शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवस पाण्यावाचून ठाणेकरांचे हाल, आज पाणीपुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:46 IST

ठाणे : अतिवृष्टीमुळे पिसे येथील पम्पिंग स्टेशनमध्ये साचलेला गाळ साफ करण्यासाठी बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस ठाणे ...

ठाणे : अतिवृष्टीमुळे पिसे येथील पम्पिंग स्टेशनमध्ये साचलेला गाळ साफ करण्यासाठी बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. हे काम गुरुवारी उशिरा संपल्याने तीन दिवस ठाणेकरांचे पाण्यावाचून अक्षरशः हाल झाले. प्यायला, स्वयंपाकालादेखील पाणी नाही आणि कोरोनामध्ये बाहेर जेवायला जायचे तरी कसे, अशी बिकट अवस्था ठाणेकरांची झाली होती. शनिवारी पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने ठाणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टीमुळे भातसा नदीला आलेल्या पुरामुळे पाण्यासोबत जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ जमा झालेला होता. तो पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने सदरच्या पंपाचा फ्लो कमी झालेला होता. त्यामुळे ठाणे शहरात होणारा पाणीपुरवठा मागील चार ते पाच दिवसांपासून कमी होत होता. वाहत आलेला गाळ काढण्यासाठी बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत शटडाऊन घोषित केले होते. गाळ काढण्याचे काम हे गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत संपणार होते. मात्र, ते संध्याकाळी उशिरापर्यंत चालले. या कामासाठी ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला होता. परिणामी, शहरातील लोकमान्यनगर, सावरकरनगर, शिवाईनगर या परिसरात तीन दिवस पाणीच नसल्याने नागरिकांचे पाण्यावाचून अक्षरशः हाल झाले. पिण्यासाठी पाणी नाही की स्वयंपाकालादेखील नाही. कपडे धुण्यासाठी नागरिकांनी पावसाच्या पाण्याचा वापर केला. कोरोनाकाळात शक्यतो बाहेर जेवायला टाळणाऱ्या नागरिकांना हॉटेलशिवाय पर्याय नव्हता. तर काही ठिकाणी विकतचे पाणी किती घेणार, असा प्रश्न नागरिकांना पडला. यादरम्यान ठाणे महापालिकेकडूनदेखील नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात येत नसल्याने नागरिक अक्षरशः हवालदिल झाले होते. गुरुवारी संध्याकाळी हे काम झाल्यानंतर शुक्रवारी दुपारनंतर काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरू झाला. तर शनिवारी सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिकेचा पाणीपुरवठा बंद असला तरी, स्टेम प्राधिकरणाचा पाणीपुरवठा या दरम्यान सुरू होता. तसेच मुंबई महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठादेखील सुरू होता. त्यामुळे शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, गांधीनगर, सुरकरपाडा, बाळकुम, माजिवाडा, मानपाडा, कोठारी कम्पाउंड, पवारनगर, आझादनगर या भागात फारसा परिणाम दिसून आला नाही. तसेच नौपाडा, कळवा, साकेत, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल टाकी, जॉन्सन, इंटरनिटी, समतानगर व मुंब्य्राच्या काही भागाचा पाणीपुरवठादेखील सुरू होता, असा दावा महापालिकेने केला आहे.