शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

वृक्ष प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका ठाणेकरांना

By अजित मांडके | Updated: May 23, 2024 14:24 IST

वृक्ष छाटणीनंतर फांद्या आजही रस्त्यावर

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :  ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका आता ठाणेकरांना बसत असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळा तोंडावर आला असतांना आता कुठे महापालिकेने वृक्षांची छाटणी सुरु केली आहे. मात्र दुसरीकडे मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्मळून पडलेले वृक्ष त्यांच्या फांद्या देखील अद्याप हटविण्यात आलेल्या नाहीत. त्यात आता देखील वृक्षांची छाटणी सुरु असतांना त्याच्या फांद्या देखील रस्त्याच्या कडेला पडून आहेत. त्यामुळे वाहन चालकांना याचा त्रास तर होत आहेच, शिवाय यामुळे डासांचे प्रमाण वाढून आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

येत्या काही दिवसात पावसाला सुरवात होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची कामे ३१ मे पर्यंत मार्गी लावण्याचा शासकीय यंत्रणांचा प्रयत्न आहे. त्यात वृक्ष तोडीनंतर किंवा वृक्षांच्या फांद्या छाटणीनंतर त्या तत्काळ उचलल्या जाव्यात असे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वृक्ष प्राधिकरणाला दिले आहेत. मात्र त्याच्या उलट कारभार वृक्ष प्राधिकरणाकडून सुरु असल्याचे चित्र सध्या ठाण्यात दिसत आहे. त्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ठाण्यात तब्बल ८८ वृक्ष उन्मळून पडले होते. तसेच वृक्षाच्या फांद्या देखील पडल्या होत्या. परंतु आता या घटनेला आठ दिवसाहून अधिकचा काळ लोटला असतांनाही अद्यापही या वृक्षांच्या फांद्या रस्त्याच्या बाजूलाच पडून असल्याचे चित्र शहराच्या विविध भागात दिसत आहे.

ठाणे महापालिकेची यंत्रणा लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने, कामात दिरंगाई झाल्याचा दावा वृक्ष प्राधिकरण विभागाने केला आहे. मात्र आता मनुष्यबळ उपलब्ध झाले असून त्यानुसार काम सुरु करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.  त्यातही शहरात धोकादायक स्थितीत किती वृक्ष आहेत, याची माहिती वृक्ष प्राधिकरण विभागाकडे नाही. दरवर्षी पावसाळ्यात महापालिका हद्दीत वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडत असतात. दरवर्षी हा आकडा वाढतांना दिसत आहे. परंतु त्यावर उपाय योजना करण्यात महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग कुचकामी ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

त्यात अवकाळी पावसाचा फटका ठाणेकरांना बसल्यानंतर आता कुठे वृक्ष प्राधिकरण विभागाने वृक्ष छाटणीची मोहीम हाती घेतली आहे. परंतु वृक्षांच्या फांद्या या रस्त्याच्याच कडेला पडून राहत आहेत. त्याचा त्रास वाहन चालकांना तर होतो आहेच, शिवाय या कचºयाला दुर्गंधी येत असून त्यातून मच्छरांची पैदासही वाढत असून यामुळे आजाराला एकप्रकारे निमंत्रणच देण्याचे काम महापालिका करीत आहे.

या संदर्भात वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी केदार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, आम्हाला या संदर्भात माहिती द्यायला वेळ नाही, वृक्ष कुठे पडले असेल तर सांगा बाकी आम्ही काही सांगू शकत नाही अशी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत.

टॅग्स :thaneठाणे