शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

ठाणे-पालघरच्या १४ स्थानिक स्वराज्य संस्था मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:44 IST

चौदाव्या वित्त आयोगाचा निधी : १७४ कोटी ५१ लाख वितरित

नारायण जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : केंद्राकडून १४ व्या वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा १४८९ कोटी ५१ लाखांचा पहिला हप्ता राज्य सरकारने राज्यातील ३८२ स्थानिक संस्थांना वितरीत केला असून यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील १४ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाट्याला १७४ कोटी ५० लाख ८५ हजार १७० रुपये आले आहेत.या निधीतून स्थानिक स्वराज्य संस्थांना मूलभूत पायाभूत सुविधांची कामे करता येणार आहेत. त्यात्या शहरांची लोकसंख्या,भौगोलिक क्षेत्रफळ या निकषांच्या आधारे हे अनुदान वितरीत होते. या १४ स्वराज्य संस्थांमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील ड वर्ग महापालिकांसह नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा समावेश आहे.ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, मीरा-भार्इंदर, भिवंडी या तीन महापालिकांसह अंबरनाथ व बदलापूर नगर परिषद आणि मुरबाड आणि शहापूर नगरपंचायती तर, पालघर जिल्ह्यातील जव्हार, डहाणू, पालघर नगर परिषदांसह विक्रमगड, तलासरी, वाडा, मोखाडा या नगरपंचायतींना हे १७४ कोटी ५० लाख ८५ हजार १७० रुपये अनुदान मिळणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव अनुदानाची रक्कमउल्हासनगर महापालिका ३१ कोटी ९८ लाख ११ हजार ९६९भिवंडी महापालिका ४५ कोटी ५९ हजार ७६३मीरा-भार्इंदर महापालिका ५२ कोटी २९ लाख ९६ हजार ३५०बदलापूर नगर परिषद ११ कोटी ६३ लाख ११ हजार ४५८अंबरनाथ नगर परिषद १६ कोटी ६३ लाख ७३ हजार ३९६शहापूर नगरपंचायत ८४ लाख ९८ हजार ५२२मुरबाड नगरपंचायत एक कोटी ५० लाख ८२ हजार २१३जव्हार नगर परिषद ८२ लाख ४० हजार २७३डहाणू नगर परिषद तीन कोटी ५१ लाख पाच हजार ३९३पालघर नगर परिषद पाच कोटी ५८ लाख सात हजार १०१विक्रमगड नगरपंचायत ७५ लाख ९० हजार ६६तलासरी नगरपंचायत एक कोटी ५७ लाख ८३ हजार ६२वाडा नगरपंचायत एक कोटी २६ लाख ३७ हजार ५७२मोखाडा नगरपंचायत एक कोटी सात लाख ७८ हजार ३२एकूण १७४ कोटी ५० लाख ८५ हजार १७०