शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठाणेकरांना नवीन मीटरचा तुटवडा

By admin | Updated: May 3, 2017 05:39 IST

ठाणे शहरातील महावितरणच्या ग्राहकांना २५ हजार मीटरची गरज असतांना देखील केवळ १२ हजार मीटरच उपलब्ध झाले

ठाणे : ठाणे शहरातील महावितरणच्या ग्राहकांना २५ हजार मीटरची गरज असतांना देखील केवळ १२ हजार मीटरच उपलब्ध झाले असल्याची माहिती समोर आली आहे. महावितरणच्या कार्यालयांमध्ये तुटवडा निर्माण झाल्याने नवीन मीटर बसविणे, जुने मीटर अथवा जळालेले मीटर बदली करावयाचे झाल्यास ग्राहकांना १५ ते २० दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. परंतु, लवकरात लवकर मीटरचाहा तुटवडा भरु न काढण्यात येईल, असा दावा महावितरणने केला आहे. ठाणे शहरातील महावितरणच्या कोलशेत, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर आदी विभागात नविन मीटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत भारनियमन वाढल्याने मीटर जळण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. नविन मीटर बसविणे आणि जुने मीटर बदली करणे आदीबाबत अर्ज देण्यासाठी गेल्यावर महावितरणकडून मीटर बसविण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहक वर्गातून नाराजीचा सुर उमटू लागाला आहे. याबाबत, महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, मार्च एन्डींगच्या काळात नवीन मीटर कार्यालयांना प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले होते. तसेच ठाणे महानगर पालिकेने राबविलेल्या रस्ता रूंदिकरण मोहीमेत बाधीत झालेल्या नागरिकांचे वसंत विहार येथील एमएमआरडीएच्या घरांमध्ये पुनर्वसन केल्यामुळे त्या ठिकाणी नविन मीटरची मागणी वाढल्याचेही महावितरणने स्पष्ट केले. शिवाय काही ठिकाणी नागरिकांकडूनदेखील जुने मीटर बदलून नवीन मीटर बसविण्याबाबतही प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यामुळे एकाच वेळेस जास्तीचा लोड आल्याने ग्राहकांना नवीन मीटरसाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी जाणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले. दरम्यान, ठाणे शहारातील विविध भागात सुमारे २५ हजार नविन मीटर बसविण्यासंदर्भात अर्ज महावितरणला प्राप्त झाले असून त्यापैकी केवळ १२ हजार मीटरच सध्याच्या घडीला प्राप्त झाले असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. तसेच नादुरुस्त मीटरच्या संदर्भातही काहीसा वेळ लागत असल्याचेही सांगण्यात आले आहे. एकूणच एकाच वेळेस एवढी मागणी झाल्याने महावितरणपुढे पेच निर्माण झाला असल्याने नागरिकांच्या त्रासालाही त्यांना सामोरे जावे लागत आहे. (प्रतिनिधी)