शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

‘रेंटल’च्या घरांचे भाडे न भरणाऱ्या ५६ रहिवाशांच्या सदनिका ठाणे महापालिकेने घेतल्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:34 IST

ऐन पावसाळ्यात कुटुंब हवालदिल : आयुक्तांचा निर्णय, १५ दिवसांची दिली मुदत

ठाणे : एकीकडे ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये समाविष्ट नसलेल्या पण ऐन पावसाळ्यात एखादी इमारत धोकादायक स्थितीत आढळल्यास त्या इमारतीमध्ये राहत असलेल्या व समोर कुठलाही पर्याय नसलेल्या कुटुंबाना प्रति महिना तीन हजार रुपये देण्याचा मानवतावादी निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे धोकायदाक इमारतीमधून रेंटलच्या घरात वास्तव्यास गेलेल्या रहिवाशांनी पालिकेचे प्रति महिना २ हजार रुपये भाडे न भरल्याने अशी ५६ घरे पुन्हा पालिकेने ताब्यात घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

महापालिका दरवर्षी धोकादायक इमारतींची यादी तयार करून त्यातील सी १ या वर्गवारीतील इमारती खाली करून तोडते. तर सी २ ए या वर्गवारीतील इमारती खाली करून त्यांना दुरुस्तीची परवानगी देते.

या पार्श्वभूमीवर ऐन पावसाळ्यामध्ये एखादी इमारत धोकादायक स्थितीत आढळून आल्यास तीमध्ये राहणाºया काही कुटुंबासमोर कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्यास अशा कुटुंबांना ४ महिन्यांसाठी प्रति महिना ३ हजार रुपये देण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव धोरणात्मक निर्णयासाठी येत्या सर्वसाधारण सभेसमोर आणण्याच्या सूचना त्यांनी अतिक्र मण विभागाला केल्या आहेत.

आयुक्तांचा दुजाभाव : एकीकडे पालिका आयुक्तांनी असा निर्णय घेतला असताना दुसरीकडे पालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने आपल्या संकेत स्थळावर एक यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत वर्तकनगर आणि दोस्तीमध्ये वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी प्रतिमहा २ हजार रुपयांचे भाडे थकविल्याने अशा ५६ रहिवाशांच्या सदनिका ताब्यात घेतल्या आहेत. ही थकबाकी ३५ लाख ६७ हजार ४८४ एवढी असल्याचेही स्पष्ट केले आहे.

या रहिवाशांची हक्काची घरे मातीमोल झाल्याने त्यांना या रेंटलच्या इमारतींमध्ये वास्तव्यासाठी घरे दिली होती. परंतु, आता आयुक्तांनी पुढील चार महिने धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना प्रतिमहा तीन हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे आणि दुसरीकडे जे रेंटलमध्ये पूर्वीपासून वास्तव्य करीत आहेत, त्यांना बेघर केल्याचा आरोप या रहिवाशांनी केला आहे.

हा एकप्रकारचा दुजाभाव असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. शिवाय ज्यांच्या सदनिका सील केल्या आहेत. त्यांना १५ दिवसांची मुदत दिली असून अन्यथा पुढील कठोर कारवाई केली जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवारा नाही तर जायचे कुठे असा प्रश्न आता या रहिवाशांना सतावू लागला आहे.