शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अन्नधान्य, किराणा खरेदीसाठी ठाणेकरांनी केली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST

स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्यात सोमवार रात्रीपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, वाढती रुग्णसंख्या पाहता ...

स्नेहा पावसकर

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : राज्यात सोमवार रात्रीपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, वाढती रुग्णसंख्या पाहता कधीही लॉकडाऊन होऊ शकेल, या विचाराने सामान्य ठाणेकर सोमवारी सकाळीच अन्नधान्य, किराणा सामान खरेदीसाठी घराबाहेर पडलेले दिसले. तर मार्केट, शॉपिंग प्लाझा या ठिकाणीही मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली.

मागच्या वर्षी याच महिन्यात कडक लॉकडाऊन होता. अगदी काही तासांसाठी तिही ठराविक भागातील दुकाने सुरू राहायची. त्यामुळे अन्नधान्य, खाण्याच्या वस्तूही विकत, प्रसंगी जास्त पैसे देऊन तरी मिळतात का, त्यासाठी ठिकठिकाणी फिरायला लागायचे. तिथे जाताना वाटेत पाेलीस अडवणूक करायचे. आणि इतके करूनही हवी असलेली वस्तू मिळायचीच असे नाही. कारण त्यादरम्यान सगळ्याचा तुटवडा होता. शॉपिंग प्लाझामध्ये जायचे म्हटले तर तासन् तास रांगेत उभे राहावे लागायचे. हे कटू अनुभव अनेकांनी घेतलेले आहेत. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना सरकारने कडक निर्बंध घातले आहेत, तर नागरिकांनी निर्बंधांचे पालन केले नाही तर कारवाई करण्याबरोबरच लॉकडाऊनचे संकेतही यापूर्वीच दिले आहेत. आणि दररोज वाढते रुग्ण पाहता कधीही लॉकडाऊन जाहिर होईल, अशी भीती आणि चर्चा ठाणेकरांमध्ये रविवारपासूनच होती. सरकार पहिले काही दिवस निर्बंध घालून पाहील आणि मग लॉकडाऊन लावेल, अशी भीती नागरिकांत दिसते आहे. आणि या भीतीमुळेच सोमवारी सकाळी सामान्य ठाणेकर किराणा वस्तू, खाद्यपदार्थ, भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. ठाणे मार्केट परिसर, शहरातील विविध शॉपिंग बाझार येथे सकाळपासून गर्दी झालेली पाहायला मिळाली. साठवण करण्याच्या दृष्टीने ठाणेकर सामान खरेदी करत होते. ‘लॉकडाऊन झाले तर मग कुठे धावपळ करायची, अशी चर्चा त्यांच्यामध्ये ऐकायला मिळत होती.