शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Thane: राजावाडी क्रिकेट क्लबला विजेतेपद, अर्जुन मढवी स्मृतीचषक महिला टी २० लीग क्रिकेट स्पर्धा

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 23, 2023 16:34 IST

Thane News: राजावाडी क्रिकेट क्लबने पदार्पणालाच अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या रिगल क्रिकेट क्लबचा चार धावांनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित चौथ्या अर्जुन मढवी स्मृतिचषक महिला टी २० लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे - राजावाडी क्रिकेट क्लबने पदार्पणालाच अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या रिगल क्रिकेट क्लबचा चार धावांनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित चौथ्या अर्जुन मढवी स्मृतिचषक महिला टी २० लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. राजावाडी क्रिकेट क्लबने १४५ धावांचा पाठलाग करणाऱ्या रिगल क्रिकेट क्लबला १४१ धावांवर रोखत अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. निर्णायक लढतीत ५९ धावांची खेळी करत सामन्याला कलाटणी देणारा अप्रतिम झेल पकडणाऱ्या विजेत्या संघाच्या सलोनी कुष्टेला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हूणन सन्मानित करण्यात आले.

रिगल क्रिकेट क्लबची कर्णधार हर्षल जाधवने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हर्षलचा हा निर्णय चुकीचा ठरवताना सोनाली आणि राजावाडी संघाची कर्णधार शेरील रोझारिओने तिसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागिदारी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. सलोनीने ५४ चेंडूत आठ चौकारासह ५९ धावा केल्या. तर शेरिलने कर्णधाराला साजेशी खेळी करताना ४२ चेंडूत आठ चौकार मारत नाबाद ५८ धावा केल्या. चेतना बिश्त आणि हर्षल जाधवने प्रत्येकी एक विकेट मिळवली. या आव्हानाचा पाठलाग करताना शृष्टी नाईक आणि पूनम खेमनारने तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी करत रिगल संघाला विजयाची आस दाखवली. पण पूनम बाद झाल्यावर रिगल संघाच्या धावांचा ओघ मंद झाला.

पूनमने ४३ आणि शृष्टीने ४१ धावा केल्या.त्यानंतर मोनिका तिवारीने दमदार फलंदाजी करत पुन्हा एकदा संघाला विजय दृष्टीक्षेपात आणून दिला. षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात मोनिकाच्या उत्तुंग फटक्याचे झेलात रूपांतर करून सलोनीने रिगल संघाच्या विजयाच्या आशा संपुष्ठात आणल्या. मोनिकाने २० धावा केल्या. निविया आंबरेने प्रतिस्पर्ध्याच्या महत्वाच्या चार फलंदाजाना बाद करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. स्पर्धेतील विजेत्यांना भारताच्या पहिल्या कसोटी महिला पंच वृंदा राठी, मुंबई क्रिकेट संघटनेचे सहसचिव दीपक पाटील, मुंबई क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी कौशिक गोडबोले, मंगेश यादव, प्रमोद यादव, मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवड समिती सदस्या श्रद्धा चव्हाण, स्पर्धेचे प्रमुख संयोजक डॉ राजेश मढवी, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. 

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : सर्वोत्तम फलंदाज : सृष्टी नाईक (रिगल क्रिकेट क्लब),सर्वोत्तम गोलंदाज : कोमल जाधव (रिगल क्रिकेट क्लब).सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : ख़ुशी गिरीस्पर्धेतील सर्वोत्तम : हर्षल जाधव ( रिगल क्रिकेट क्लब)अंतिम सामन्यातील सर्वोत्तम : सलोनी कुष्टे (राजावाडी क्रिकेट क्लब).

टॅग्स :thaneठाणे