शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-पालघरची कर्जमाफी २०६ कोटींची

By admin | Updated: June 13, 2017 03:24 IST

ठाणे व पालघर जिल्ह्यांतील ३० हजार ४९४ थकबाकीदार शेतकऱ्यांना २०६ कोटी ८१ लाखांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये अत्यल्प व अल्पभूधारक

सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे व पालघर जिल्ह्यांतील ३० हजार ४९४ थकबाकीदार शेतकऱ्यांना २०६ कोटी ८१ लाखांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसह बहूभूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. राज्य सरकारने घोषणा करताच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) ठाणे व पालघर जिल्ह्यांतील थकबाकीदार ३० हजार खातेदार शेतकऱ्यांची यादी तयार ठेवली आहे. यामध्ये सुमारे २००९ पासून आजपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. यात ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ८२८ शेतकऱ्यांसह पालघर जिल्ह्यातील १५ हजार ६६६ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्जमाफीच्या आदेशाचे परिपत्रक येताच निकषानुसार पात्र ठरणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्र्जमाफी देण्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात येईल. याशिवाय, नवीन कर्ज देण्याच्या आदेशाचेदेखील पालन करू, असे टीडीसीसीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी लोकमतला सांगितले. ठाणे जिल्ह्यात १४ हजार ८२८ शेतकऱ्यांना १०३ कोटी १६ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ झाला आहे. यात आठ हजार ८३२ अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना ६१ कोटी तीन लाख रुपयांचा लाभ होणार आहे. पाच हजार २५८ अल्पभूधारक शेतकऱ्यांना ३६ कोटी ४३ लाखांचे कर्ज माफ होईल. बहूभूधारक असलेल्या ७३८ शेतकऱ्यांना पाच कोटी सात लाखांची कर्जमाफी होणार आहे. पालघर जिल्ह्यातील १५ हजार ६६६ शेतकऱ्यांनादेखील १०३ कोटी ६५ लाखांचे कर्ज माफ होणार आहे. यातील तीन हजार ७५४ अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना २४ कोटी ६१ लाखांचे, तर अल्पभूधारक सहा हजार ६५३ शेतकऱ्यांना ४३ कोटी ७३ लाखांची कर्जमाफी होईल. बहूभूधारक पाच हजार २५९ शेतकऱ्यांना ३५ कोटी ३१ लाखांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, शासन आदेशात लागू होणाऱ्या निकषांनुसार शेतकऱ्यांना कर्जमाफीला पात्र ठरवण्यात येणार आहे. यासाठी टीडीसीसी बँकेचे आदेशाकडे लक्ष लागले आहे. आदेश आल्यानंतर विलंब लागू नये, म्हणून बँकेने आधीच ५० हजारांचे कर्ज घेण्यापासून ते एक लाख आणि दीड लाखाचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची वर्गवारी निश्चित केली आहे. शासनाच्या निर्णयानुसार केवळ पीककर्ज माफ होणार आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांत भात, नागली, वरी, केळी आणि चिकू या चार पिकांसाठीच शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले आहेत. भातपिकासह नागली व वरीसाठी शेतकऱ्यांनी सर्वाधिक कर्ज घेतले आहे. या तुलनेत केळी व चिकूसाठी अत्यल्प शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे.