शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

‘रेंटल’च्या घरांचे भाडे न भरणाऱ्या ५६ रहिवाशांच्या सदनिका ठाणे महापालिकेने घेतल्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:34 IST

ऐन पावसाळ्यात कुटुंब हवालदिल : आयुक्तांचा निर्णय, १५ दिवसांची दिली मुदत

ठाणे : एकीकडे ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये समाविष्ट नसलेल्या पण ऐन पावसाळ्यात एखादी इमारत धोकादायक स्थितीत आढळल्यास त्या इमारतीमध्ये राहत असलेल्या व समोर कुठलाही पर्याय नसलेल्या कुटुंबाना प्रति महिना तीन हजार रुपये देण्याचा मानवतावादी निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे धोकायदाक इमारतीमधून रेंटलच्या घरात वास्तव्यास गेलेल्या रहिवाशांनी पालिकेचे प्रति महिना २ हजार रुपये भाडे न भरल्याने अशी ५६ घरे पुन्हा पालिकेने ताब्यात घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

महापालिका दरवर्षी धोकादायक इमारतींची यादी तयार करून त्यातील सी १ या वर्गवारीतील इमारती खाली करून तोडते. तर सी २ ए या वर्गवारीतील इमारती खाली करून त्यांना दुरुस्तीची परवानगी देते.

या पार्श्वभूमीवर ऐन पावसाळ्यामध्ये एखादी इमारत धोकादायक स्थितीत आढळून आल्यास तीमध्ये राहणाºया काही कुटुंबासमोर कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्यास अशा कुटुंबांना ४ महिन्यांसाठी प्रति महिना ३ हजार रुपये देण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव धोरणात्मक निर्णयासाठी येत्या सर्वसाधारण सभेसमोर आणण्याच्या सूचना त्यांनी अतिक्र मण विभागाला केल्या आहेत.

आयुक्तांचा दुजाभाव : एकीकडे पालिका आयुक्तांनी असा निर्णय घेतला असताना दुसरीकडे पालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने आपल्या संकेत स्थळावर एक यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत वर्तकनगर आणि दोस्तीमध्ये वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी प्रतिमहा २ हजार रुपयांचे भाडे थकविल्याने अशा ५६ रहिवाशांच्या सदनिका ताब्यात घेतल्या आहेत. ही थकबाकी ३५ लाख ६७ हजार ४८४ एवढी असल्याचेही स्पष्ट केले आहे.

या रहिवाशांची हक्काची घरे मातीमोल झाल्याने त्यांना या रेंटलच्या इमारतींमध्ये वास्तव्यासाठी घरे दिली होती. परंतु, आता आयुक्तांनी पुढील चार महिने धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना प्रतिमहा तीन हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे आणि दुसरीकडे जे रेंटलमध्ये पूर्वीपासून वास्तव्य करीत आहेत, त्यांना बेघर केल्याचा आरोप या रहिवाशांनी केला आहे.

हा एकप्रकारचा दुजाभाव असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. शिवाय ज्यांच्या सदनिका सील केल्या आहेत. त्यांना १५ दिवसांची मुदत दिली असून अन्यथा पुढील कठोर कारवाई केली जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवारा नाही तर जायचे कुठे असा प्रश्न आता या रहिवाशांना सतावू लागला आहे.