शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

ठाणे महापालिकेत मंजुर झालेले ते ४५ ठराव गेले कुठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 18:06 IST

मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिकेत ठरावांवर चर्चा चांगलीच रंगली असल्याचे दिसत आहे. महापालिकेकडे बोट दाखविणाऱ्या लोकप्रतिनिधींकडूनच सुमापे ४५ ठराव प्रशासनाकडे पाठविले नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा इन्कारमहापौर, सभागृह नेत्यांनीही ठराव नसल्याचे केले स्पष्ट

ठाणे - ठराव मंजुर होत नाहीत, सचिव विभागाकडून ठराव पुढे सरकत नाहीत, असा काहीसा गवगवा मागील कित्येक महिन्यांपासून लोकप्रतिनिधींकडून सुरु आहे. परंतु आता सुमारे ४० ते ४५ ठराव अद्यापही प्रशासनकडे आलेच नसल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात महापौर, सभागृह नेते तसेच विरोधी पक्षनेत्यांनी मात्र आमच्याकडून ठराव पाठविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु ठराव प्रशासनाकडे पोहचलेच नसल्याने ते गेले कुठे असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.             ठाणे महापालिकेची दर महिन्याला २० तारखेला महासभा होत असते. या महासभेत प्रशासनाच्या विविध प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येत असतात. काही प्रस्तावांवर सभागृहात साधकबाधक चर्चा होत असते. त्यानंतर सुचनांसह प्रस्ताव मंजुर केले जातात. काही प्रस्ताव नव्याने सादर करण्यासाठी सांगितले जाते. परंतु असे होऊनही प्रशासनाकडूनच ठरावांची अंमलबजावणी केली जात नाही. काही ठराव शासनाकडे नियोजीत वेळेत पाठविले जात नाहीत. अशी ओरडही महासभेत होतांना दिसून आली आहे.               दरम्यान वारंवार ही ओरड होत असल्याने, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सभागृहाकडून आलेले ठराव मंजुर करुन पुढे पाठविण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पालिकेच्या संबधींत विभागाकूडन त्या सुचनांची अंमलबजावणी देखील करण्यात येत आहे. परंतु मागील तीन महिन्यात झालेल्या महासभेतील सुमारे ४० ते ४५ ठराव हे अद्यापही प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पत्रकारांच्या घरांसह, सीसीटीव्ही, आदींसह काही महत्वांच्या प्रस्तावांचा समावेश असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली. या संदर्भात महापौर, सभागृह नेते तसेच विरोधी पक्षनेते यांच्याशी चर्चा केली असता आमच्याकडे कोणतेही ठराव नसून आम्ही सर्वच ठराव मंजुर करुन प्रशासनाकडे पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. परंतु प्रशासन मात्र हे ठराव अद्यापही प्राप्त न झाल्याचे सांगत आहे. त्यामुळे हे मग हे ठराव गेले कुठे असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे ठराव शिल्लक राहिलेले नाहीत. माझी स्वाक्षरी होऊन ते ठराव पुढे गेले आहेत. - (मीनाक्षी शिंदे - महापौर, ठामपा) 

आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे ठराव शिल्लक नाहीत. आम्ही वेळेत ठराव प्रशासनाकडे पाठविले आहेत. - (नरेश म्हस्के - सभागृह नेते - ठामपा) 

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त