शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसी झोपडीत राहणारा ठाणेकर गरीब कसा?

By संदीप प्रधान | Updated: August 28, 2023 08:33 IST

ठाणे जिल्ह्यात निवाऱ्याचा प्रश्न मुंबई सारखाच जटिल झाला आहे.

कळवा, दिवा खाडीत वर्षानुवर्षे भराव घालून बेकायदा बांधकामे केली आहेत. कळवा खाडीत सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी उभारलेली १२० बेकायदा बांधकामे महापालिकेने जमीनदोस्त केली. कारवाईकरिता गेलेले महापालिकेचे पथक काही घरांना एसी लावलेले पाहून थक्क झाले. अगोदर कच्च्या असलेल्या झोपड्यांच्या जागी आता पक्की घरे उभारली होती व काहींनी आता कुटुंबे वाढल्याने वर मजले चढवले होते. ठाणे जिल्ह्यात निवाऱ्याचा प्रश्न मुंबई सारखाच जटिल झाला आहे.

ठाणे आणि अन्य शहरे ही अत्यंत छोटी गावे होती, स्टेशनच्या लगत वस्ती व बाकी दूरदूरपर्यंत वनराई असे चित्र होते. मुंबईतून १९८०,९० च्या दशकात अचानक लोंढे आदळू लागल्यावर घरांची गरज निर्माण झाली, मग त्यातून अनियंत्रित विकास सुरू झाला. ठाण्यात किमान बरी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील अन्य शहरांतील घरबांधणी भीषण स्वरूपाची आहे. मागणी वाढल्यामुळे घरांचे दर वाढले. ठाण्यात ७० ते ८० लाखांच्या खाली घर नाही. नेमक्या याच परिस्थितीचा गैरफायदा भूमाफिया व राजकीय नेत्यांनी घेतला.

सरकारी, महापालिकेचे आरक्षित भूखंड, खाडी किनारे येथे बेकायदा बांधकामे बिनदिक्कत उभी करू दिली. महापालिका, सरकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हात ओले झाले म्हणून किंवा राजकीय नेत्यांच्या दबावातून बेकायदा पाणी, वीजपुरवठा आदी सुविधांचा पुरवठा केला. नागरी कमाल जमीन धारणा कायदा लागू केल्यावर आपली अतिरिक्त जमीन जाणार या कल्पनेने मुंबईत अशीच बेकायदा बांधकामे करण्यास जमीन मालकांनी प्रोत्साहन दिले. सीआरझेडचे नियम कडक झाल्यावर खाडीकिनारी अतिक्रमणे करून या कायदाच्या मूळ हेतूला हरताळ फासला गेला.

एकेकाळी मध्यमवर्गीय घरात पुरेसे पंखे नसायचे. गॅस सिलिंडर मिळवण्याकरिता सव्यापसव्य करायला लागायचे. एसी व फोन घरात असलेली व्यक्ती श्रीमंत गणली जायची. कळव्यातील झोपडपट्टीत आर्थिक सुबत्ता असलेला मोजका मध्यमवर्ग वास्तव्य करीत होता. खरेतर निवारा ही मूलभूत गरज; पण ठाण्यात घर घेणे आवाक्याबाहेर. शिवाय खाडीत बेकायदा उभारलेले हे घर रेल्वे, बाजारपेठ या दृष्टीने सोयीस्कर असल्याने ते सोडून दूरवर घर कशाला घ्यायचे, असा विचार तेथे राहणाऱ्यांनी केला असेल. शिवाय अधिकृत घर घेतल्यावर महापालिकेचे कर भरणे आले. वडिलांनी किंवा आजोबांनी बांधलेल्या कच्च्या झोपडीच्या ठिकाणी आता सिमेंट काँक्रीटचे पक्के घर उभे केले, वर मजला चढवला, घरात टीव्ही, फ्रीज, एसी आदी सर्व उपकरणे आहेत. ‘राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या’, अशीच

स्थिती नव्हे काय? दुर्दैव हेच की, अधिकृत निवारा ही मूलभूत गरज पूर्ण करणारी राजकीय व्यवस्था उभी राहत नाही; पण एसीसारख्या एकेकाळी चैनीच्या मानल्या गेलेल्या वस्तू खरेदी करणारा ‘ग्राहक’ बेकायदा घरात पिढ्यानपिढ्या वास्तव्य करतो.

टॅग्स :thaneठाणे