शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

ठाणेकरांचा मुंबई प्रवेश महागला: टोलच्या दरांमध्ये ५ ते २५ रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 22:15 IST

ठाण्यातून मुंबईत जाण्यासाठी वाहन चालकांना भरावा लागणाऱ्या टोलमध्ये पाच ते २५ रुपयांची वाढ गुरुवारपासून झाल्याने वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अनेक कंपन्यांमध्ये सध्या कामगारांच्या कपातीचे धोरण असल्यामुळे ही टोलवाढ सध्या लागू करु नये, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

ठळक मुद्देवाहन चालकांमध्ये संतापवेतनकपात असूनही टोल वाढल्याने नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एकीकडे अनेक खासगी कार्पोरेट कंपन्यांमध्ये कामगारांची कपात झाली आहे. तर अनेक ठिकाणी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात झाली आहे. असे असतांनाही ठाण्यातून मुंबईत जाण्यासाठी वाहन चालकांना भरावा लागणाºया टोलमध्ये पाच ते २५ रुपयांची वाढ गुरुवारपासून झाल्याने वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.ठाण्यातून मुंबईत जाण्यासाठी मुलूंड चेक नाका आनंदनगर येथे तसेच वागळे इस्टेट येथील मुलूंड चेक नाका येथे वाहन चालकांकडून टोल आकारला जातो. मुंबईमध्ये जाणाºया आणि मुंबईतून बाहेर पडणाºया वाहन चालकांकडून याठिकाणी टोल घेतला जातो. रस्ता दुरुस्ती आणि देखभाल करणाºया आयआरबी कंपनीकडे टोल आकारणीचा ठेका दिलेला आहे. या कंपनीला यापुढे टोल आकारणीमध्ये वाढ करण्याची मुभा राज्य सरकारने १ आॅक्टोंबरपासून दिली. त्यामुळे या टोलमध्ये पाच ते २५ रुपयांची वाढ झाली असून मासिक पासच्या रकमेतही वाढ झाली आहे. त्यामुळे साहजिकच अनेक वस्तूंच्या किंमती त्यामुळे वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच अपुरे वेतन आणि नोकर कपातीमुळे नोकरदार मंडळी तर दुकाने वारंवार बंद राहण्यामुळे व्यापारी मंडळी हैराण आहेत. त्यातच या टोलवाढीमुळे वाहन चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर टोलच्या वाढलेल्या दरांमुळे चालक आणि टोल वसूली करणारा कर्मचारी यांच्यात खटके उडत असल्याचे चित्र होते. त्यामुळे कोपरीतील आनंदनगर नाक्यावर वाहतूक कोंडी झाल्याचेही गुरुवारी पहायला मिळाले. ठाणे मुंबई मार्गावर अनेक ठिकाणी खड्डयांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. त्यातून होणाºया अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. तर अनेकजण जायबंदी होत आहेत. अशा वेळी रस्ते दुरुस्ती करण्याऐवजी टोलमध्ये वाढीला राज्य शासनाने परवानगी देणे हे योग्य नसल्याच्या प्रतिक्रीया अनेक चालकांनी व्यक्त केल्या आहेत.असे आहेत टोलचे नविन दर:* छोटी वाहने ३५ वरुन ४० रुपये* मध्यम अवजड वाहने ५५ ऐवजी ६५ रुपये* ट्रक आणि बसेस १०५ ऐवजी १३० रुपये* अवजड वाहने १३५ वरुन १६० रुपये* हलक्या वाहनांच्या मासिक पासातही वाढ झाली आहे.* पाचही टोल नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता १४०० रु पयांऐवजी १५०० रु पये झाला आहे. 

‘‘ राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे दर तीन वर्षांनी होणारी ही टोल वाढ आहे. २०१२ मध्ये आधीच ठरलेल्या आधीसूचनेप्रमाणे ही टोलवाढ केली आहे. ’’जयंत म्हैसकर, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, एमईपी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सस लि. मुंबई.

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूकtollplazaटोलनाका