शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

ठाणेकरांचा १५,६८६ किलो द्राक्षांवर ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरातील ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात नुकताच चार दिवस द्राक्षे महोत्सव पार पडला. या महोत्सवात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : शहरातील ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात नुकताच चार दिवस द्राक्षे महोत्सव पार पडला. या महोत्सवात १५ हजार ६८६ किलो ताज्या द्राक्षांसह उत्तम दर्जाचे कांदे, बटाटे आणि रंगीबेरंगी कोबीची खरेदी चोखंदळ ठाणेकर ग्राहकांनी केली. यामुळे नाशिक जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना रोख रकमेचा लाभ झाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केल्याचे कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत श्री संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत ठाणे शहरात ठिकठिकाणी आठवडी बाजार सुरू आहे. गेल्या चार दिवसांत द्राक्षे महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी ताजी रसाळ द्राक्षे, कांदा, भाजीपाल्यासह बटाटे, कोबी आदींची ठाणेकरांना स्वस्तात विक्री केली.

बाजारात १५० ते १६० रुपये किलो मिळणारे द्राक्षे या महोत्सवात अवघ्या १२५ ते १३० रुपये दराने ठाणेकरांनी खरेदी केले आहे. यामध्ये काळ्या द्राक्षाच्या वाणासह सोनाका, फामी, नानासाहेब परपळ आदी द्राक्षांचे वाण खरेदी केले. ११ ते १४ फेब्रुवारीदरम्यान पार पडलेल्या या द्राक्षे महोत्सवात हिरव्या व काळ्या रंगाच्या पाच हजार किलो द्राक्षांची विक्री झाली आहे. याशिवाय दोन हजार ५० किलो फामी द्राक्षांची खरेदीही ठाणेकरांनी केली आहे. एवढेच नव्हे तर २५० ते ३०० रुपये किलो असणारा बेदाणा या महोत्सवात ठाणेकरांना अवघ्या २०० ते २२५च्या दराने खरेदी करता आला.

या महोत्सवात चार हजार ८०० किलाे द्राक्षे विकण्याचे उद्दिष्ट असलेल्या शेतकऱ्यांना तब्बल सात हजार किलाे द्राक्षांची विक्री या बाजारात करणे शक्य झाले आहे. ठाणेकरांच्या या प्रतिसादामुळे नाशिकच्या द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या द्राक्षांच्या जोडीला ठाणेकरांनी वेगवेगळ्या रंगांच्या ९६८ किलो कोबीची खरेदी केली. याशिवाय सात हजार ५०० किलो कांदा, काकडी, वांगी, कोबी, भेंडी आणि टोमॅटोचीदेखील चोखंदळ ठाणेकर ग्राहकांनी खरेदी करून शेतकऱ्यांच्या हाती एकरकमी मोबदला दिला आहे.

...

शेतकरी प्रतिक्रिया -

भाजीपाला, फळफळावळ विकणारे अन्य राज्यांतील बहुतांश व्यापारी, किरकोळ विक्रेते अजून ठाण्यासह मुंबई शहरात दाखल झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा ग्राहक या आठवडी बाजाराच्या माध्यमातून सध्या सहज मिळवता येत आहे. या ग्राहकांची ओढ कायम ठेवण्यासाठी व व्यापाऱ्यांचा अडथळा न ठेवता शेतकऱ्यांना त्याच्या मालाची विक्री करण्यासाठी शहरातील गृहनिर्माण सोसायट्या, बाजारपेठांजवळची मैदाने, शासकीय कार्यालयाच्या आवारात द्राक्षांसह ताज्या भाजीपाल्याच्या विक्रीला संधी देणे अपेक्षित आहे.- प्रकाश महाले, पिंपळगाव बसवंत, नाशिक

.............