शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

ठाणे महापालिकेच्या महासभेत कचरा उचलणे बंद केल्याच्या मुद्यावरुन गदारोळ, आधी जनजागृती करा मगच कचरा उचलणे बंद करा, महापौरांनी दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 15:17 IST

शहरातील विविध आस्थापना आणि सोसायटींनी १५ डिसेंबर पर्यंत कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरु न केल्याने अखेर पालिकेने काही सोसायटींचा कचरा उचलणे बंद केले. त्याचे पडसाद महासभेत उमटले असून जोपर्यंत जनजागृती केली जात नाही, तोपर्यंत कचरा उचलणे बंद करु नका असे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

ठळक मुद्दे१५ डिसेंबर नंतर काही सोसायटींचा कचरा उचलण्याची प्रक्रिया पालिकेने केली बंदमहासभेत कचऱ्याच्या मुद्यावरुन सर्वपक्षीय नगरसेवकांचा हल्लाबोल

ठाणे - ज्या सोसायटी, हॉटेल, मॉल, रुग्णालय आदींसह इतर आस्थापनांचा दिवसाचा कचरा हा १०० किलोग्रॅम पेक्षा जास्त निर्माण होत असेल, तसेच ज्या सोसायटी पाच हजार स्केअरमीटरच्या क्षेत्रात वसल्या असतील त्या सोसायटींनी त्यांच्या कचऱ्याचे वर्गीकरण करुन त्याच ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशा आशयाच्या नोटीसा पालिकेने बजावण्यास सुरवात केली आहे. शिवाज जे कचऱ्याची विल्हेवाट लावणार नाहीत, त्यांचा कचरा उललला जाणार नसल्याचेही पालिकेने स्पष्ट केले होते. त्यानुसार पालिकेने या डेडलाईन नंतर काही सोसायट्यांचा कचरा उचलणे बंद केल्याचा मुद्दा बुधवारी झालेल्या महासभेत सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. आधी सोसायटींना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रशिक्षण द्यावे त्यानंतर कचरा उचलणे बंद करावे अशी मागणीही सदस्यांनी केली. त्यानुसार महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आधी जनजागृती, प्रशिक्षण द्या मगच कचरा उचलणे बंद करा, तोपर्यंत कचरा उचलण्याची प्रक्रिया सुरुच ठेवावी असे आदेश संबधींत विभागाला दिले.महासभेत भाजपाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी या मुद्याला हात घालत, पालिकेने पाठविलेली नोटीस सभागृहाला सादर केली. परंतु काही सोसायट्या छोट्या असल्याने त्यांना कचऱ्याची विल्हेवाट लावता येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नोटीस बजावण्यापूर्वी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रशिक्षण, जनजागृती करणे अपेक्षित होते असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्याच अनुषंगाने इतर सदस्यांनी देखील स्वच्छ शहर म्हणून पालिका दावा करीत असली तरी केंद्राने केलेल्या सर्व्हेत आपण १७ वरुन ११६ क्रमांकावर कसे गेलो असा सवाल नारायण पवार यांनी उपस्थित केला. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करुन दिला जात असला तरी तो घंटागाडीत एकत्रितच टाकला जात असल्याचा मुद्दा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी उपस्थित केला. महापालिकेला अद्यापही स्वत:चे हक्काचे डम्पींग ग्राऊंड मिळविता आलेले नाही, असे असतांना ठाणेकरांवर ही कुºहाड कशासाठी असा सवालही काही सदस्यांनी उपस्थित केला.

  • डायघरला कोणत्याही परिस्थितीत डम्पींग होऊ देणार नाही...

मागील १० वर्षापासून ठाणे महापालिकेच्या वतीने डायघर येथे डम्पींग सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे तेथे आजतागायत डम्पीग सुरु झालेले नाही. हाच डम्पींगचा मुद्दा महासभेत उपस्थित झाला असता, दिव्यातील राष्टÑवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी यापूर्वी जो विरोध डम्पींगसाठी होता, तो विरोध आजही कायम आहे. कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी डम्पींग होऊ देणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, आपला प्रभाग स्वच्छ राखणाऱ्या टॉप टेन नगरसेवकांना प्रत्येकी अतिरिक्त २५ लाखांचा निधी देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. परंतु ज्या भागात सोसायटी आहेत, त्यांनाच ते मिळणार आहेत, आमच्या सारख्या झोपडपट्टी भागाला या टॉप टेनमध्ये संधी असणार का? असा सवाल राष्टवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी उपस्थित केला. एकूणच आधी जनजागृती, प्रशिक्षण, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कशा प्रकारच्या यंत्रणा आहेत, याची माहिती प्रदर्शन भरविण्यात यावे अशी मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली. प्रशासनाने मात्र आम्ही कोणत्याही सोसयटीचा कचरा उचलणे बंद केले नसल्याचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील महिन्यात या संदर्भातील प्रदर्शन लावण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु जो पर्यंत जनजागृती, प्रदर्शन आणि प्रशिक्षण दिले जात नाही, तो पर्यंत कचरा उचलणे बंद करु नका असे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाला दिले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त