शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
4
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
5
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
6
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
7
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
8
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
9
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
10
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
11
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
12
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
13
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
14
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
15
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
16
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
17
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
18
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
19
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
20
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले

ठाणे आयुक्तालयातील १५० ठिकाणांना धोका

By admin | Updated: November 14, 2015 23:54 IST

देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घातपाताच्या घटना लक्षात घेऊन तत्पूर्वी ठाणे शहर पोलिसांनी आयुक्तालयातील पाचही परिमंडळांत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता

ठाणे : देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घातपाताच्या घटना लक्षात घेऊन तत्पूर्वी ठाणे शहर पोलिसांनी आयुक्तालयातील पाचही परिमंडळांत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांचा सहा महिन्यांपूर्वी शोध घेतला आहे. त्या ठिकाणांचे तीन गटांत वर्गीकरण करून त्यानुसार जवळपास १२५ ते १५० ठिकाणे निश्चित केली आहेत. या सर्वेक्षणात कल्याण परिमंडळात सर्वाधिक ठिकाणे असल्याचे समोर आले असून त्यांची नावे सांगण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला आहे. शनिवारी फ्रान्समधील पॅरीसमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनी या सर्व ठिकाणांसह शहरात हाय अ‍ॅलर्ट जारी करून पोलिसांचा फौजफाटा तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये विशेष गर्दीची ठिकाणे असलेले रेल्वे, बस स्थानके , सिनेमागृह आणि मॉल या ठिकाणांचा समावेश आहे. तर, हॉटेल आणि लॉज आदी ठिकाणांची पोलिसांकडून तपासणीबरोबर शहरातील मुख्य ठिकाणांवर नाकाबंदीही सुरू केल्याचेही सूत्रे म्हणाली.मुंबई पोलीस दलापाठोपाठ ठाणे शहर पोलीस दलाकडे पाहिले जाते. शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर असे व्यापलेले आहे. या परिसरात दिवसेंदिवस वाढत्या नागरिकांमुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढीस लागले आहे. त्याचबरोबर मुंब्रा, भिवंडी ही ठिकाणे संवेदनशील म्हणून जगजाहीर आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली ही नेहमी गजबजलेली रेल्वे स्थानके म्हणून ओळखली जातात. त्याचबरोबर १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांतील आरडीएक्स मुंब्रा खाडीत सापडले होते. तसेच ठाण्यातील कळवा खाडी, अन्य आयुक्तालयांतील काही धार्मिक स्थळेही महत्त्वाची मानली जात असल्याने शहर पोलिसांनी संवेदनशील स्थळांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, प्रत्येक परिमंडळनिहाय अतिसंवेदनशील, संवेदनशील अणि त्यापेक्षा कमी संवेदनशील अशी स्थळे शोधण्यात आली आहेत. आयुक्तालयात अतिसंवेदनशीलपेक्षा संवेदनशील स्थळे अधिक असल्याची माहिती या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी) भार्इंदरमध्ये पोलिसांच्या गस्तीत वाढफ्रान्समधील पॅरीसमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या धर्तीवर राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस ठाण्यांना हाय अ‍ॅलर्टचा संदेश दिला असून गतवेळच्या काही घटनांमुळे मीरा-भार्इंदरमधील गस्तीतही वाढ केल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरात यापूर्वी रेल्वे साखळी बॉम्बस्फोटांपैकी एक स्फोट मीरा रोड लोहमार्गावर झाला आहे. तसेच काही अतिरेक्यांनादेखील येथून ताब्यात घेतल्याची तसेच एका तडीपार गँगस्टरलाही येथूनच अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर महासंचालकांनी दिलेल्या हाय अलर्टच्या आदेशानुसार शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविली आहे.