शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

ठाणेकरांना नवीन मीटरचा तुटवडा

By admin | Updated: May 3, 2017 05:39 IST

ठाणे शहरातील महावितरणच्या ग्राहकांना २५ हजार मीटरची गरज असतांना देखील केवळ १२ हजार मीटरच उपलब्ध झाले

ठाणे : ठाणे शहरातील महावितरणच्या ग्राहकांना २५ हजार मीटरची गरज असतांना देखील केवळ १२ हजार मीटरच उपलब्ध झाले असल्याची माहिती समोर आली आहे. महावितरणच्या कार्यालयांमध्ये तुटवडा निर्माण झाल्याने नवीन मीटर बसविणे, जुने मीटर अथवा जळालेले मीटर बदली करावयाचे झाल्यास ग्राहकांना १५ ते २० दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. परंतु, लवकरात लवकर मीटरचाहा तुटवडा भरु न काढण्यात येईल, असा दावा महावितरणने केला आहे. ठाणे शहरातील महावितरणच्या कोलशेत, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर आदी विभागात नविन मीटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत भारनियमन वाढल्याने मीटर जळण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. नविन मीटर बसविणे आणि जुने मीटर बदली करणे आदीबाबत अर्ज देण्यासाठी गेल्यावर महावितरणकडून मीटर बसविण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहक वर्गातून नाराजीचा सुर उमटू लागाला आहे. याबाबत, महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, मार्च एन्डींगच्या काळात नवीन मीटर कार्यालयांना प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले होते. तसेच ठाणे महानगर पालिकेने राबविलेल्या रस्ता रूंदिकरण मोहीमेत बाधीत झालेल्या नागरिकांचे वसंत विहार येथील एमएमआरडीएच्या घरांमध्ये पुनर्वसन केल्यामुळे त्या ठिकाणी नविन मीटरची मागणी वाढल्याचेही महावितरणने स्पष्ट केले. शिवाय काही ठिकाणी नागरिकांकडूनदेखील जुने मीटर बदलून नवीन मीटर बसविण्याबाबतही प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यामुळे एकाच वेळेस जास्तीचा लोड आल्याने ग्राहकांना नवीन मीटरसाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी जाणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले. दरम्यान, ठाणे शहारातील विविध भागात सुमारे २५ हजार नविन मीटर बसविण्यासंदर्भात अर्ज महावितरणला प्राप्त झाले असून त्यापैकी केवळ १२ हजार मीटरच सध्याच्या घडीला प्राप्त झाले असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. तसेच नादुरुस्त मीटरच्या संदर्भातही काहीसा वेळ लागत असल्याचेही सांगण्यात आले आहे. एकूणच एकाच वेळेस एवढी मागणी झाल्याने महावितरणपुढे पेच निर्माण झाला असल्याने नागरिकांच्या त्रासालाही त्यांना सामोरे जावे लागत आहे. (प्रतिनिधी)