शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

ठाणेकरांना नवीन मीटरचा तुटवडा

By admin | Updated: May 3, 2017 05:39 IST

ठाणे शहरातील महावितरणच्या ग्राहकांना २५ हजार मीटरची गरज असतांना देखील केवळ १२ हजार मीटरच उपलब्ध झाले

ठाणे : ठाणे शहरातील महावितरणच्या ग्राहकांना २५ हजार मीटरची गरज असतांना देखील केवळ १२ हजार मीटरच उपलब्ध झाले असल्याची माहिती समोर आली आहे. महावितरणच्या कार्यालयांमध्ये तुटवडा निर्माण झाल्याने नवीन मीटर बसविणे, जुने मीटर अथवा जळालेले मीटर बदली करावयाचे झाल्यास ग्राहकांना १५ ते २० दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. परंतु, लवकरात लवकर मीटरचाहा तुटवडा भरु न काढण्यात येईल, असा दावा महावितरणने केला आहे. ठाणे शहरातील महावितरणच्या कोलशेत, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर आदी विभागात नविन मीटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत भारनियमन वाढल्याने मीटर जळण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. नविन मीटर बसविणे आणि जुने मीटर बदली करणे आदीबाबत अर्ज देण्यासाठी गेल्यावर महावितरणकडून मीटर बसविण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहक वर्गातून नाराजीचा सुर उमटू लागाला आहे. याबाबत, महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, मार्च एन्डींगच्या काळात नवीन मीटर कार्यालयांना प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले होते. तसेच ठाणे महानगर पालिकेने राबविलेल्या रस्ता रूंदिकरण मोहीमेत बाधीत झालेल्या नागरिकांचे वसंत विहार येथील एमएमआरडीएच्या घरांमध्ये पुनर्वसन केल्यामुळे त्या ठिकाणी नविन मीटरची मागणी वाढल्याचेही महावितरणने स्पष्ट केले. शिवाय काही ठिकाणी नागरिकांकडूनदेखील जुने मीटर बदलून नवीन मीटर बसविण्याबाबतही प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यामुळे एकाच वेळेस जास्तीचा लोड आल्याने ग्राहकांना नवीन मीटरसाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी जाणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले. दरम्यान, ठाणे शहारातील विविध भागात सुमारे २५ हजार नविन मीटर बसविण्यासंदर्भात अर्ज महावितरणला प्राप्त झाले असून त्यापैकी केवळ १२ हजार मीटरच सध्याच्या घडीला प्राप्त झाले असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. तसेच नादुरुस्त मीटरच्या संदर्भातही काहीसा वेळ लागत असल्याचेही सांगण्यात आले आहे. एकूणच एकाच वेळेस एवढी मागणी झाल्याने महावितरणपुढे पेच निर्माण झाला असल्याने नागरिकांच्या त्रासालाही त्यांना सामोरे जावे लागत आहे. (प्रतिनिधी)