शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
2
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
3
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
4
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
5
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
6
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
7
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
8
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
9
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
10
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
11
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
12
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
13
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
14
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
15
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
16
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
17
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
18
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
19
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
20
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा परिषदेत सत्ताधारी शिवसेनेमध्ये धुसफूस सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 00:44 IST

जिल्हा परिषदेत शिवसेनेसह राष्टÑवादी आणि भाजपाची सत्ता आहे.

ठाणे : कल्याण ग्रामीणमध्ये तीव्र पाणीटंचाईमुळे शिवसेनेच्या खासदारांना गाडीतून उतरू दिले जात नसल्याच्या मुद्यासह गाव भरला मामाचा अन् कोणी नाही कामाचा, असा टोला जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी शिवसेनेच्या सदस्यांनी आपल्याच सत्ताधाऱ्यांना मारल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात रंगली होती. यामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांमध्ये आपापसांत धुसफूस सुरू असल्याचे उघड झाले आहे.जिल्हा परिषदेत शिवसेनेसह राष्टÑवादी आणि भाजपाची सत्ता आहे. मात्र, गुरुवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधाऱ्यांविरोधात शिवसेनेच्याच सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कल्याण ग्रामीणमध्ये सुरू असलेल्या पाण्याच्या तीव्र पाणीटंचाईचा मुद्दा चर्चेला आला असता, त्यावर सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांनीच तोंडसुख घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची निरंकुश सत्ता जि.प.त आहे. या आघाडीत भाजपाचाही समावेश करण्यात आला. मात्र, सत्ताधारी शिवसेना सदस्यांचीच कामे अडकत असल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे. स्थायी समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. जिल्ह्यातील पाणीटंचाईचा मुद्दा चर्चेत आल्यावर, कल्याण ग्रामीणमधील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यात आले. टंचाईमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. चक्क विद्यमान खासदारांनाच दौरा करताना गाडीतून उतरू दिले जात नसल्याचे वास्तव उघड करून जिल्हा परिषदेतील सत्ता काय कामाची, असा सवाल यावेळी शिवसेनेच्या नाराज सदस्यांनी केल्याचे सांगितले जात आहे.शिवसेनेच्या भिवंडीमधील एका ज्येष्ठ सदस्याने सत्ताधारी व प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. जिल्हा परिषदेत सत्ता असूनही अनेक प्रश्न रखडले आहेत. काही जणांना उगाचच महत्त्व दिले जाते. परंतु, त्याचा विकासकामांवर काहीही परिणाम झालेला नाही. गाव भरला मामाचा अन् कोणी नाही कामाचा, असा टोला मारून या सदस्याने आपल्याच सत्तेविरोधात विधान केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.शिवसेनेतील अस्वस्थता उघड : जिल्हा परिषदेत शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे. केवळ एक सदस्य कमी असतानाही, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत निम्मा वाटा देण्यात आला. त्यानंतर, भाजपला एक सभापतीपद देण्यात आले. त्यामुळे पदांवरून वाद सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजूषा जाधव व चौघा सभापतींना कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पायउतार व्हावे लागले. आता पुढील अडीच वर्षांत पुन्हा प्रस्थापितांच्याच नावांची चर्चा असल्यामुळे शिवसेनेच्या बहुतांशी सदस्यांमधून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळातही जिल्हा परिषदेत धुसफूस वाढण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.

टॅग्स :thaneठाणे