शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
3
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
4
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
5
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
6
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
7
"जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
8
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
9
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
10
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
12
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
13
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
14
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
15
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
16
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
17
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
18
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
19
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
20
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!

ठाण्यात पाणी चोरीला ‘अभय’

By admin | Updated: January 6, 2016 01:07 IST

अनधिकृत नळ जोडणीसाठी राबविण्यात येत असलेली अभय योजना प्रशासनाने बंद करुन अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

ठाणे : अनधिकृत नळ जोडणीसाठी राबविण्यात येत असलेली अभय योजना प्रशासनाने बंद करुन अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा नळजोडणीच्या बाजूने मंगळवारी स्थायी समितीचे काही सदस्य उतरले. मात्र, अभय योजनेच्या माध्यमातून ब्लॅकमेलींग करु पाहणाऱ्या ग्राहकांना अभय का द्यायचे असा मुद्दा उपस्थित करुन प्रशासनाने या योजनेला अभय देण्यास नकार दिला. परंतु, केवळ यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते, तिला मुदतवाढ द्यावी अशी मागणी सदस्यांनी रेटून धरली. ठाणे महापालिकेने पाणी बिलाची वसुली करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्या, थकबाकीदारांचे कनेक्शन तोडण्याची कारवाई पालिकेने सुरु आहे. परंतु, पाण्याचे बिलच आले नसतांना अशा प्रकारे कारवाई का केली जात आहे, असा सदस्य रामभाऊ तायडे यांनी प्रशासनाला केला. तर अनधिकृत कनेक्शन तोडण्याऐवजी त्यांना अभय योजनेत आणा अशी भूमिका सदस्य संजय वाघुले यांनी मांडली. दरम्यान, काही ग्राहकांना मागील १० वर्षापासून पाण्याची बिलेच वितरत केली नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. ती दिली तर ग्राहक ते भरतील. परंतु, पैसे भरण्यासाठी जर ग्राहक प्रभाग समिती कार्यालयात गेले तरीदेखील आधी बिल आणा अशी मागणी अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे ही कारवाईची मोहीम थांबवून प्रथम ग्राहकांना बिलांचे वाटप करावे अशी मागणीही सदस्यांनी केली. मात्र, पाणी विभागाचे मते आमच्याकडून ही कारवाई सुरु असून बिले वाटपाचे काम हे कर विभागाकडून केले जात आहे. त्यांच्याकडून हे काम होत नसल्यानेच अशा प्रकारे सरसकट ग्राहकांवर कारवाई करावी लागत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली. त्यामुळे ज्यांची थकबाकी असेल अथवा जे अभय योजनेत असतील त्यांच्यासाठी त्याच ठिकाणी बिले देण्याची परवानगी देऊन ग्राहकांनाही पुढील तीन दिवसात बिल भरण्याची मुदत दिल्यास हा प्रश्न सुटणार असल्याचा दावा त्यांनी केला. या संदर्भातील पत्र वरीष्ठांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, त्यांनीच कारवाईचे आदेश दिल्यानेच कारवाई करावीच लागते असेही त्यांनी स्पष्ट केले. यावर उपाय म्हणून अभय योजनेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी, वाघुले यांनी पुन्हा लावून धरली. तर दुसरीकडे शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत यांनी मात्र या योजनेला विरोध करून थकबाकीदारांवर कारवाई करा अशी मागणी केली. त्यानुसार अशा प्रकारे अभय योजनेच्या माध्यमातून थकबाकी ठेवून वर्षानुवर्षे फुकट पाणी वापरणाऱ्या आणि ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांसाठी ही योजना बंदच असणे योग्य असल्याचे मत प्रभारी आयुक्त अशोक रणखांब यांनी व्यक्त केले.