शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

ठाणे महापालिकेत मंजुर झालेले ते ४५ ठराव गेले कुठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 18:06 IST

मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिकेत ठरावांवर चर्चा चांगलीच रंगली असल्याचे दिसत आहे. महापालिकेकडे बोट दाखविणाऱ्या लोकप्रतिनिधींकडूनच सुमापे ४५ ठराव प्रशासनाकडे पाठविले नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा इन्कारमहापौर, सभागृह नेत्यांनीही ठराव नसल्याचे केले स्पष्ट

ठाणे - ठराव मंजुर होत नाहीत, सचिव विभागाकडून ठराव पुढे सरकत नाहीत, असा काहीसा गवगवा मागील कित्येक महिन्यांपासून लोकप्रतिनिधींकडून सुरु आहे. परंतु आता सुमारे ४० ते ४५ ठराव अद्यापही प्रशासनकडे आलेच नसल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात महापौर, सभागृह नेते तसेच विरोधी पक्षनेत्यांनी मात्र आमच्याकडून ठराव पाठविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु ठराव प्रशासनाकडे पोहचलेच नसल्याने ते गेले कुठे असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.             ठाणे महापालिकेची दर महिन्याला २० तारखेला महासभा होत असते. या महासभेत प्रशासनाच्या विविध प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येत असतात. काही प्रस्तावांवर सभागृहात साधकबाधक चर्चा होत असते. त्यानंतर सुचनांसह प्रस्ताव मंजुर केले जातात. काही प्रस्ताव नव्याने सादर करण्यासाठी सांगितले जाते. परंतु असे होऊनही प्रशासनाकडूनच ठरावांची अंमलबजावणी केली जात नाही. काही ठराव शासनाकडे नियोजीत वेळेत पाठविले जात नाहीत. अशी ओरडही महासभेत होतांना दिसून आली आहे.               दरम्यान वारंवार ही ओरड होत असल्याने, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सभागृहाकडून आलेले ठराव मंजुर करुन पुढे पाठविण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पालिकेच्या संबधींत विभागाकूडन त्या सुचनांची अंमलबजावणी देखील करण्यात येत आहे. परंतु मागील तीन महिन्यात झालेल्या महासभेतील सुमारे ४० ते ४५ ठराव हे अद्यापही प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पत्रकारांच्या घरांसह, सीसीटीव्ही, आदींसह काही महत्वांच्या प्रस्तावांचा समावेश असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली. या संदर्भात महापौर, सभागृह नेते तसेच विरोधी पक्षनेते यांच्याशी चर्चा केली असता आमच्याकडे कोणतेही ठराव नसून आम्ही सर्वच ठराव मंजुर करुन प्रशासनाकडे पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. परंतु प्रशासन मात्र हे ठराव अद्यापही प्राप्त न झाल्याचे सांगत आहे. त्यामुळे हे मग हे ठराव गेले कुठे असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे ठराव शिल्लक राहिलेले नाहीत. माझी स्वाक्षरी होऊन ते ठराव पुढे गेले आहेत. - (मीनाक्षी शिंदे - महापौर, ठामपा) 

आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे ठराव शिल्लक नाहीत. आम्ही वेळेत ठराव प्रशासनाकडे पाठविले आहेत. - (नरेश म्हस्के - सभागृह नेते - ठामपा) 

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त