शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

ठाणेकरांना पुन्हा आश्वासनाचे धरण!

By admin | Updated: January 23, 2017 03:48 IST

ठाणेकरांची तहान भागविण्यासाठी पालिकेला हक्काचे धरण मिळवून देण्याचे वचन शिवसेनेने दिले आहे. शाई, काळू आणि कुशिवली

ठाणे : ठाणेकरांची तहान भागविण्यासाठी पालिकेला हक्काचे धरण मिळवून देण्याचे वचन शिवसेनेने दिले आहे. शाई, काळू आणि कुशिवली अशा तीन ठिकाणच्या धरणांचे प्रस्ताव यापूर्वीच ठाणेकरांसमोर वेगवेगळ्या टप्प्यात पालिकेने मांडले होते. त्यातील नेमके कोणते धरण ठाणेकरांना मिळेल, याबद्दल पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि शिवसेनेच्या नेत्यांनाही अद्याप पुरेशी माहिती नाही. यापूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोबरे धरणाच्या आश्वासनाचा मुद्दा गाजला होता, तर आघाडीच्या सत्तेच्या काळात तत्कालीन मंत्री मधुकर पिचड यांनी ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक महापालिकेला स्वत:चे धरण हवे, असा मुद्दा मांडल्याने तोही चर्चेचा विषय बनला होता. शाई आणि काळू धरणांना पूर्वीपासूनच स्थानिकांचा विरोध आहे. कुशिवली धरणाचा प्रस्ताव फक्त चर्चेत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणेकरांना हक्काचे धरण मिळवून देणार असल्याची घोषणा केल्यानंतर पुन्हा रखडलेल्या धरणाचा मुद्दा चर्चेत आला. महापालिकेने शाई धरणासाठी २००७पासून प्रयत्न सुरू केले. या धरणासाठी ४५० कोटींचा खर्च अपेक्षित होता. (प्रतिनिधी)