शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Thane: प्रस्तावित टोल दरवाढी विरोधात मनसेचा एल्गार, आनंदनगर प्रवेशद्वारासमोर साखळी आंदोलन

By अजित मांडके | Updated: September 30, 2023 12:45 IST

Thane: ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मुलुंड टोलनाक्यावरील प्रस्तावित टोल दरवाढी विरोधात मनसेने आता एल्गार सुरू केला आहे.

- अजित मांडके ठाणे - ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मुलुंड टोलनाक्यावरील प्रस्तावित टोल दरवाढी विरोधात मनसेने आता एल्गार सुरू केला आहे. मनसेने शनिवारी आनंदनगर प्रवेशद्वारासमोर समोर साखळी आंदोलन करत प्रस्तावित टोल दरवाढ रद्द  करावी अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या प्रश्नी आता मनसेच्या वतीने सलग तीन दिवस आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सध्या स्थितीत रस्त्याची देखभाल करत नसून रस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरण करण्यात आले आहेत. तर एकूण असलेल्या ५५ पूलांपैकी फक्त १३ पूल एमएसआरडीसी प्राधिकरणाच्या वतीने देखभाल केले जाते. त्यामुळे प्राधिकरण जर देखभाल करत नसेल तर त्यांच्यामार्फत टोल वसुल करणे चुकीचे आहे. याचबरोबर ही टोल वसुली गेल्या १३ वर्षांपासून सुरू असून या कालावधीमध्ये वाहनांची प्रचंड संख्या वाढली असून याबाबत अधिकृत आकडेवारी प्राधिकरणाच्यावतीने घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार २० किलोमीटर अंतराच्या कक्षात येणाऱ्या नागिरकांच्या वाहनासाठी टोल सवलत देणे बंधनकारक असून ती दिली जात नाही. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने टोल नाका तसेच पूलांवरील जाहिरातींच्या पैशांची वसुली मोठ्या प्रमाणात केली जात असून त्याची कुठेचे नोंद होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.

या रस्त्यांच्या केलेल्या कामांपैकी बहुतेक काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले असल्याने त्याची वसुली ठाणेकरांकडून करणे अन्यायकार असल्यामुळे  शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली नवीन धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार आनंद नगर येथे प्रस्तावित टोल दरवाढी विरोधात साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहर अध्यक्ष रवींद्र मोरे ,जनहित व विधी विभाग शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर, पुष्कराज विचारे ,सुशांत सूर्यराव, दिनकर फुल्सुंदर,समीक्षा मार्कंडेय यांच्यासह ठाणेकर नागरिकांनी या जाचक टोलवाढीतून सुटका मिळावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जन आंदोलन उभारण्यात आले आहे. या साखळी उपोषणाद्वारे या आंदोलनाची सुरूवात झाली असून सलग तीन दिवस हे आंदोलन करण्यात येणार आहे. टोलमुक्तीचे केवळ आश्वासन – गेल्या दहा वर्षापासून एमएसआरडीसी तसेच एमएमआरडीए दोन्ही प्राधिकरण मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत आहेत. तरीही ठाणेकरांना साधी टोल सवलत देखील देण्यात आलेली नाही. २०१४ ला मुख्यमंत्री यांनी ठाणेकर नागरिकांना टोल मुक्तीचे आश्वासन दिले होते, पण अद्यापही त्याची अमंलबजावणी झालेली नाही. सत्तेत नसताना टोलच्या वसुलीमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली त्याची पुढे काय कारवाई झाली याबाबतची माहितीही लोकांपर्यंत पोहचलेली नाही.

रविवारी होणार ठाणे शहरात चौक आंदोलन:प्रस्तावित टोल दरवाढी विरोधात पुढच्या टप्प्यात म्हणजेच रविवारी ठाणे शहरातील विविध चौकांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत ही टोल दरवाढ रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे मनसेचे अविनाश जाधव  यांनी सांगितले

टॅग्स :thaneठाणे