शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

खड्ड्यांमुळे ठाणेकरांना वाहतूककोंडीचा ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST

ठाणे : मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या कामामुळे अवजड वाहनांचा भार शहरात आल्याने वाहतूककोंडीचा फटका ठाणेकरांना वारंवार सहन करावा ...

ठाणे : मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या कामामुळे अवजड वाहनांचा भार शहरात आल्याने वाहतूककोंडीचा फटका ठाणेकरांना वारंवार सहन करावा लागत आहे. अशातच मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलावर बुजविलेले खड्डे पुन्हा उखडले गेल्याने शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास साकेत पूल ते कापूरबावडी आणि कॅडबरी जंक्शनपर्यंत वाहतूककोंडी झाली होती. वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांना पाच मिनिटांच्या अंतरासाठी सुमारे पाऊण तास लागल्याचे चित्र दिसत होते.

मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला पाऊस पडल्यामुळे शनिवारीही पूर्ण करता आले नाही. कामाच्या रखडपट्टीमुळे या मार्गावरील वाहतूक बदल सोमवारपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस ठाणेकरांना वाहतूककोंडीत अडकावे लागण्याची शक्यता आहे. उरण-जेएनपीटीहून सुटणारी हजारो अवजड वाहने मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून ठाण्याच्या दिशेने येत असतात. २८ जुलैला येथील ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर खड्डा पडल्याने तो बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे येथील अवजड वाहतूक महापे, कोपरखैरणे, रबाळे, ऐरोली, मुलुंड टोलनाका, कोपरी पूल मार्गे वळविण्यात आली आहेत. याचा परिणाम कोपरी, तीनहातनाका भागात होऊन वाहतूककोंडी होत आहे. काही ट्रक आणि टेम्पोचालक हे टोल टाळण्यासाठी पटणी, कळवा, विटावा मार्गे ठाणे शहरात येत असल्याने कळवा-विटावा भागातही वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे या मार्गावरही चालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. शनिवारपर्यंत येथील वाहतूक बदल कायम ठेवण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला होता. मात्र, शनिवारीही सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करणे शक्य झाले नसल्याने आता १६ ऑगस्टपर्यंत वाहतूक बदल पोलिसांनी कायम ठेवले आहेत. शुक्रवारी रात्री काम पूर्ण होणार होते. मात्र, पाऊस पडल्याने कामात व्यत्यय आल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. परंतु, त्याचा त्रास वाहनचालकांना नाहक सहन करावा लागत आहे.