शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
3
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
4
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
5
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
6
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
7
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
8
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
9
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
10
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
12
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
13
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
14
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
15
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
16
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
17
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
18
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
19
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन

ठाणे मेट्रोचे कारशेड गायमुखला!

By admin | Updated: July 3, 2017 06:31 IST

घोडबंदर भागातील मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावर अद्याप कोणताच तोडगा न निघाल्याने अखेर ती कारशेडच हलवण्याचा निर्णय एमएमआरडीएने

अजित मांडके/लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घोडबंदर भागातील मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावर अद्याप कोणताच तोडगा न निघाल्याने अखेर ती कारशेडच हलवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. गायमुख येथे प्रस्तावित असलेल्या चौपाटीजवळच पालिकेच्या आणि काही खाजगी भूखंडांच्या आरक्षित जागेवर नवी कारशेड उभी राहील. या जागेची नुकतीच पाहणी झाली आहे. भविष्यात मीरा रोड, दहिसरपर्यंत मेट्रो न्यायची झाल्यास नवी कारशेड उपयुक्त ठरेल, असे एमएमआरडीएचे मत पडले असून त्यासाठी लवकरच या जागेचा सर्व्हे केला जाणार आहे.यापूर्वीच कारशेडसाठी घोडबंदर भागातील कासारवडवली येथील ४० हेक्टर जमीन संपादित करण्याचा निर्णय झाला होता. स्थानिकांना विश्वासात घेऊन ही जमीन संपादित करून तसा ठराव पालिकेने अंतिम मंजुरीसाठी एमएमआरडीएकडे पाठवावा, असा निर्णय जुलै २०१४ मध्ये झाला होता. महापालिकेने येथील कारशेडची जागा आरक्षित करण्यासाठी हिरवा कंदील दिला असला, तरी यापैकी १० हेक्टर जागा शहरांतर्गत प्रस्तावित असलेल्या मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमच्या कारशेडसाठी मिळावी, असा ठराव केला होता. तो शासनपातळीवर गेल्यानंतर एमएमआरडीएने त्याला विरोध दर्शवून तेथील संपूर्ण जागेची मागणी केली होती. जागा ४० हेक्टर असली तरीदेखील प्रत्यक्षात किती जागेची गरज आहे, किती जण बाधित होणार आहेत, आदिवासींची जागा घेणे शक्य आहे का? या सर्वच बाबींचा विचार झाला होता. नंतर तेथील सर्व्हेही पूर्ण करण्यात आला. सर्व्हेच्या दिवशी काही शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यात साधारणत: २० ते २५ शेतकरी बाधित होणार होते. पण त्यांचा विरोध डावलून सर्व्हे पूर्ण करण्यात आला. परंतु, त्यानंतर राष्ट्रवादीने थेट कारशेडची जागाच बदलावी, अशी मागणी केली होती.आता त्या कारशेडच्या जागेचा प्रस्ताव बासनात गुंडाळणार असल्याची माहिती समोर आली आहे. गायमुख येथील प्रस्तावित चौपाटीजवळच नवे कारशेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून या जागेसाठी एमएमआरडीएने पालिकेला पत्र दिले आहे. या जागेची संयुक्त पाहणीदेखील करण्यात आली आहे, तेथील काही जागा पालिकेची आणि काही खाजगी आहे. तसेच पालिकेच्या एचटीपी प्लांटचीही जागा आहे. परंतु, हा प्लांट येथेच राहणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. एमएमआरडीएची मिळाली पसंतीपाहणीनंतर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी या जागेला पसंती दिली असून या जागेवर कोणत्याही प्रकारे नव्या इमारतींना परवानगी देऊ नये, अशा आशयाचे पत्र दिले आहे. तशी खबरदारी पालिकेने घेतल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.