शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

ठाणेकरांचा १५,६८६ किलो द्राक्षांवर ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरातील ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात नुकताच चार दिवस द्राक्षे महोत्सव पार पडला. या महोत्सवात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : शहरातील ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात नुकताच चार दिवस द्राक्षे महोत्सव पार पडला. या महोत्सवात १५ हजार ६८६ किलो ताज्या द्राक्षांसह उत्तम दर्जाचे कांदे, बटाटे आणि रंगीबेरंगी कोबीची खरेदी चोखंदळ ठाणेकर ग्राहकांनी केली. यामुळे नाशिक जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना रोख रकमेचा लाभ झाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केल्याचे कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत श्री संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत ठाणे शहरात ठिकठिकाणी आठवडी बाजार सुरू आहे. गेल्या चार दिवसांत द्राक्षे महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी ताजी रसाळ द्राक्षे, कांदा, भाजीपाल्यासह बटाटे, कोबी आदींची ठाणेकरांना स्वस्तात विक्री केली.

बाजारात १५० ते १६० रुपये किलो मिळणारे द्राक्षे या महोत्सवात अवघ्या १२५ ते १३० रुपये दराने ठाणेकरांनी खरेदी केले आहे. यामध्ये काळ्या द्राक्षाच्या वाणासह सोनाका, फामी, नानासाहेब परपळ आदी द्राक्षांचे वाण खरेदी केले. ११ ते १४ फेब्रुवारीदरम्यान पार पडलेल्या या द्राक्षे महोत्सवात हिरव्या व काळ्या रंगाच्या पाच हजार किलो द्राक्षांची विक्री झाली आहे. याशिवाय दोन हजार ५० किलो फामी द्राक्षांची खरेदीही ठाणेकरांनी केली आहे. एवढेच नव्हे तर २५० ते ३०० रुपये किलो असणारा बेदाणा या महोत्सवात ठाणेकरांना अवघ्या २०० ते २२५च्या दराने खरेदी करता आला.

या महोत्सवात चार हजार ८०० किलाे द्राक्षे विकण्याचे उद्दिष्ट असलेल्या शेतकऱ्यांना तब्बल सात हजार किलाे द्राक्षांची विक्री या बाजारात करणे शक्य झाले आहे. ठाणेकरांच्या या प्रतिसादामुळे नाशिकच्या द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या द्राक्षांच्या जोडीला ठाणेकरांनी वेगवेगळ्या रंगांच्या ९६८ किलो कोबीची खरेदी केली. याशिवाय सात हजार ५०० किलो कांदा, काकडी, वांगी, कोबी, भेंडी आणि टोमॅटोचीदेखील चोखंदळ ठाणेकर ग्राहकांनी खरेदी करून शेतकऱ्यांच्या हाती एकरकमी मोबदला दिला आहे.

...

शेतकरी प्रतिक्रिया -

भाजीपाला, फळफळावळ विकणारे अन्य राज्यांतील बहुतांश व्यापारी, किरकोळ विक्रेते अजून ठाण्यासह मुंबई शहरात दाखल झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा ग्राहक या आठवडी बाजाराच्या माध्यमातून सध्या सहज मिळवता येत आहे. या ग्राहकांची ओढ कायम ठेवण्यासाठी व व्यापाऱ्यांचा अडथळा न ठेवता शेतकऱ्यांना त्याच्या मालाची विक्री करण्यासाठी शहरातील गृहनिर्माण सोसायट्या, बाजारपेठांजवळची मैदाने, शासकीय कार्यालयाच्या आवारात द्राक्षांसह ताज्या भाजीपाल्याच्या विक्रीला संधी देणे अपेक्षित आहे.- प्रकाश महाले, पिंपळगाव बसवंत, नाशिक

.............