शहरं
Join us  
Trending Stories
1
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
3
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
4
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
5
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
6
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
7
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
8
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
9
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
10
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
11
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
12
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
13
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
14
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
15
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
16
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
17
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
18
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
19
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
20
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांचा बोटीचा प्रवास लांबणीवर, जलवाहतूक प्रकल्पाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 07:35 IST

वाहतूककोंडी व प्रदूषण टाळण्यासाठी जिल्ह्यातील पाच महापालिकांना जोडणाऱ्या जलवाहतुकीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वीच मान्यता देऊन गेल्या वर्षी १०० टक्के निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.

ठाणे : आधीच कोरोनाचे संकट अन् त्यात शिवसेना-भाजपमधील वादामुळे ठाणे महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी जलवाहतूक प्रकल्पाला केंद्राकडून मिळणारा निधी उपलब्ध होणार का? याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या प्रकल्पावरून शिवसेनेची कोंडी करण्याचाही प्रयत्न विरोधकांकडून होणार असल्याची चर्चा आहे. परंतु, या भांडणात बोटीने अथवा हॉवरक्राफ्टने प्रवास करण्याचे ठाणेकरांचे स्वप्न मात्र लांबणीवर पडणार आहे.वाहतूककोंडी व प्रदूषण टाळण्यासाठी जिल्ह्यातील पाच महापालिकांना जोडणाऱ्या जलवाहतुकीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वीच मान्यता देऊन गेल्या वर्षी १०० टक्के निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकल्पाचे भवितव्य पर्यावरण विभागाच्या मान्यतेवर अवलंबून असताना आता कोविडमुळे त्याचे काम थंडावले असून, खर्चातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेने तयार केलेल्या या जलवाहतूक प्रकल्पाच्या ठाणे वसई-कल्याण डीपीआरला ६४५ कोटींची मान्यता मिळाली असून, त्याचे नियोजनाचे काम या वर्षीच्या सुरुवातीपासून सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यातील सुरू झालेल्या वसई ते ठाणे-कल्याण जलमार्ग क्रमांक ५३ या ५० किलोमीटरच्या मार्गावर प्रस्तावामध्ये एका ठिकाणी मल्टिमोडल हब व विविध ठिकाणी १० जेट्टी असून त्यापैकी मीरा-भार्इंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली या ४ जेट्टींची कामे प्रस्तावित आहे. या कामांसाठी ८६ कोटी मंजूर झाले आहेत. मात्र, अद्याप ते मिळलेले नाहीत. तसेच ठाणे ते मुंबई व नवी मुंबई हा ९३ किलोमीटरच्या मार्गावरही १८ जेट्टींची व अनुषंगिक कामे सुरू करायची आहेत. या प्रकल्पांचे प्रस्ताव पर्यावरण विभागाच्या मान्यतेसाठी पाठविले आहेत. परंतु, कोरोनामुळे या प्रकल्पाचे कामही थंडावले आहे. यासाठी प्रति दीड ते दोन कि.मी.साठी १२५ ते १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, तो आता ७१७ कोटींवर पोहोचल्याने जलवाहतुकीसाठी सरकारला मोठा खर्च करावा लागणार आहे.१00 टक्के निधी मिळण्याची शक्यता धूसरकेंद्राने या प्रकल्पाला १०० टक्के निधी देण्याचे मान्य केले, तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप एकत्रित सत्तेत होते. परंतु, मागील वर्षी महाविकास आघाडीचे सरकार सत्तारुढ झाले आणि राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. त्यामुळे आता केंद्र १०० टक्के निधी देण्याचे वचन पाळेल का, याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणे