शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

ठाण्यात जागोजागी बॅनर वॉर सुरू

By admin | Updated: February 2, 2017 03:13 IST

ठाण्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वॉर सुरू असतानाच शहराच्या विविध भागांत परस्परांचे वाभाडे काढणारे बॅनर लावल्याने सगळ्यांच्याच नजरा ‘बॅनर वॉर’कडे

ठाणे : ठाण्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वॉर सुरू असतानाच शहराच्या विविध भागांत परस्परांचे वाभाडे काढणारे बॅनर लावल्याने सगळ्यांच्याच नजरा ‘बॅनर वॉर’कडे खिळल्या आहेत. यामध्ये शिवसेनेने ‘२५ वर्षांच्या विकासाची’, भाजपाने ‘सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदी, भ्रष्टाचारमुक्ती’ अशा आशयाचे तर राष्ट्रवादीच्या वतीने ‘२५ वर्षे नाकर्तेपणाची’ आणि मनसेनेदेखील ‘मला भ्रष्टाचाराचा मार्ग मान्य नाही’, अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. त्यामुळे आता विविध राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक वादाबरोबरच बॅनर वॉर भडकणार असल्याचे चित्र आहे.ठाण्यात आता खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकीचा माहोल तयार झाल्याचे दिसून येत आहे. मागील २५ वर्षे सत्तेत असलेले शिवसेना आणि भाजपा हे वेगळे झाल्याने ठाण्यात प्रथमच शिवसेना विरुद्ध भाजपा असे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाने आयोजित केलेल्या मेळाव्यात शिवसेना नेतृत्वाच्या थेट दाढीलाच हात घातला होता. तसेच २५ वर्षांतील भ्रष्टाचाराचीही आठवण करून दिली होती, तर शिवसेनेनेदेखील भाजपावर पलटवार करून तुमच्याकडील मोदी पण दाढीवाले आहेत, असा टोला लगावला होता. विशेष म्हणजे यापूर्वी राष्ट्रवादीकडून तर शिवसेनेवर हल्ला सुरू होताच, त्यात आता भाजपाची आणि मनसेचीदेखील भर पडली आहे. एकूणच हे राजकीय डावपेच एवढ्यावरच थांबले नसून आता पुढील टप्पा बॅनरबाजीने सुरू झाला आहे. सध्या शहरातील घोडबंदर, हाय वे, हरिनिवास सर्कल, मुख्य चौकांत लावण्यात आलेले विविध आशयांचे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. एकीकडे शिवसेनेने लावलेल्या बॅनरवर ‘२५ वर्षे विश्वासाची, २५ वर्षे विकासाची’ असा उल्लेख करत केलेल्या कामांचे छायाचित्र लावले आहे. दुसरीकडे भाजपाने ‘देशातील सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदी, भ्रष्टाचारमुक्ती’ याचे श्रेय घेत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. (प्रतिनिधी)