शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

ठाणे-पालघरची कर्जमाफी २०६ कोटींची

By admin | Updated: June 13, 2017 03:24 IST

ठाणे व पालघर जिल्ह्यांतील ३० हजार ४९४ थकबाकीदार शेतकऱ्यांना २०६ कोटी ८१ लाखांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये अत्यल्प व अल्पभूधारक

सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे व पालघर जिल्ह्यांतील ३० हजार ४९४ थकबाकीदार शेतकऱ्यांना २०६ कोटी ८१ लाखांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसह बहूभूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. राज्य सरकारने घोषणा करताच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) ठाणे व पालघर जिल्ह्यांतील थकबाकीदार ३० हजार खातेदार शेतकऱ्यांची यादी तयार ठेवली आहे. यामध्ये सुमारे २००९ पासून आजपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. यात ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ८२८ शेतकऱ्यांसह पालघर जिल्ह्यातील १५ हजार ६६६ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्जमाफीच्या आदेशाचे परिपत्रक येताच निकषानुसार पात्र ठरणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्र्जमाफी देण्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात येईल. याशिवाय, नवीन कर्ज देण्याच्या आदेशाचेदेखील पालन करू, असे टीडीसीसीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी लोकमतला सांगितले. ठाणे जिल्ह्यात १४ हजार ८२८ शेतकऱ्यांना १०३ कोटी १६ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ झाला आहे. यात आठ हजार ८३२ अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना ६१ कोटी तीन लाख रुपयांचा लाभ होणार आहे. पाच हजार २५८ अल्पभूधारक शेतकऱ्यांना ३६ कोटी ४३ लाखांचे कर्ज माफ होईल. बहूभूधारक असलेल्या ७३८ शेतकऱ्यांना पाच कोटी सात लाखांची कर्जमाफी होणार आहे. पालघर जिल्ह्यातील १५ हजार ६६६ शेतकऱ्यांनादेखील १०३ कोटी ६५ लाखांचे कर्ज माफ होणार आहे. यातील तीन हजार ७५४ अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना २४ कोटी ६१ लाखांचे, तर अल्पभूधारक सहा हजार ६५३ शेतकऱ्यांना ४३ कोटी ७३ लाखांची कर्जमाफी होईल. बहूभूधारक पाच हजार २५९ शेतकऱ्यांना ३५ कोटी ३१ लाखांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, शासन आदेशात लागू होणाऱ्या निकषांनुसार शेतकऱ्यांना कर्जमाफीला पात्र ठरवण्यात येणार आहे. यासाठी टीडीसीसी बँकेचे आदेशाकडे लक्ष लागले आहे. आदेश आल्यानंतर विलंब लागू नये, म्हणून बँकेने आधीच ५० हजारांचे कर्ज घेण्यापासून ते एक लाख आणि दीड लाखाचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची वर्गवारी निश्चित केली आहे. शासनाच्या निर्णयानुसार केवळ पीककर्ज माफ होणार आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांत भात, नागली, वरी, केळी आणि चिकू या चार पिकांसाठीच शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले आहेत. भातपिकासह नागली व वरीसाठी शेतकऱ्यांनी सर्वाधिक कर्ज घेतले आहे. या तुलनेत केळी व चिकूसाठी अत्यल्प शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे.