शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

तीन दिवस पाण्यावाचून ठाणेकरांचे हाल, आज पाणीपुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:46 IST

ठाणे : अतिवृष्टीमुळे पिसे येथील पम्पिंग स्टेशनमध्ये साचलेला गाळ साफ करण्यासाठी बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस ठाणे ...

ठाणे : अतिवृष्टीमुळे पिसे येथील पम्पिंग स्टेशनमध्ये साचलेला गाळ साफ करण्यासाठी बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. हे काम गुरुवारी उशिरा संपल्याने तीन दिवस ठाणेकरांचे पाण्यावाचून अक्षरशः हाल झाले. प्यायला, स्वयंपाकालादेखील पाणी नाही आणि कोरोनामध्ये बाहेर जेवायला जायचे तरी कसे, अशी बिकट अवस्था ठाणेकरांची झाली होती. शनिवारी पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने ठाणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टीमुळे भातसा नदीला आलेल्या पुरामुळे पाण्यासोबत जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ जमा झालेला होता. तो पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने सदरच्या पंपाचा फ्लो कमी झालेला होता. त्यामुळे ठाणे शहरात होणारा पाणीपुरवठा मागील चार ते पाच दिवसांपासून कमी होत होता. वाहत आलेला गाळ काढण्यासाठी बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत शटडाऊन घोषित केले होते. गाळ काढण्याचे काम हे गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत संपणार होते. मात्र, ते संध्याकाळी उशिरापर्यंत चालले. या कामासाठी ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला होता. परिणामी, शहरातील लोकमान्यनगर, सावरकरनगर, शिवाईनगर या परिसरात तीन दिवस पाणीच नसल्याने नागरिकांचे पाण्यावाचून अक्षरशः हाल झाले. पिण्यासाठी पाणी नाही की स्वयंपाकालादेखील नाही. कपडे धुण्यासाठी नागरिकांनी पावसाच्या पाण्याचा वापर केला. कोरोनाकाळात शक्यतो बाहेर जेवायला टाळणाऱ्या नागरिकांना हॉटेलशिवाय पर्याय नव्हता. तर काही ठिकाणी विकतचे पाणी किती घेणार, असा प्रश्न नागरिकांना पडला. यादरम्यान ठाणे महापालिकेकडूनदेखील नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात येत नसल्याने नागरिक अक्षरशः हवालदिल झाले होते. गुरुवारी संध्याकाळी हे काम झाल्यानंतर शुक्रवारी दुपारनंतर काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरू झाला. तर शनिवारी सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिकेचा पाणीपुरवठा बंद असला तरी, स्टेम प्राधिकरणाचा पाणीपुरवठा या दरम्यान सुरू होता. तसेच मुंबई महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठादेखील सुरू होता. त्यामुळे शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, गांधीनगर, सुरकरपाडा, बाळकुम, माजिवाडा, मानपाडा, कोठारी कम्पाउंड, पवारनगर, आझादनगर या भागात फारसा परिणाम दिसून आला नाही. तसेच नौपाडा, कळवा, साकेत, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल टाकी, जॉन्सन, इंटरनिटी, समतानगर व मुंब्य्राच्या काही भागाचा पाणीपुरवठादेखील सुरू होता, असा दावा महापालिकेने केला आहे.