शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

ठाणे-नवीमुंबई रिक्षाभाडे दिवसाही मोजा दीडपट

By admin | Updated: July 8, 2015 00:08 IST

ठाण्यातून नवीमुंबईत रिक्षाने कुठेही जायचे असेल तर प्रवाशाला दिवसाही दीडपट भाडे मोजावे लागते. येताना प्रवासी मिळत नाहीत. असे कारण सांगितले जाते

ठाणे : ठाण्यातून नवीमुंबईत रिक्षाने कुठेही जायचे असेल तर प्रवाशाला दिवसाही दीडपट भाडे मोजावे लागते. येताना प्रवासी मिळत नाहीत. असे कारण सांगितले जाते. याबाबत कोणताही शासकीय अथवा युनियनचा निर्णय नसला तरी रिक्षावाल्यानी छुप्या रीतीने संगनमताने प्रवाशांची लूट चालवली आहे. वाहतूक पोलीस आणि आरटीओ याबाबत ध्रृतराष्ट्र झाले आहेत. ठाणे स्थानकाच्या पश्चिमेलाही प्रवाशांची रिक्षांसाठी भली मोठी रांग असते. परंतु रिक्षा एकही नसते. त्याचवेळी डॉ.आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला रिक्षांची रांग असते. व त्यांचे चालक स्थानकाच्या प्रवेशद्वारी उभे राहून लांबच्या अंतरावर जाणाऱ्या प्रवाशांना हेरत असतात. यामुळे प्रवाशांचा खोळंबा आणि वाहतूक कोंडी घडते तरी वाहतूक पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. रिक्षावाल्यांच्या या प्रकारामुळे रेल्वे स्थानक परिसरात ट्रॅफीकही जाम होेते. मात्र हे प्रश्न नक्की कोणी सोडवावेत यात आरटीओ आणि वाहतूक पोलिसात संभ्रम निर्माण झाला आहे.ठाणे शहरात एकूण १७ हजार ५०० रिक्षांचे परमिट आहेत. तसेच महिन्याला अनेक नवीन रिक्षांची नोंदणी केली जाते. मात्र तरीही काही रिक्षा-चालक व मालकांकडे इरादापत्र नसल्यास किंवा जर १६ वर्षापूर्वीची रिक्षा असल्यास वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयाला कळवावे किंवा त्यांच्यावर कारवाई करावी असे मत ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी सांगितले. तर वाहतूक पोलीस हा मुद्दा आणि त्यावरील कारवाई ही बाब परीवहन अधिकाऱ्यांच्या कक्षेत असल्याचे सांगून आपले हात झटकून टाकत आहेत. याबाबत रिक्षा संघटनाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता एकाही रिक्षा संघटनेच्या अध्यक्षांनी प्रतिसाद दिला नाही. (प्रतिनिधी)