शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

ठाणेकरांना आणखी अडीच वर्षे पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:24 IST

गेले काही महिने महापौर मीनाक्षी शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या वादावर पडदा पडल्याचे दिसत होते.

ठाणे : गेले काही महिने महापौर मीनाक्षी शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या वादावर पडदा पडल्याचे दिसत होते. मात्र, सोमवारी झालेल्या महासभेत या दोघांमध्ये पुन्हा पाणीटंचाईच्या मुद्यावर चांगलीच खडाजंगी झाल्याचे दिसून आले. तसेच आयुक्तांनी ठाणे शहरातील पाण्याची समस्या सुटण्यासाठी आणखी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी जाणार असल्याचे स्पष्ट केले.आयुक्तांनी यावेळी पाणीसमस्या सोडविण्यासाठी कशा प्रकारे विविध योजनांवर काम केले जात आहे, याची माहिती सभागृहाला दिली. मात्र, केवळ तांत्रिक माहिती देऊन उपयोग होत नाही. प्रत्यक्षात काय काम करता, याची उत्तरे आधी द्या, असा सवाल करून महापौरांनी आयुक्तांना धारेवर धरल्याचे दिसून आले. मात्र, मी कोणत्याही प्रकारे तांत्रिक मुद्दे उपस्थित केले नाहीत. उलट, जी कामे सुरूआहेत, जी प्रस्तावित आहेत, ज्या कामांच्या निविदा काढल्या आहेत, त्याविषयी बोलत होतो असे सांगून आयुक्तांनी पुन्हा महापौरांच्या वक्तव्यावर पलटवार केला.>पाणीसाठवण क्षमता कमी असल्यामुळे समस्यासोमवारी महासभा सुरूहोताच, सर्वपक्षीय सदस्यांनी पाणीसमस्येला वाचा फोडली. त्यात पाणीपुरवठा विभागाकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने लोकप्रतिनिधी अधिक संतप्त झाले होते. अखेर, यावर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हस्तक्षेप करून शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असून नियोजन कमी पडत असल्याचे सांगून यावर उपाययोजना सुरू असल्याचे स्पष्ट केले. मुबलक पाणी येत असताना साठवणुकीची क्षमता आपल्याकडे कमी असल्याचे सांगून त्यानुसार नव्याने जलकुंभ उभारण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, मागील चार वर्षांपूर्वी साठवणुकीचा दर २१ टक्के होता. तो आता २८ टक्कयांवर आला असून येत्या काळात तो ३३ टक्कयांवर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. घोडबंदर भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी त्याठिकाणी रिमॉडेलिंगची योजना सुरूअसून दीड ते दोन महिन्यांत या भागाची पाणीटंचाई दूर होणार असल्याचे सांगितले. जलकुंभांची २५ कोटींची कामे सुरूआहेत. घोडबंदरसाठी ५० कोटींची योजना सुरू आहे. तर कळवा, मुंब्रा आणि दिव्याची तहान भागविण्यासाठी २२० कोटींच्या रिमॉडेलिंगच्या योजनेला मान्यता दिली आहे. काही दिवसांत काम सुरूही होईल. जलकुंभात पाणी किती आहे, पाणी कमी आले, यासाठी फ्लाइंग मीटर आणि स्काडा यंत्रणा सक्षम केली असल्याचे त्यांनी सांगितले.आयुक्तांच्या उत्तरावर महापौरांची नाराजी : आयुक्तांनी दिलेल्या या उत्तरावर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. आपण केवळ तांत्रिक मुद्यांवरच चर्चा केल्याचा ठपका ठेवून प्रत्यक्षात काय कामे केली, याचा कुठेही ऊहापोह झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. अनधिकृत नळजोडण्यांबाबत काय करणार, विकासकांना ओसी मिळण्याआधीच नवीन वाहिन्या कशा टाकून दिल्या जातात, पाणीबिलांची वसुली वेळेवर का होत नाही, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना त्यावर उपाययोजना काय केली, गढूळ, दूषित पाणी काही भागांना येत असताना त्यावर उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे, पाच-पाच वर्षे सोसायट्यांना बिले आकारली जात नाहीत, मनुष्यबळाची कमतरता असताना त्यावर काहीच होताना दिसत नाहीत. असे अनेक महत्त्वाचे मुद्दे असून त्यावर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली.