शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जात सर्वेक्षणावरील ठाणे-पालघरच्या ३७ हजार हरकती निकाली!

By admin | Updated: August 24, 2015 23:28 IST

ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे एक कोटी २२ हजार कुटुंबांचे जात सर्वेक्षण करून ते प्रसिद्धही करण्यात आले आहे. त्यावर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे ३७ हजार २७०

ठाणे : ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे एक कोटी २२ हजार कुटुंबांचे जात सर्वेक्षण करून ते प्रसिद्धही करण्यात आले आहे. त्यावर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे ३७ हजार २७० नागरिक, ग्रामस्थ व आदिवासी कुटुंबांनी हरकती घेतल्या असता त्यापैकी बहुतांशी निकाली काढण्यात आल्या आहेत. जात सर्वेक्षणाविरोधात नागरिकांनी विविध स्वरूपांच्या तक्रारी केल्या आहेत. यामुळे प्रसिद्ध झालेल्या जात सर्वेक्षण अहवालावरील आकडेवारीवर आक्षेप घेण्यासह त्यातील चुकांची दुरुस्ती, गाव सोडून अन्यत्र स्थलांतरित झालेले, ग्रामसभांचे आक्षेप अशा विविध स्वरूपांचा हरकतींमध्ये समावेश आहे. न्यायालयाच्या दणक्याने संबंधित एजन्सीने सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला, पण त्यात मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्यामुळे नागरिकांनी त्याविरोधात हरकती घेतल्या आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील चार हजार ५९८ हरकतींपैकी चार हजार ३३५ निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित २६३ हरकती शिल्लक राहिल्या आहेत. याशिवाय, नावात बदल असलेले ३६० तर १२३ स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी हरकती घेतल्या होत्या.याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक ३२ हजार ६७२ नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत. उर्वरित २५ हजार ११४ हरकती निकाली काढण्यात आल्या आहेत. शिल्लक सात हजार ५५८ हरकती आहेत. यातील आक्षेप घेतलेल्यांमध्ये १४०८ नावांत बदल करणाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. उर्वरित स्थलांतरित झालेल्या कुटुंबांमध्ये ५३ जणांनी जात सर्वेक्षणावर आक्षेप घेऊन त्यातील दुरुस्तीची मागणी केली आहे. यानुसार, दोन्ही जिल्ह्यांत प्राप्त झालेल्या जात सर्वेक्षणावरील आक्षेपांची कसून चौकशी करून त्यातील बहुतांशी निकाली काढण्याचे प्रयत्न करून त्यांच्या आॅनलाइप डेटा एण्ट्रीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.