शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

ठाण्यातील नवीन बांधकामे रडारवर!

By admin | Updated: February 25, 2016 02:47 IST

ठाणे महापालिकेच्या हद्दीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, २०००’नुसार शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने ठाणे महापालिकेच्या बाबतीत

मुंबई : ठाणे महापालिकेच्या हद्दीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, २०००’नुसार शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने ठाणे महापालिकेच्या बाबतीत देखील कल्याण-डोंबिवली महापालिकेचाच कित्ता गिरवण्यात येईल, असा इशारा बुधवारी उच्च न्यायालयाने दिला. यासंदर्भात आपण विचार करत असून पुढील आठवड्यात याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. ठाण्यामध्ये एकही अधिकृत डम्पिग ग्राऊंड नाही. महापालिकेच्या हद्दीतील सर्व कचऱ्याची विल्हेवाट मोकळ्या जागेवर घनकचरा व्यवस्थापन नियम, २०००च्या नियमांना धाब्यावर बसवून बेकायदेशीररीत्या करण्यात येते, असा आरोप ठाण्याचे रहिवासी विक्रांत तावडे यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे होती.महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश द्यावेत. तसेच नवीन बांधकामांना परवानगी देताना प्रत्येक सोसायटीला आणि संकुलाला वर्मी कंपोस्ट प्लॅन्ट बांधणे बंधनकारक करावे. तसेच याचिका प्रलंबित असेपर्यंत नवीन बांधकामास परवानगी देऊ नये, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.बुधवारच्या सुनावणीवेळी ठाणे पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी डायघर येथील डम्पिंग ग्राऊंडवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आॅक्टोबर २०१७ पर्यंत पूर्ण होईल, मात्र दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प कधी पूर्ण होईल, याची खुद्द महापालिकेलाच कल्पना नसल्याची माहिती खंडपीठाला दिली.‘तुम्हालाच (ठामपा) तुमचे दुसऱ्या टप्प्यातील काम कधी पूर्ण होणार याची माहिती नाही. त्यामुळे कल्याण- डोंबिवलीप्रमाणे ठामपाच्या हद्दीतीही नवीन बांधकामांना स्थगिती द्यावी लागेल. आम्ही याबाबत विचार करत असून पुढील आठवड्यात यासंदर्भात निर्णय घेऊ,’ असे खंडपीठाने स्पष्ट करत पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी ठेवली आहे. (प्रतिनिधी) याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ठाणे महापालिकेच्या हद्दीत रोज ६५० ते ७०० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होते. मात्र एवढ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे अधिकृत डम्पिग ग्राऊंडच उपलब्ध नाही.२००९ मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने (एमपीसीबी) महापालिकेला डायघर येथे डम्पिग ग्राऊंड सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र याठिकाणी अद्यापही शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नाही.