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून होणारी पाणीकपात दिवाळीसाठी रद्द केली आहे. त्यामुळे ठाणेकरांना दिलासा मिळणार आहे. परंतु, एमआयडीसीकडून होणारी पाणीकपात रद्द न झाल्याने त्याचा फटका कळवा, मुंब्रा आणि दिवेकरांना सहन करावा लागणार आहे.ठाणे महापालिकेने १ नोव्हेंबरपासून स्टेमकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात शहरात रोज १५ टक्के आणि बुधवार आणि शुक्रवारी दिवसभर शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, एमआयडीसीने तब्बल ४८ तास शटडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याने कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील नागरिकांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागणार आहेत. दरम्यान, पुढील आठवड्यात दिवाळी असल्याने किमान या कालावधीत तरी पाणीकपात करू नये, अशी मागणी नगरसेवकांनी महासभेत केली. त्यानंतर, महापौर संजय मोरे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ही कपात दिवाळीपुरती रद्द केल्याचे जाहीर केले. परंतु, दुसरीकडे एमआयडीसीकडून पाणीकपात रद्द करण्यात येत नसल्याचे स्पष्ट केल्याने कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील नागरिकांना ऐन दिवाळीत पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.