शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांचा बोटीचा प्रवास लांबणीवर, जलवाहतूक प्रकल्पाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 07:35 IST

वाहतूककोंडी व प्रदूषण टाळण्यासाठी जिल्ह्यातील पाच महापालिकांना जोडणाऱ्या जलवाहतुकीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वीच मान्यता देऊन गेल्या वर्षी १०० टक्के निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.

ठाणे : आधीच कोरोनाचे संकट अन् त्यात शिवसेना-भाजपमधील वादामुळे ठाणे महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी जलवाहतूक प्रकल्पाला केंद्राकडून मिळणारा निधी उपलब्ध होणार का? याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या प्रकल्पावरून शिवसेनेची कोंडी करण्याचाही प्रयत्न विरोधकांकडून होणार असल्याची चर्चा आहे. परंतु, या भांडणात बोटीने अथवा हॉवरक्राफ्टने प्रवास करण्याचे ठाणेकरांचे स्वप्न मात्र लांबणीवर पडणार आहे.वाहतूककोंडी व प्रदूषण टाळण्यासाठी जिल्ह्यातील पाच महापालिकांना जोडणाऱ्या जलवाहतुकीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वीच मान्यता देऊन गेल्या वर्षी १०० टक्के निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकल्पाचे भवितव्य पर्यावरण विभागाच्या मान्यतेवर अवलंबून असताना आता कोविडमुळे त्याचे काम थंडावले असून, खर्चातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेने तयार केलेल्या या जलवाहतूक प्रकल्पाच्या ठाणे वसई-कल्याण डीपीआरला ६४५ कोटींची मान्यता मिळाली असून, त्याचे नियोजनाचे काम या वर्षीच्या सुरुवातीपासून सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यातील सुरू झालेल्या वसई ते ठाणे-कल्याण जलमार्ग क्रमांक ५३ या ५० किलोमीटरच्या मार्गावर प्रस्तावामध्ये एका ठिकाणी मल्टिमोडल हब व विविध ठिकाणी १० जेट्टी असून त्यापैकी मीरा-भार्इंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली या ४ जेट्टींची कामे प्रस्तावित आहे. या कामांसाठी ८६ कोटी मंजूर झाले आहेत. मात्र, अद्याप ते मिळलेले नाहीत. तसेच ठाणे ते मुंबई व नवी मुंबई हा ९३ किलोमीटरच्या मार्गावरही १८ जेट्टींची व अनुषंगिक कामे सुरू करायची आहेत. या प्रकल्पांचे प्रस्ताव पर्यावरण विभागाच्या मान्यतेसाठी पाठविले आहेत. परंतु, कोरोनामुळे या प्रकल्पाचे कामही थंडावले आहे. यासाठी प्रति दीड ते दोन कि.मी.साठी १२५ ते १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, तो आता ७१७ कोटींवर पोहोचल्याने जलवाहतुकीसाठी सरकारला मोठा खर्च करावा लागणार आहे.१00 टक्के निधी मिळण्याची शक्यता धूसरकेंद्राने या प्रकल्पाला १०० टक्के निधी देण्याचे मान्य केले, तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप एकत्रित सत्तेत होते. परंतु, मागील वर्षी महाविकास आघाडीचे सरकार सत्तारुढ झाले आणि राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. त्यामुळे आता केंद्र १०० टक्के निधी देण्याचे वचन पाळेल का, याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणे