शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांना आणखी अडीच वर्षे पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:24 IST

गेले काही महिने महापौर मीनाक्षी शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या वादावर पडदा पडल्याचे दिसत होते.

ठाणे : गेले काही महिने महापौर मीनाक्षी शिंदे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या वादावर पडदा पडल्याचे दिसत होते. मात्र, सोमवारी झालेल्या महासभेत या दोघांमध्ये पुन्हा पाणीटंचाईच्या मुद्यावर चांगलीच खडाजंगी झाल्याचे दिसून आले. तसेच आयुक्तांनी ठाणे शहरातील पाण्याची समस्या सुटण्यासाठी आणखी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी जाणार असल्याचे स्पष्ट केले.आयुक्तांनी यावेळी पाणीसमस्या सोडविण्यासाठी कशा प्रकारे विविध योजनांवर काम केले जात आहे, याची माहिती सभागृहाला दिली. मात्र, केवळ तांत्रिक माहिती देऊन उपयोग होत नाही. प्रत्यक्षात काय काम करता, याची उत्तरे आधी द्या, असा सवाल करून महापौरांनी आयुक्तांना धारेवर धरल्याचे दिसून आले. मात्र, मी कोणत्याही प्रकारे तांत्रिक मुद्दे उपस्थित केले नाहीत. उलट, जी कामे सुरूआहेत, जी प्रस्तावित आहेत, ज्या कामांच्या निविदा काढल्या आहेत, त्याविषयी बोलत होतो असे सांगून आयुक्तांनी पुन्हा महापौरांच्या वक्तव्यावर पलटवार केला.>पाणीसाठवण क्षमता कमी असल्यामुळे समस्यासोमवारी महासभा सुरूहोताच, सर्वपक्षीय सदस्यांनी पाणीसमस्येला वाचा फोडली. त्यात पाणीपुरवठा विभागाकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने लोकप्रतिनिधी अधिक संतप्त झाले होते. अखेर, यावर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हस्तक्षेप करून शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असून नियोजन कमी पडत असल्याचे सांगून यावर उपाययोजना सुरू असल्याचे स्पष्ट केले. मुबलक पाणी येत असताना साठवणुकीची क्षमता आपल्याकडे कमी असल्याचे सांगून त्यानुसार नव्याने जलकुंभ उभारण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, मागील चार वर्षांपूर्वी साठवणुकीचा दर २१ टक्के होता. तो आता २८ टक्कयांवर आला असून येत्या काळात तो ३३ टक्कयांवर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. घोडबंदर भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी त्याठिकाणी रिमॉडेलिंगची योजना सुरूअसून दीड ते दोन महिन्यांत या भागाची पाणीटंचाई दूर होणार असल्याचे सांगितले. जलकुंभांची २५ कोटींची कामे सुरूआहेत. घोडबंदरसाठी ५० कोटींची योजना सुरू आहे. तर कळवा, मुंब्रा आणि दिव्याची तहान भागविण्यासाठी २२० कोटींच्या रिमॉडेलिंगच्या योजनेला मान्यता दिली आहे. काही दिवसांत काम सुरूही होईल. जलकुंभात पाणी किती आहे, पाणी कमी आले, यासाठी फ्लाइंग मीटर आणि स्काडा यंत्रणा सक्षम केली असल्याचे त्यांनी सांगितले.आयुक्तांच्या उत्तरावर महापौरांची नाराजी : आयुक्तांनी दिलेल्या या उत्तरावर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. आपण केवळ तांत्रिक मुद्यांवरच चर्चा केल्याचा ठपका ठेवून प्रत्यक्षात काय कामे केली, याचा कुठेही ऊहापोह झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. अनधिकृत नळजोडण्यांबाबत काय करणार, विकासकांना ओसी मिळण्याआधीच नवीन वाहिन्या कशा टाकून दिल्या जातात, पाणीबिलांची वसुली वेळेवर का होत नाही, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना त्यावर उपाययोजना काय केली, गढूळ, दूषित पाणी काही भागांना येत असताना त्यावर उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे, पाच-पाच वर्षे सोसायट्यांना बिले आकारली जात नाहीत, मनुष्यबळाची कमतरता असताना त्यावर काहीच होताना दिसत नाहीत. असे अनेक महत्त्वाचे मुद्दे असून त्यावर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली.