शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

वृक्ष प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका ठाणेकरांना

By अजित मांडके | Updated: May 23, 2024 14:24 IST

वृक्ष छाटणीनंतर फांद्या आजही रस्त्यावर

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :  ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका आता ठाणेकरांना बसत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळा तोंडावर आला असतांना आता कुठे महापालिकेने वृक्षांची छाटणी सुरु केली आहे. मात्र दुसरीकडे मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्मळून पडलेले वृक्ष त्यांच्या फांद्या देखील अद्याप हटविण्यात आलेल्या नाहीत. त्यात आता देखील वृक्षांची छाटणी सुरु असतांना त्याच्या फांद्या देखील रस्त्याच्या कडेला पडून आहेत. त्यामुळे वाहन चालकांना याचा त्रास तर होत आहेच, शिवाय यामुळे डासांचे प्रमाण वाढून आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

येत्या काही दिवसात पावसाला सुरवात होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची कामे ३१ मे पर्यंत मार्गी लावण्याचा शासकीय यंत्रणांचा प्रयत्न आहे. त्यात वृक्ष तोडीनंतर किंवा वृक्षांच्या फांद्या छाटणीनंतर त्या तत्काळ उचलल्या जाव्यात असे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वृक्ष प्राधिकरणाला दिले आहेत. मात्र त्याच्या उलट कारभार वृक्ष प्राधिकरणाकडून सुरु असल्याचे चित्र सध्या ठाण्यात दिसत आहे. त्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ठाण्यात तब्बल ८८ वृक्ष उन्मळून पडले होते. तसेच वृक्षाच्या फांद्या देखील पडल्या होत्या. परंतु आता या घटनेला आठ दिवसाहून अधिकचा काळ लोटला असतांनाही अद्यापही या वृक्षांच्या फांद्या रस्त्याच्या बाजूलाच पडून असल्याचे चित्र शहराच्या विविध भागात दिसत आहे.

ठाणे महापालिकेची यंत्रणा लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने, कामात दिरंगाई झाल्याचा दावा वृक्ष प्राधिकरण विभागाने केला आहे. मात्र आता मनुष्यबळ उपलब्ध झाले असून त्यानुसार काम सुरु करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.  त्यातही शहरात धोकादायक स्थितीत किती वृक्ष आहेत, याची माहिती वृक्ष प्राधिकरण विभागाकडे नाही. दरवर्षी पावसाळ्यात महापालिका हद्दीत वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडत असतात. दरवर्षी हा आकडा वाढतांना दिसत आहे. परंतु त्यावर उपाय योजना करण्यात महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग कुचकामी ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

त्यात अवकाळी पावसाचा फटका ठाणेकरांना बसल्यानंतर आता कुठे वृक्ष प्राधिकरण विभागाने वृक्ष छाटणीची मोहीम हाती घेतली आहे. परंतु वृक्षांच्या फांद्या या रस्त्याच्याच कडेला पडून राहत आहेत. त्याचा त्रास वाहन चालकांना तर होतो आहेच, शिवाय या कचºयाला दुर्गंधी येत असून त्यातून मच्छरांची पैदासही वाढत असून यामुळे आजाराला एकप्रकारे निमंत्रणच देण्याचे काम महापालिका करीत आहे.

या संदर्भात वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी केदार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, आम्हाला या संदर्भात माहिती द्यायला वेळ नाही, वृक्ष कुठे पडले असेल तर सांगा बाकी आम्ही काही सांगू शकत नाही अशी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत.

टॅग्स :thaneठाणे