शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

लाचखोरीत ठाणे आघाडीवर

By admin | Updated: November 30, 2015 02:19 IST

या वर्षातील ठाणे लाचलुचपत विभागाने (एसीबी) लावलेल्या १३१ सापळ्यांत १८१ जणांना जेरबंद करण्यात आले असून त्यामध्ये २३ खाजगी व्यक्तींचा समावेश आहे

ठाणे : या वर्षातील ठाणे लाचलुचपत विभागाने (एसीबी) लावलेल्या १३१ सापळ्यांत १८१ जणांना जेरबंद करण्यात आले असून त्यामध्ये २३ खाजगी व्यक्तींचा समावेश आहे. तर इतरांवर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस खात्यातील पोलिसांनाच अटक होणाऱ्या लोकसेवकांमध्ये आघाडी कायम ठेवली आहे. ठाणे परिक्षेत्रातील सहा युनिटमध्ये ठाण्याने आघाडी घेतली आहे. तेथे सर्वाधिक ५६ गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यक्षेत्रात ठाणे शहर-ग्रामीण, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर पालघर हे नवे युनिट तयार करण्यात आले आहे. याचदरम्यान, २०१५ या वर्षात एसीबीकडे आलेल्या तक्रारीवरून शासननिर्मित ३९ विभागांतील १३१ सापळे लावण्यात आले. त्याचमध्ये लोकसेवकांसह खाजगी व्यक्तीही रंगेहाथ पकडल्या गेल्या आहेत.२०१४ या वर्षाप्रमाणेच २०१५ च्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्गात कारवाई केली. त्या वेळी वेंगुर्ला पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकाऱ्याला पक डण्यात आले. २०१५ च्या जानेवारी -२२ नोव्हेंबर या अकरा महिन्यांत एकूण १३१ सापळे लावून १५८ लोकसेवकांना अटक केली. त्या केलेल्या कारवाईत १८ लाखांची सर्वाधिक तर ३० रुपयांची सर्वात कमी लाच मागणाऱ्यांना जेलमध्ये जाण्याची वेळी ओढवली आहे. जानेवारीत ४ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या पनवेल येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला पकडले. तसेच ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तीन पोलिसांना अटक केली. त्यातील एका शिपायाकडे करोडो रुपयांचा ऐवज निदर्शनास आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचबरोबर बदलीसाठी सर्वाधिक १८ लाखांची मागणी करणे ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकासह निरीक्षकाच्या हाती बेड्या पडल्या आहेत. तर जिल्हा परिषद (ग्रामीण) पाणीपुरवठा अधीक्षक अभियंत्यासह कनिष्ठ अभियंत्याला लाचप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यावेळी त्यांच्याकडून १९ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली होती. शासननिर्मित खात्यात काम करणारे लोकसेवक श्रेणीनिहाय पाहिल्यास क्लास वन श्रेणीत २०, क्लास टूमध्ये २६ आणि क्लास थ्रीमध्ये ९५ जणांचा समावेश आहे. अशा घटना या वर्षी जास्त प्रमाणात उघडकीस येणे म्हणजे नागरिकांमध्ये जागृती वाढल्याचे दिसते. तसेच एसीबी विभागाने वेळोवेळी घेतलेल्या मोहिमांचा हा प्रतिसादच असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)