शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठाणेकरांना पुन्हा आश्वासनाचे धरण!

By admin | Updated: January 23, 2017 03:48 IST

ठाणेकरांची तहान भागविण्यासाठी पालिकेला हक्काचे धरण मिळवून देण्याचे वचन शिवसेनेने दिले आहे. शाई, काळू आणि कुशिवली

ठाणे : ठाणेकरांची तहान भागविण्यासाठी पालिकेला हक्काचे धरण मिळवून देण्याचे वचन शिवसेनेने दिले आहे. शाई, काळू आणि कुशिवली अशा तीन ठिकाणच्या धरणांचे प्रस्ताव यापूर्वीच ठाणेकरांसमोर वेगवेगळ्या टप्प्यात पालिकेने मांडले होते. त्यातील नेमके कोणते धरण ठाणेकरांना मिळेल, याबद्दल पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि शिवसेनेच्या नेत्यांनाही अद्याप पुरेशी माहिती नाही. यापूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोबरे धरणाच्या आश्वासनाचा मुद्दा गाजला होता, तर आघाडीच्या सत्तेच्या काळात तत्कालीन मंत्री मधुकर पिचड यांनी ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक महापालिकेला स्वत:चे धरण हवे, असा मुद्दा मांडल्याने तोही चर्चेचा विषय बनला होता. शाई आणि काळू धरणांना पूर्वीपासूनच स्थानिकांचा विरोध आहे. कुशिवली धरणाचा प्रस्ताव फक्त चर्चेत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणेकरांना हक्काचे धरण मिळवून देणार असल्याची घोषणा केल्यानंतर पुन्हा रखडलेल्या धरणाचा मुद्दा चर्चेत आला. महापालिकेने शाई धरणासाठी २००७पासून प्रयत्न सुरू केले. या धरणासाठी ४५० कोटींचा खर्च अपेक्षित होता. (प्रतिनिधी)