शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

ठाण्यातील नवीन बांधकामे रडारवर!

By admin | Updated: February 25, 2016 02:47 IST

ठाणे महापालिकेच्या हद्दीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, २०००’नुसार शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने ठाणे महापालिकेच्या बाबतीत

मुंबई : ठाणे महापालिकेच्या हद्दीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, २०००’नुसार शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने ठाणे महापालिकेच्या बाबतीत देखील कल्याण-डोंबिवली महापालिकेचाच कित्ता गिरवण्यात येईल, असा इशारा बुधवारी उच्च न्यायालयाने दिला. यासंदर्भात आपण विचार करत असून पुढील आठवड्यात याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. ठाण्यामध्ये एकही अधिकृत डम्पिग ग्राऊंड नाही. महापालिकेच्या हद्दीतील सर्व कचऱ्याची विल्हेवाट मोकळ्या जागेवर घनकचरा व्यवस्थापन नियम, २०००च्या नियमांना धाब्यावर बसवून बेकायदेशीररीत्या करण्यात येते, असा आरोप ठाण्याचे रहिवासी विक्रांत तावडे यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे होती.महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश द्यावेत. तसेच नवीन बांधकामांना परवानगी देताना प्रत्येक सोसायटीला आणि संकुलाला वर्मी कंपोस्ट प्लॅन्ट बांधणे बंधनकारक करावे. तसेच याचिका प्रलंबित असेपर्यंत नवीन बांधकामास परवानगी देऊ नये, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.बुधवारच्या सुनावणीवेळी ठाणे पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी डायघर येथील डम्पिंग ग्राऊंडवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आॅक्टोबर २०१७ पर्यंत पूर्ण होईल, मात्र दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प कधी पूर्ण होईल, याची खुद्द महापालिकेलाच कल्पना नसल्याची माहिती खंडपीठाला दिली.‘तुम्हालाच (ठामपा) तुमचे दुसऱ्या टप्प्यातील काम कधी पूर्ण होणार याची माहिती नाही. त्यामुळे कल्याण- डोंबिवलीप्रमाणे ठामपाच्या हद्दीतीही नवीन बांधकामांना स्थगिती द्यावी लागेल. आम्ही याबाबत विचार करत असून पुढील आठवड्यात यासंदर्भात निर्णय घेऊ,’ असे खंडपीठाने स्पष्ट करत पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी ठेवली आहे. (प्रतिनिधी) याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ठाणे महापालिकेच्या हद्दीत रोज ६५० ते ७०० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होते. मात्र एवढ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे अधिकृत डम्पिग ग्राऊंडच उपलब्ध नाही.२००९ मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने (एमपीसीबी) महापालिकेला डायघर येथे डम्पिग ग्राऊंड सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र याठिकाणी अद्यापही शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नाही.