शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ठाणेकरांचा मुंबई प्रवेश महागला: टोलच्या दरांमध्ये ५ ते २५ रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 22:15 IST

ठाण्यातून मुंबईत जाण्यासाठी वाहन चालकांना भरावा लागणाऱ्या टोलमध्ये पाच ते २५ रुपयांची वाढ गुरुवारपासून झाल्याने वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अनेक कंपन्यांमध्ये सध्या कामगारांच्या कपातीचे धोरण असल्यामुळे ही टोलवाढ सध्या लागू करु नये, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

ठळक मुद्देवाहन चालकांमध्ये संतापवेतनकपात असूनही टोल वाढल्याने नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एकीकडे अनेक खासगी कार्पोरेट कंपन्यांमध्ये कामगारांची कपात झाली आहे. तर अनेक ठिकाणी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात झाली आहे. असे असतांनाही ठाण्यातून मुंबईत जाण्यासाठी वाहन चालकांना भरावा लागणाºया टोलमध्ये पाच ते २५ रुपयांची वाढ गुरुवारपासून झाल्याने वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.ठाण्यातून मुंबईत जाण्यासाठी मुलूंड चेक नाका आनंदनगर येथे तसेच वागळे इस्टेट येथील मुलूंड चेक नाका येथे वाहन चालकांकडून टोल आकारला जातो. मुंबईमध्ये जाणाºया आणि मुंबईतून बाहेर पडणाºया वाहन चालकांकडून याठिकाणी टोल घेतला जातो. रस्ता दुरुस्ती आणि देखभाल करणाºया आयआरबी कंपनीकडे टोल आकारणीचा ठेका दिलेला आहे. या कंपनीला यापुढे टोल आकारणीमध्ये वाढ करण्याची मुभा राज्य सरकारने १ आॅक्टोंबरपासून दिली. त्यामुळे या टोलमध्ये पाच ते २५ रुपयांची वाढ झाली असून मासिक पासच्या रकमेतही वाढ झाली आहे. त्यामुळे साहजिकच अनेक वस्तूंच्या किंमती त्यामुळे वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच अपुरे वेतन आणि नोकर कपातीमुळे नोकरदार मंडळी तर दुकाने वारंवार बंद राहण्यामुळे व्यापारी मंडळी हैराण आहेत. त्यातच या टोलवाढीमुळे वाहन चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर टोलच्या वाढलेल्या दरांमुळे चालक आणि टोल वसूली करणारा कर्मचारी यांच्यात खटके उडत असल्याचे चित्र होते. त्यामुळे कोपरीतील आनंदनगर नाक्यावर वाहतूक कोंडी झाल्याचेही गुरुवारी पहायला मिळाले. ठाणे मुंबई मार्गावर अनेक ठिकाणी खड्डयांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. त्यातून होणाºया अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. तर अनेकजण जायबंदी होत आहेत. अशा वेळी रस्ते दुरुस्ती करण्याऐवजी टोलमध्ये वाढीला राज्य शासनाने परवानगी देणे हे योग्य नसल्याच्या प्रतिक्रीया अनेक चालकांनी व्यक्त केल्या आहेत.असे आहेत टोलचे नविन दर:* छोटी वाहने ३५ वरुन ४० रुपये* मध्यम अवजड वाहने ५५ ऐवजी ६५ रुपये* ट्रक आणि बसेस १०५ ऐवजी १३० रुपये* अवजड वाहने १३५ वरुन १६० रुपये* हलक्या वाहनांच्या मासिक पासातही वाढ झाली आहे.* पाचही टोल नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता १४०० रु पयांऐवजी १५०० रु पये झाला आहे. 

‘‘ राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे दर तीन वर्षांनी होणारी ही टोल वाढ आहे. २०१२ मध्ये आधीच ठरलेल्या आधीसूचनेप्रमाणे ही टोलवाढ केली आहे. ’’जयंत म्हैसकर, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, एमईपी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सस लि. मुंबई.

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूकtollplazaटोलनाका