शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
4
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
5
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
6
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
7
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
8
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
9
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
10
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
11
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
12
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
13
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
14
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
15
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
16
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
17
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
18
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
19
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
20
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका

पावसाळ्यातील घामोळ्याने ठाणेकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पावसाने मागील १० दिवसांपासून दडी मारल्याने पुन्हा तापमानात वाढ झाली असून, शनिवारी ठाणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : पावसाने मागील १० दिवसांपासून दडी मारल्याने पुन्हा तापमानात वाढ झाली असून, शनिवारी ठाणे शहरात ३६ अंश तापमानाची नोंद झाली. कमालीचा उकाडा वाढल्याने पुन्हा एसी, पंखे यांचा वापर वाढला आहे. पावसाळी सहलीचे बेत केलेल्यांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्याने कपाटातून काढलेल्या छत्र्या, रेनकोट यांची अडगळ वाटू लागली आहे.

पावसाने गेले किमान १० दिवस विश्रांती घेतल्याने ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांचे तापमान वाढले आहे. यंदा पावसाने सुरुवातीलाच जोर पकडल्याने हवेत छान गारवा आला होता. अनेकांनी बंदी झुगारून धबधबे, नद्या, ओढे येथे पावसाळी सहलीचा आनंद घेतला. काहींनी आजच्या शनिवारी व उद्याच्या रविवारी लोणावळा, कर्जत येथे भिजायला जाण्याचे प्लान केले होते. मात्र सध्या पडणाऱ्या चकचकीत उन्हामुळे त्यांना त्यांचे बेत रहित करावे लागले. हवेतील उष्मा वाढल्याने घरातच पंखे, एसी लावून बसण्याची वेळ आल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. जुलै महिना उजाडला तरी पावसाची चिन्हे दिसत नसल्याने सारेच बेचैन झाले आहेत. शहरात झालेली बेसुमार वृक्षतोड, वाढलेले काँक्रीटचे जंगल यांमुळे शहरांचे तापमान मागील काही वर्षांत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जूनमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पाऊस पडला होता. त्यानंतर हवामान खात्याने एक-दोन वेळा मुंबई व उपनगरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता; परंतु पावसाने हवामान खात्याला दरवर्षीप्रमाणे यंदाही तोंडघशी पाडले. शनिवारी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी शहरात ३६ अंश तापमानाची नोंद झाली. सर्वांत कमी तापमानाची नोंद सकाळी सहा वाजता २७ अंश सेल्सिअस इतकी झाली. पारा ३५ अंशांच्या पुढे गेल्याने व तब्बल पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ठाणे जिल्ह्यातील शहरांत लसदर्शन झाल्याने लसीकरण केंद्रांवर शनिवारी तुफान गर्दी होती. ज्येष्ठ नागरिक, महिला यांचे उन्हाच्या तडाख्यात लसीकरणाकरिता रांगेत उभे राहून हाल झाले. पावसापासून संरक्षण करण्याकरिता खरेदी केलेल्या छत्रीचा वापर अनेकांनी या रांगेत उन्हाचा सामना करण्यासाठी केला.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरीही पावसाने दडी मारल्याने हवालदिल झाले आहेत. सुरुवातीला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी भातशेतीची कामे सुरू केली. मात्र आता पाऊस गायब झाल्याने पिकाचे नुकसान होण्याची भीती त्यांना सतावत आहे.

...........

वाचली