शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-पालघरचे पावणेसहा लाख वीजग्राहक अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

ठाणे : तौक्ते चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका ठाणे आणि पालघर जिल्ह्याला बसला आहे. मंगळवार सायंकाळपर्यंत ठाणे जिल्ह्यातील दोन लाख ...

ठाणे : तौक्ते चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका ठाणे आणि पालघर जिल्ह्याला बसला आहे. मंगळवार सायंकाळपर्यंत ठाणे जिल्ह्यातील दोन लाख ३५ हजार ५१९, तर पालघर जिल्ह्यातील तीन लाख ४४ हजार ७४३ ग्राहक अंधारात हाेते. दोन्ही जिल्ह्यातील सुमारे पाच ८० हजार २६२ ग्राहक अद्यापही अंधारात असून, त्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती महावितरणे प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

यात सर्वाधिक ग्राहक ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवलीच्या शहरीपट्ट्यासह अंबरनाथ-बदलापूर, शहापूर, मुरबाड, भिंवडीतील ग्रामीण भागातील आहेत. पालघर जिल्ह्यातल सर्वाधिक ग्राहक वसई-विरारसह पालघर आणि डहाणूसह जव्हार आणि वाडा तालुक्यातील आहेत.

तौक्ते चकीवादळात ठाणे जिल्ह्यातील सात लाख ८५ हजार ५१९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यापैकी मंगळवारी संध्याकाळपर्यंत जवळपास पाच लाख ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे, तर पालघर जिल्ह्यात पाच लाख ८८ हजार ७४३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यापैकी मंगळवारी संध्याकाळपर्यंत जवळपास दोन लाख ४४ हजार अशा सात लाख ९४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले असून, उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे.

विजेचे खांब पडणे, तारा तुटणेसह जोरदार वारा व मुसळधार पावसाने फिडर ट्रिप झाल्याने आणि रोहित्रात बिघाड झाल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.