शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

ठाणे-पालघरची कर्जमाफी २०६ कोटींची

By admin | Updated: June 13, 2017 03:24 IST

ठाणे व पालघर जिल्ह्यांतील ३० हजार ४९४ थकबाकीदार शेतकऱ्यांना २०६ कोटी ८१ लाखांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये अत्यल्प व अल्पभूधारक

सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे व पालघर जिल्ह्यांतील ३० हजार ४९४ थकबाकीदार शेतकऱ्यांना २०६ कोटी ८१ लाखांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसह बहूभूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. राज्य सरकारने घोषणा करताच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) ठाणे व पालघर जिल्ह्यांतील थकबाकीदार ३० हजार खातेदार शेतकऱ्यांची यादी तयार ठेवली आहे. यामध्ये सुमारे २००९ पासून आजपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. यात ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ८२८ शेतकऱ्यांसह पालघर जिल्ह्यातील १५ हजार ६६६ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. कर्जमाफीच्या आदेशाचे परिपत्रक येताच निकषानुसार पात्र ठरणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्र्जमाफी देण्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात येईल. याशिवाय, नवीन कर्ज देण्याच्या आदेशाचेदेखील पालन करू, असे टीडीसीसीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी लोकमतला सांगितले. ठाणे जिल्ह्यात १४ हजार ८२८ शेतकऱ्यांना १०३ कोटी १६ लाखांच्या कर्जमाफीचा लाभ झाला आहे. यात आठ हजार ८३२ अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना ६१ कोटी तीन लाख रुपयांचा लाभ होणार आहे. पाच हजार २५८ अल्पभूधारक शेतकऱ्यांना ३६ कोटी ४३ लाखांचे कर्ज माफ होईल. बहूभूधारक असलेल्या ७३८ शेतकऱ्यांना पाच कोटी सात लाखांची कर्जमाफी होणार आहे. पालघर जिल्ह्यातील १५ हजार ६६६ शेतकऱ्यांनादेखील १०३ कोटी ६५ लाखांचे कर्ज माफ होणार आहे. यातील तीन हजार ७५४ अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना २४ कोटी ६१ लाखांचे, तर अल्पभूधारक सहा हजार ६५३ शेतकऱ्यांना ४३ कोटी ७३ लाखांची कर्जमाफी होईल. बहूभूधारक पाच हजार २५९ शेतकऱ्यांना ३५ कोटी ३१ लाखांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, शासन आदेशात लागू होणाऱ्या निकषांनुसार शेतकऱ्यांना कर्जमाफीला पात्र ठरवण्यात येणार आहे. यासाठी टीडीसीसी बँकेचे आदेशाकडे लक्ष लागले आहे. आदेश आल्यानंतर विलंब लागू नये, म्हणून बँकेने आधीच ५० हजारांचे कर्ज घेण्यापासून ते एक लाख आणि दीड लाखाचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची वर्गवारी निश्चित केली आहे. शासनाच्या निर्णयानुसार केवळ पीककर्ज माफ होणार आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांत भात, नागली, वरी, केळी आणि चिकू या चार पिकांसाठीच शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले आहेत. भातपिकासह नागली व वरीसाठी शेतकऱ्यांनी सर्वाधिक कर्ज घेतले आहे. या तुलनेत केळी व चिकूसाठी अत्यल्प शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे.