शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

ठाणे मेट्रोचे कारशेड गायमुखला!

By admin | Updated: July 3, 2017 06:31 IST

घोडबंदर भागातील मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावर अद्याप कोणताच तोडगा न निघाल्याने अखेर ती कारशेडच हलवण्याचा निर्णय एमएमआरडीएने

अजित मांडके/लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घोडबंदर भागातील मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावर अद्याप कोणताच तोडगा न निघाल्याने अखेर ती कारशेडच हलवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. गायमुख येथे प्रस्तावित असलेल्या चौपाटीजवळच पालिकेच्या आणि काही खाजगी भूखंडांच्या आरक्षित जागेवर नवी कारशेड उभी राहील. या जागेची नुकतीच पाहणी झाली आहे. भविष्यात मीरा रोड, दहिसरपर्यंत मेट्रो न्यायची झाल्यास नवी कारशेड उपयुक्त ठरेल, असे एमएमआरडीएचे मत पडले असून त्यासाठी लवकरच या जागेचा सर्व्हे केला जाणार आहे.यापूर्वीच कारशेडसाठी घोडबंदर भागातील कासारवडवली येथील ४० हेक्टर जमीन संपादित करण्याचा निर्णय झाला होता. स्थानिकांना विश्वासात घेऊन ही जमीन संपादित करून तसा ठराव पालिकेने अंतिम मंजुरीसाठी एमएमआरडीएकडे पाठवावा, असा निर्णय जुलै २०१४ मध्ये झाला होता. महापालिकेने येथील कारशेडची जागा आरक्षित करण्यासाठी हिरवा कंदील दिला असला, तरी यापैकी १० हेक्टर जागा शहरांतर्गत प्रस्तावित असलेल्या मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमच्या कारशेडसाठी मिळावी, असा ठराव केला होता. तो शासनपातळीवर गेल्यानंतर एमएमआरडीएने त्याला विरोध दर्शवून तेथील संपूर्ण जागेची मागणी केली होती. जागा ४० हेक्टर असली तरीदेखील प्रत्यक्षात किती जागेची गरज आहे, किती जण बाधित होणार आहेत, आदिवासींची जागा घेणे शक्य आहे का? या सर्वच बाबींचा विचार झाला होता. नंतर तेथील सर्व्हेही पूर्ण करण्यात आला. सर्व्हेच्या दिवशी काही शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यात साधारणत: २० ते २५ शेतकरी बाधित होणार होते. पण त्यांचा विरोध डावलून सर्व्हे पूर्ण करण्यात आला. परंतु, त्यानंतर राष्ट्रवादीने थेट कारशेडची जागाच बदलावी, अशी मागणी केली होती.आता त्या कारशेडच्या जागेचा प्रस्ताव बासनात गुंडाळणार असल्याची माहिती समोर आली आहे. गायमुख येथील प्रस्तावित चौपाटीजवळच नवे कारशेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून या जागेसाठी एमएमआरडीएने पालिकेला पत्र दिले आहे. या जागेची संयुक्त पाहणीदेखील करण्यात आली आहे, तेथील काही जागा पालिकेची आणि काही खाजगी आहे. तसेच पालिकेच्या एचटीपी प्लांटचीही जागा आहे. परंतु, हा प्लांट येथेच राहणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. एमएमआरडीएची मिळाली पसंतीपाहणीनंतर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी या जागेला पसंती दिली असून या जागेवर कोणत्याही प्रकारे नव्या इमारतींना परवानगी देऊ नये, अशा आशयाचे पत्र दिले आहे. तशी खबरदारी पालिकेने घेतल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.