शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

ठाणेकर मुंबईच्या एक पाऊल पुढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 02:57 IST

असे कधीही झाले नाही. ठाणेकरांनी मला कोणत्या कामाला बोलवले होते आणि मी आलो नाही. ठाणेकर ज्यावेळी मला बोलतात, त्यावेळी बहुतेकदा ते मुंबईच्या एक पाऊल पुढे असतात, असे कौतुकोद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले.

ठाणे : असे कधीही झाले नाही. ठाणेकरांनी मला कोणत्या कामाला बोलवले होते आणि मी आलो नाही. ठाणेकर ज्यावेळी मला बोलतात, त्यावेळी बहुतेकदा ते मुंबईच्या एक पाऊल पुढे असतात, असे कौतुकोद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. यावेळी ठाकरे यांच्यापासून पालकमंत्र्यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि महापालिका आयुक्तांचे तोंडभरून कौतुक केले.ठाणे महापालिका आणि क्रस्ना डायग्नोस्टिक्स यांनी पीपीपी तत्वावर कळवा येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ‘सीटी स्कॅन व एमआरआय’ या सेवा रुग्णांसाठी नव्याने माफक दरात उपलब्ध करु न दिल्या आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा ठाकरे यांच्या हस्ते तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, प्रताप सरनाईक, सभागृह नेते नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आदी उपस्थित होते.हे रुग्णालय पाहून ते पालिकेचे आहे यावर विश्वास बसत नाही. ते सर्वोत्तम व माफकही आहे. ही दोन्ही टोळे जुळणे शक्य नसते. मात्र, ते काम महापालिकेने करून दाखवले. मध्यंतरी, हे रुग्णालय सरकारकडे द्यावे, असे बोलणाऱ्यांनी एकदा तरी ते पाहावे, असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला.‘खासदार चिडतात’डॉक्टर असलेले खासदार लाभल्याचे आम्ही भाग्य समजतो. त्यांच्यामुळे आरोग्य सेवा- सुविधा सुरू करण्यात यश आले आहे. तसेच वारंवार सुविधा मागितल्यावर मात्र ते चिडतात, असे आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांनी सांगितले.>‘आयुक्तभाव खाणारे नाहीत’ठाणेकरांसाठी या सुविधा सुरू केल्याबद्दल आयुक्त जयस्वाल यांचे ठाकरे यांनी ठाणेकरांच्या वतीने आभार मानले. ते कधीही नाही म्हणत नाहीत. नाहीतर एखादा आयुक्त कामाची नोट पाठवा, असे म्हणतो. मग, ती नोट धूळ खाते आणि आयुक्त भाव खातात. पण हे आयुक्त भाव खाणारे नाहीत, असे कौतुक त्यांनी केले. स्तुती केल्याबद्दल आयुक्तांनी हात जोडले.>खासदार आणि आयुक्त यांच्यात...खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यक्रमात कौतुक सुरु असताना, पालकमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात आयुक्त आणि खासदार यांच्यात... अशी सुरूवात केली आणि ते थांबले आणि... मी त्या दोघांमध्ये मध्यस्थी करतो, असे बोलत वाक्य पूर्ण केले. टी. चंद्रशेखर यांच्यानंतर ठाण्याचे आयुक्त जयस्वाल यांनी येथील रस्ते मोठे केले. ते इतके मोठे केले आहेत, की, त्या रस्त्यांवर विमान उतरेल. वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी पालिका मेट्रो आणत आहे. हा प्रकल्प राबवणारी देशातील ती पहिलीच महापालिका ठरेल. त्याचा सर्व्हे सुरु असल्याचे ते म्हणाले.