शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
2
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
3
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
4
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
5
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
6
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
7
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
8
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
9
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
10
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
11
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
12
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
13
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
14
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
15
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
16
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
17
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
18
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
19
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
20
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!

ठाण्यात पावसाचा एक बळी; ३१६ मिमी पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 12:14 AM

दोन दिवसांच्या कडकडीत उन्हानंतर जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली. या पावसादरम्यान ठाणे शहरात पातलीपाडा येथे भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले.

ठाणे : दोन दिवसांच्या कडकडीत उन्हानंतर जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली. या पावसादरम्यान ठाणे शहरात पातलीपाडा येथे भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. प्रकाश वाळवे (३५) असे यातील मृताचे नाव असून भारती वाळवे (२९) या गंभीर जखमी झाल्या आहेत. समय जाधव हा १० वर्षीय मुलगादेखील जखमी झाला. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूककोंडी झाली.सर्वत्र पडलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजा सुखावला आहे.जिल्ह्यात मागील २४ तासांच्या कालावधीत ३१६ मिमी पाऊस पडला आहे. जिल्हा प्रशासनाने या पावसाची नोंद घेतली असून ती सरासरी ४५.१४ मिमी. अशी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ७२३.३० मिमी. पाऊस पडला आहे.मागील वर्षी जुलै महिन्यापर्यंत सरासरी ९७० मिमी पाऊस पडला होता. तुलनात्मकदृष्ट्या आतापर्यंत सरासरी २४६.७६ मिमी. पाऊस जिल्ह्यात कमी पडला आहे.या काळात भातसा धरणात ३५२ मिमी सर्वाधिक पाऊस पडला आहे. तर बारवीत केवळ ७६.५३ मिमी, तानसात ३७, मोडकसागरमध्ये ६८, आध्रांत ८९.३५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.मात्र, मध्यरात्री मुंबईत मुसळधार पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक मंगळवारी दिवसभर कोलमडले होते. ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वेही २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. यामुळे ठाणे, कल्याण - डोेंबिवलीसह कर्जत, कसारा, नवी मुंबई आदी परिसरातील चाकरमान्यांचे हाल झाले.

टॅग्स :thaneठाणे