शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा परिषदेत सत्ताधारी शिवसेनेमध्ये धुसफूस सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 00:44 IST

जिल्हा परिषदेत शिवसेनेसह राष्टÑवादी आणि भाजपाची सत्ता आहे.

ठाणे : कल्याण ग्रामीणमध्ये तीव्र पाणीटंचाईमुळे शिवसेनेच्या खासदारांना गाडीतून उतरू दिले जात नसल्याच्या मुद्यासह गाव भरला मामाचा अन् कोणी नाही कामाचा, असा टोला जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी शिवसेनेच्या सदस्यांनी आपल्याच सत्ताधाऱ्यांना मारल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात रंगली होती. यामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांमध्ये आपापसांत धुसफूस सुरू असल्याचे उघड झाले आहे.जिल्हा परिषदेत शिवसेनेसह राष्टÑवादी आणि भाजपाची सत्ता आहे. मात्र, गुरुवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधाऱ्यांविरोधात शिवसेनेच्याच सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कल्याण ग्रामीणमध्ये सुरू असलेल्या पाण्याच्या तीव्र पाणीटंचाईचा मुद्दा चर्चेला आला असता, त्यावर सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांनीच तोंडसुख घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची निरंकुश सत्ता जि.प.त आहे. या आघाडीत भाजपाचाही समावेश करण्यात आला. मात्र, सत्ताधारी शिवसेना सदस्यांचीच कामे अडकत असल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे. स्थायी समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. जिल्ह्यातील पाणीटंचाईचा मुद्दा चर्चेत आल्यावर, कल्याण ग्रामीणमधील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यात आले. टंचाईमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. चक्क विद्यमान खासदारांनाच दौरा करताना गाडीतून उतरू दिले जात नसल्याचे वास्तव उघड करून जिल्हा परिषदेतील सत्ता काय कामाची, असा सवाल यावेळी शिवसेनेच्या नाराज सदस्यांनी केल्याचे सांगितले जात आहे.शिवसेनेच्या भिवंडीमधील एका ज्येष्ठ सदस्याने सत्ताधारी व प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. जिल्हा परिषदेत सत्ता असूनही अनेक प्रश्न रखडले आहेत. काही जणांना उगाचच महत्त्व दिले जाते. परंतु, त्याचा विकासकामांवर काहीही परिणाम झालेला नाही. गाव भरला मामाचा अन् कोणी नाही कामाचा, असा टोला मारून या सदस्याने आपल्याच सत्तेविरोधात विधान केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.शिवसेनेतील अस्वस्थता उघड : जिल्हा परिषदेत शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे. केवळ एक सदस्य कमी असतानाही, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत निम्मा वाटा देण्यात आला. त्यानंतर, भाजपला एक सभापतीपद देण्यात आले. त्यामुळे पदांवरून वाद सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजूषा जाधव व चौघा सभापतींना कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पायउतार व्हावे लागले. आता पुढील अडीच वर्षांत पुन्हा प्रस्थापितांच्याच नावांची चर्चा असल्यामुळे शिवसेनेच्या बहुतांशी सदस्यांमधून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळातही जिल्हा परिषदेत धुसफूस वाढण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.

टॅग्स :thaneठाणे