शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे तलावांचे नाही, तर हातगाड्यांचे शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST

ठाणे : ठाणे शहर हे तलावांचे शहर राहिले नसून हातगाड्यांचे शहर झाल्याचे सभागृहास सांगून संबंधित सहायक आयुक्तांकडे वारंवार तक्रार ...

ठाणे : ठाणे शहर हे तलावांचे शहर राहिले नसून हातगाड्यांचे शहर झाल्याचे सभागृहास सांगून संबंधित सहायक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्याची खंत महापालिकेचे सभागृह नेते अशोक वैती यांनी शुक्रवारी झालेल्या महासभेत व्यक्त केली.

शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून, त्यावरदेखील कारवाई होत नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. यासंदर्भातील लक्षवेधीवर बोलताना प्रशासन अशा हातगाड्यांवर कारवाई करत नसेल तर आमच्या पद्धतीने हे प्रकरण तडीस लावू, असा इशाराच त्यांनी दिला. या लक्षवेधीवर शिवसेना नगरसेवकांसह इतर पक्षाच्या नगरसेवकांनीदेखील फेरीवाल्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनावर जोरदार टीकास्त्र सोडले.

कोट्यवधींचे खर्च करून महापालिका पदपथ बनवते. मात्र, त्यावर फेरीवाले बसत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी शिवसनेच्या नगरसेविका मीनल संख्ये यांनी केली. हातगाडीवर कारवाई करताना एखाद्या नारसेवकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा फोन केल्यास ही बाब रेकॉर्डवर आणावी, याला आपले समर्थन असल्याचे भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी सांगितले. अनेक ठिकाणी फेरीवाल्यांच्या बाजूला अतिक्रमण विभागाची गाडी असूनही कारवाई होत नाही तर अनेक वेळा केवळ थातूरमातूर कारवाई केली जाते. स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसरात बसणारे फेरीवाले ठाण्याच्या बाहेरचे असल्याचे भाजपचे नगरसेवक सुनश जोशी यांनी सांगितले.

रस्त्यावरच्या गाड्या हा केवळ अतिक्रमणाचा विषय नाही तर पदपथांवर चालताना नागरिकांना व्यवस्थित चालता आले पाहिजे याची काळजी प्रशासनाने घ्यायला हवी, असे संदीप लेले यांनी सांगितले. स्टॉलदेखील चुकीच्या जागेवर दिले जात असल्याचे सांगून फेरीवाल्यांना अर्ज मागवून तो दहा वर्षे ठाणेकर असावा ही अट टाकावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

कापूरबावडीपासून रस्त्यावर हातगाड्या उभ्या असताना त्यांच्याकडून हप्ते घेतले जात असल्याचा आरोप देवराम भोईर यांनी यावेळी केला. याशिवाय प्रभाग समितीवरदेखील अशा फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याचे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.