शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मुलूंडच्या नवघर पूलावरील ट्रकच्या बिघाडामुळे ठाणेकरांना बसला वाहतूक कोंडीचा फटका

By जितेंद्र कालेकर | Updated: August 28, 2023 13:06 IST

ठाणे ते मुंबई मार्गावर दोन तास खोळंबा: तासाभरासाठी चालकांना मिळाली टोलमुक्ती

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुलूंडच्या नवघर उड्डाण पूलावर नाशिक ते मुंबई पूर्व द्रूतगती मार्गावर एक मोठा मालवाहू ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे तो या मार्गावरच सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास बंद पडला होता. त्यामुळे सकाळी ऐन कामाला जाण्याच्या वेळी सुमारे दोन तास या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. कोंडी फोडण्यासाठी टोल न घेण्याचे आदेश पोलिस उपायुक्त विनय राठोड यांनी दिल्याने चालकांना काहीसा दिलासा मिळाला. सकाळी १०.३० नंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

सोमवारी आठवडयाचा पहिलाच दिवस असल्याने आधीच कल्याण, ठाणे मार्गाकडून मुंबईकडे जाणाºया वाहनांची मोठी गर्दी तीन हात नाका ते मुलूंड चेक नाक्याकडे झालेली होती. त्यात मुलूंडच्या नवघर पूलावर एक मोठा मालवाहू ट्रक सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास बंद पडला. हा ट्रक नेमका रस्त्याच्या मधोमध बंद पडला होता. त्यामुळे ठाण्यातून मुंबईकडे कामानिमित्त खासगी वाहनांनी जाणारे शेकडो चाकरमनी हे या ट्रकच्या मागे लागलेल्या रांगांमध्ये अडकून पडले होते. सोमवार आठवडयाच्या पहिल्याच दिवशी कामावर उशिर होत असल्याने अनेकांना मन:स्ताप सहन करावा लागला.

मुंबई आणि ठाणे अशा दोन्ही बाजूच्या वाहतूक पोलिसांसह कोपरी आणि नवघर पोलिसांची पथकेही याठिकाणी मदतीला आली होती. मात्र, तरीही मुलूंडपासून ठाण्याकडे तीन हात नाक्यापर्यंत तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एकीकडे हे वाहन हटविण्यासाठी प्रयत्न सुरु असतांनाच कोंडी कमी करण्यासाठी मुंबई आणि ठाण्याच्या वाहतूक पोलिस उपायुक्तांनी टोल नाक्याच्या अधिकाºयांशी चर्चा करुन सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास टोल न घेताच वाहने सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे या वाहन चालकांना दिलासा मिळाला. शिवाय, कोंडी फुटण्यातही मदत झाली. दरम्यान, १० वाजण्याच्या सुमारास अपघातग्रस्त ट्रकही बाजूला करण्यात यश आले. त्यानंतर १०.३० वाजण्याच्या सुमारास ही वाहतूक कोंडी हळूहळू कमी झाली. साधारण ११ वाजेनंतर ही वाहतूक पूर्वपदावर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एक तास मिळाला टोल दिलासा

वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी सकाळी ९.३० ते १०.३० या एक तासाच्या काळात चालकांकडून टोल घेण्यात आला नाही. त्यामुळे या काळात चालकांना तात्पूरती टोलपासून मुक्ती मिळाली होती.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी