शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

जात सर्वेक्षणावरील ठाणे-पालघरच्या ३७ हजार हरकती निकाली!

By admin | Updated: August 24, 2015 23:28 IST

ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे एक कोटी २२ हजार कुटुंबांचे जात सर्वेक्षण करून ते प्रसिद्धही करण्यात आले आहे. त्यावर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे ३७ हजार २७०

ठाणे : ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे एक कोटी २२ हजार कुटुंबांचे जात सर्वेक्षण करून ते प्रसिद्धही करण्यात आले आहे. त्यावर या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे ३७ हजार २७० नागरिक, ग्रामस्थ व आदिवासी कुटुंबांनी हरकती घेतल्या असता त्यापैकी बहुतांशी निकाली काढण्यात आल्या आहेत. जात सर्वेक्षणाविरोधात नागरिकांनी विविध स्वरूपांच्या तक्रारी केल्या आहेत. यामुळे प्रसिद्ध झालेल्या जात सर्वेक्षण अहवालावरील आकडेवारीवर आक्षेप घेण्यासह त्यातील चुकांची दुरुस्ती, गाव सोडून अन्यत्र स्थलांतरित झालेले, ग्रामसभांचे आक्षेप अशा विविध स्वरूपांचा हरकतींमध्ये समावेश आहे. न्यायालयाच्या दणक्याने संबंधित एजन्सीने सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला, पण त्यात मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्यामुळे नागरिकांनी त्याविरोधात हरकती घेतल्या आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील चार हजार ५९८ हरकतींपैकी चार हजार ३३५ निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित २६३ हरकती शिल्लक राहिल्या आहेत. याशिवाय, नावात बदल असलेले ३६० तर १२३ स्थलांतरित झालेल्या नागरिकांनी हरकती घेतल्या होत्या.याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक ३२ हजार ६७२ नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत. उर्वरित २५ हजार ११४ हरकती निकाली काढण्यात आल्या आहेत. शिल्लक सात हजार ५५८ हरकती आहेत. यातील आक्षेप घेतलेल्यांमध्ये १४०८ नावांत बदल करणाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. उर्वरित स्थलांतरित झालेल्या कुटुंबांमध्ये ५३ जणांनी जात सर्वेक्षणावर आक्षेप घेऊन त्यातील दुरुस्तीची मागणी केली आहे. यानुसार, दोन्ही जिल्ह्यांत प्राप्त झालेल्या जात सर्वेक्षणावरील आक्षेपांची कसून चौकशी करून त्यातील बहुतांशी निकाली काढण्याचे प्रयत्न करून त्यांच्या आॅनलाइप डेटा एण्ट्रीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.