शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे आयुक्तालयातील १५० ठिकाणांना धोका

By admin | Updated: November 14, 2015 23:54 IST

देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घातपाताच्या घटना लक्षात घेऊन तत्पूर्वी ठाणे शहर पोलिसांनी आयुक्तालयातील पाचही परिमंडळांत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता

ठाणे : देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घातपाताच्या घटना लक्षात घेऊन तत्पूर्वी ठाणे शहर पोलिसांनी आयुक्तालयातील पाचही परिमंडळांत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांचा सहा महिन्यांपूर्वी शोध घेतला आहे. त्या ठिकाणांचे तीन गटांत वर्गीकरण करून त्यानुसार जवळपास १२५ ते १५० ठिकाणे निश्चित केली आहेत. या सर्वेक्षणात कल्याण परिमंडळात सर्वाधिक ठिकाणे असल्याचे समोर आले असून त्यांची नावे सांगण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला आहे. शनिवारी फ्रान्समधील पॅरीसमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनी या सर्व ठिकाणांसह शहरात हाय अ‍ॅलर्ट जारी करून पोलिसांचा फौजफाटा तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये विशेष गर्दीची ठिकाणे असलेले रेल्वे, बस स्थानके , सिनेमागृह आणि मॉल या ठिकाणांचा समावेश आहे. तर, हॉटेल आणि लॉज आदी ठिकाणांची पोलिसांकडून तपासणीबरोबर शहरातील मुख्य ठिकाणांवर नाकाबंदीही सुरू केल्याचेही सूत्रे म्हणाली.मुंबई पोलीस दलापाठोपाठ ठाणे शहर पोलीस दलाकडे पाहिले जाते. शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर असे व्यापलेले आहे. या परिसरात दिवसेंदिवस वाढत्या नागरिकांमुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढीस लागले आहे. त्याचबरोबर मुंब्रा, भिवंडी ही ठिकाणे संवेदनशील म्हणून जगजाहीर आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली ही नेहमी गजबजलेली रेल्वे स्थानके म्हणून ओळखली जातात. त्याचबरोबर १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांतील आरडीएक्स मुंब्रा खाडीत सापडले होते. तसेच ठाण्यातील कळवा खाडी, अन्य आयुक्तालयांतील काही धार्मिक स्थळेही महत्त्वाची मानली जात असल्याने शहर पोलिसांनी संवेदनशील स्थळांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, प्रत्येक परिमंडळनिहाय अतिसंवेदनशील, संवेदनशील अणि त्यापेक्षा कमी संवेदनशील अशी स्थळे शोधण्यात आली आहेत. आयुक्तालयात अतिसंवेदनशीलपेक्षा संवेदनशील स्थळे अधिक असल्याची माहिती या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी) भार्इंदरमध्ये पोलिसांच्या गस्तीत वाढफ्रान्समधील पॅरीसमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या धर्तीवर राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस ठाण्यांना हाय अ‍ॅलर्टचा संदेश दिला असून गतवेळच्या काही घटनांमुळे मीरा-भार्इंदरमधील गस्तीतही वाढ केल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरात यापूर्वी रेल्वे साखळी बॉम्बस्फोटांपैकी एक स्फोट मीरा रोड लोहमार्गावर झाला आहे. तसेच काही अतिरेक्यांनादेखील येथून ताब्यात घेतल्याची तसेच एका तडीपार गँगस्टरलाही येथूनच अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर महासंचालकांनी दिलेल्या हाय अलर्टच्या आदेशानुसार शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविली आहे.