शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भीतीच्या चक्रीवादळात सापडले ठाणेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 01:08 IST

सोशल मीडियावर घबराटीच्या सरी : कोरोनाचे भय गेले वाहून

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सोशल मीडिया व मीडियावर मंगळवारपासून पिटण्यात आलेला ‘निसर्ग’ वादळाचा डंका, मुंबई-ठाण्याच्या गाठीशी वादळांचा तुरळक असलेला पूर्वानुभव यामुळे बुधवारी घराबाहेरील वादळाच्या प्रत्यक्ष थैमानापेक्षा ठाणेकरांच्या मनात भीतीचे चक्रीवादळ घोंघावत होते. सायंकाळी ठाणेकरांनी अखेरीस भीती संपल्याबद्दल आणि गेले काही दिवस सहन करीत असलेल्या उन्हाच्या काहिलीतून सुटका झाल्याबद्दल सुस्कारा सोडला.

कोरोनामुळे घरात लॉकडाउन असलेल्या ठाणेकरांना बुधवारपासून मॉर्निंग वॉकला जाण्याची व खुल्या जीममध्ये व्यायामाची मुभा मिळाली होती. परंतु मंगळवारपासून सोशल मीडिया व मीडियावर वादळीची भीती द्विगुणीत करणारे संदेश आल्याने आता या नव्या संकटाने काय वाढून ठेवलेय, अशी भीती ठाणेकरांच्या मनात निर्माण झाली होती. त्यातच अनेक नगरसेवक, आमदार यांनी आपल्या मतदारसंघातील व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर निसर्ग वादळाचा ताशी वेग १०० ते १२० किमी असणार असल्याने घरीच सुरक्षित राहण्याचा सल्ला देणारे संदेश पाठवले होते. अनेक वाहिन्यांनी वेगवेगळ््या समुद्रकिनाऱ्यांवर उभे केलेले वार्ताहर त्यांच्या पाठीमागे उसळणाºया लाटांपेक्षा अधिक उंच भयाच्या लाटा मनामनात उसळतील अशी खबरदारी घेण्याची वर्णने करीत असल्याने ठाणेकर गारठले.

गेले काही दिवस कोरोनाच्या बातम्या व नकारात्मक मानसिकतेत असलेल्या नागरिकांनी वादळाची भीती घेतली होती. मुंबई, ठाणे परिसराच्या भौगोलिक रचनेमुळे बरेचदा वादळे या परिसराच्या वाट्याला जात नाहीत. मात्र ‘निसर्ग’ वादळ अखेर दुपारी एक वाजता कोकण किनारपट्टीवर धडकले. दुपारी तीन ते पाच या वेळात ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, शहापूर वगैरे भागात सोसाट्याच्या वाºयासह या वादळाने पिंगा घातला. झाडे कोसळणे, घराचे पत्रे उडवून लावणे यापेक्षा जास्त नुकसान या वाºयाने झाले नाही. मात्र ठाणेकरांच्या मनात थैमान घालणारे भीतीचे वादळ हे प्रत्यक्षातील वादळापेक्षा कितीतरी भीषण असल्याने घराबाहेरच्या वादळाने ते विचलीत झाले नाहीत.स्थलांतरामुळे हानी टळलीच्नवी मुंबईतील खाडी किनारी वास्तव्य करणाºया ६३ नागरिकांचे शाळा क्रमांक ४ येथे तर, मीरा भार्इंदर व उत्तन या भागात समुद्रकिनारी राहणाºया ७०० नागरिकांचे विविध ठिकाणी स्थलांतरित केले.च्कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतीसह गणेशघाट, खाडी किनारची झोपडपट्टी, वालधुनी आणि नेतवली परिसरातील ५०० नागरिकाना, तसेच ग्रामीण भागातील म्हारळ, वरप, जू गाव आणि कांबा या चार गावातील ४०० जणांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हलवले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. खाडीकिनारी वास्तव्य करणाऱ्यांचे सुरक्षित स्थळी केलेल्या स्थलांतरामुळे मोठी हानी टळली.

भिवंडीतही झाडे पडलीभिवंडी : भिवंडीत मार्कंडेश्वर मंदिर परिसर , नारपोली येथे मोतीबाई तलाव, सालाउद्दीन हायस्कूल, सोहम हॉस्पिटल परिसर तसेच निशान हॉटेल समोर तसेच शाह आदाम रोडवरील पीर बाबा दर्गा, तसेच दिवान शहा दर्गा अशा सात ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. झाडे घरांवर पडल्यामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दुपारनंतर डोंबिवली, कल्याणमध्ये सामसूमडोंबिवली : चक्रीवादळ व सोसाट्याचा वारा यामुळे पूर्वेत पाच ठिकाणी वृक्ष, झाडाच्या फांद्या पडल्या तर सारस्वत कॉलनीमध्ये एका इमारतीवरील पत्रे उडाले. सकाळच्या वेळी पाऊस असला तरीही जनजीवन सुरळीत होते, दुपारी २ नंतर मात्र रस्त्यावर तुरळक वाहने, वर्दळ दिसून आली. पावसाची संततधार असली तरी शहरात कुठेही पाणी साचल्याने नुकसान झाले नाही. पेडसेंनगर भागात वीज वाहिनीवर झाडाची फांदी पडल्याने काही काळ त्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.