शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

ठाणे-पालघरचे पावणेसहा लाख वीजग्राहक अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

ठाणे : तौक्ते चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका ठाणे आणि पालघर जिल्ह्याला बसला आहे. मंगळवार सायंकाळपर्यंत ठाणे जिल्ह्यातील दोन लाख ...

ठाणे : तौक्ते चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका ठाणे आणि पालघर जिल्ह्याला बसला आहे. मंगळवार सायंकाळपर्यंत ठाणे जिल्ह्यातील दोन लाख ३५ हजार ५१९, तर पालघर जिल्ह्यातील तीन लाख ४४ हजार ७४३ ग्राहक अंधारात हाेते. दोन्ही जिल्ह्यातील सुमारे पाच ८० हजार २६२ ग्राहक अद्यापही अंधारात असून, त्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती महावितरणे प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

यात सर्वाधिक ग्राहक ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवलीच्या शहरीपट्ट्यासह अंबरनाथ-बदलापूर, शहापूर, मुरबाड, भिंवडीतील ग्रामीण भागातील आहेत. पालघर जिल्ह्यातल सर्वाधिक ग्राहक वसई-विरारसह पालघर आणि डहाणूसह जव्हार आणि वाडा तालुक्यातील आहेत.

तौक्ते चकीवादळात ठाणे जिल्ह्यातील सात लाख ८५ हजार ५१९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यापैकी मंगळवारी संध्याकाळपर्यंत जवळपास पाच लाख ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे, तर पालघर जिल्ह्यात पाच लाख ८८ हजार ७४३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यापैकी मंगळवारी संध्याकाळपर्यंत जवळपास दोन लाख ४४ हजार अशा सात लाख ९४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले असून, उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे.

विजेचे खांब पडणे, तारा तुटणेसह जोरदार वारा व मुसळधार पावसाने फिडर ट्रिप झाल्याने आणि रोहित्रात बिघाड झाल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.