शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

एसी झोपडीत राहणारा ठाणेकर गरीब कसा?

By संदीप प्रधान | Updated: August 28, 2023 08:33 IST

ठाणे जिल्ह्यात निवाऱ्याचा प्रश्न मुंबई सारखाच जटिल झाला आहे.

कळवा, दिवा खाडीत वर्षानुवर्षे भराव घालून बेकायदा बांधकामे केली आहेत. कळवा खाडीत सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी उभारलेली १२० बेकायदा बांधकामे महापालिकेने जमीनदोस्त केली. कारवाईकरिता गेलेले महापालिकेचे पथक काही घरांना एसी लावलेले पाहून थक्क झाले. अगोदर कच्च्या असलेल्या झोपड्यांच्या जागी आता पक्की घरे उभारली होती व काहींनी आता कुटुंबे वाढल्याने वर मजले चढवले होते. ठाणे जिल्ह्यात निवाऱ्याचा प्रश्न मुंबई सारखाच जटिल झाला आहे.

ठाणे आणि अन्य शहरे ही अत्यंत छोटी गावे होती, स्टेशनच्या लगत वस्ती व बाकी दूरदूरपर्यंत वनराई असे चित्र होते. मुंबईतून १९८०,९० च्या दशकात अचानक लोंढे आदळू लागल्यावर घरांची गरज निर्माण झाली, मग त्यातून अनियंत्रित विकास सुरू झाला. ठाण्यात किमान बरी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील अन्य शहरांतील घरबांधणी भीषण स्वरूपाची आहे. मागणी वाढल्यामुळे घरांचे दर वाढले. ठाण्यात ७० ते ८० लाखांच्या खाली घर नाही. नेमक्या याच परिस्थितीचा गैरफायदा भूमाफिया व राजकीय नेत्यांनी घेतला.

सरकारी, महापालिकेचे आरक्षित भूखंड, खाडी किनारे येथे बेकायदा बांधकामे बिनदिक्कत उभी करू दिली. महापालिका, सरकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हात ओले झाले म्हणून किंवा राजकीय नेत्यांच्या दबावातून बेकायदा पाणी, वीजपुरवठा आदी सुविधांचा पुरवठा केला. नागरी कमाल जमीन धारणा कायदा लागू केल्यावर आपली अतिरिक्त जमीन जाणार या कल्पनेने मुंबईत अशीच बेकायदा बांधकामे करण्यास जमीन मालकांनी प्रोत्साहन दिले. सीआरझेडचे नियम कडक झाल्यावर खाडीकिनारी अतिक्रमणे करून या कायदाच्या मूळ हेतूला हरताळ फासला गेला.

एकेकाळी मध्यमवर्गीय घरात पुरेसे पंखे नसायचे. गॅस सिलिंडर मिळवण्याकरिता सव्यापसव्य करायला लागायचे. एसी व फोन घरात असलेली व्यक्ती श्रीमंत गणली जायची. कळव्यातील झोपडपट्टीत आर्थिक सुबत्ता असलेला मोजका मध्यमवर्ग वास्तव्य करीत होता. खरेतर निवारा ही मूलभूत गरज; पण ठाण्यात घर घेणे आवाक्याबाहेर. शिवाय खाडीत बेकायदा उभारलेले हे घर रेल्वे, बाजारपेठ या दृष्टीने सोयीस्कर असल्याने ते सोडून दूरवर घर कशाला घ्यायचे, असा विचार तेथे राहणाऱ्यांनी केला असेल. शिवाय अधिकृत घर घेतल्यावर महापालिकेचे कर भरणे आले. वडिलांनी किंवा आजोबांनी बांधलेल्या कच्च्या झोपडीच्या ठिकाणी आता सिमेंट काँक्रीटचे पक्के घर उभे केले, वर मजला चढवला, घरात टीव्ही, फ्रीज, एसी आदी सर्व उपकरणे आहेत. ‘राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या’, अशीच

स्थिती नव्हे काय? दुर्दैव हेच की, अधिकृत निवारा ही मूलभूत गरज पूर्ण करणारी राजकीय व्यवस्था उभी राहत नाही; पण एसीसारख्या एकेकाळी चैनीच्या मानल्या गेलेल्या वस्तू खरेदी करणारा ‘ग्राहक’ बेकायदा घरात पिढ्यानपिढ्या वास्तव्य करतो.

टॅग्स :thaneठाणे