शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

लाचखोरीत ठाणे आघाडीवर

By admin | Updated: November 30, 2015 02:19 IST

या वर्षातील ठाणे लाचलुचपत विभागाने (एसीबी) लावलेल्या १३१ सापळ्यांत १८१ जणांना जेरबंद करण्यात आले असून त्यामध्ये २३ खाजगी व्यक्तींचा समावेश आहे

ठाणे : या वर्षातील ठाणे लाचलुचपत विभागाने (एसीबी) लावलेल्या १३१ सापळ्यांत १८१ जणांना जेरबंद करण्यात आले असून त्यामध्ये २३ खाजगी व्यक्तींचा समावेश आहे. तर इतरांवर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस खात्यातील पोलिसांनाच अटक होणाऱ्या लोकसेवकांमध्ये आघाडी कायम ठेवली आहे. ठाणे परिक्षेत्रातील सहा युनिटमध्ये ठाण्याने आघाडी घेतली आहे. तेथे सर्वाधिक ५६ गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यक्षेत्रात ठाणे शहर-ग्रामीण, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर पालघर हे नवे युनिट तयार करण्यात आले आहे. याचदरम्यान, २०१५ या वर्षात एसीबीकडे आलेल्या तक्रारीवरून शासननिर्मित ३९ विभागांतील १३१ सापळे लावण्यात आले. त्याचमध्ये लोकसेवकांसह खाजगी व्यक्तीही रंगेहाथ पकडल्या गेल्या आहेत.२०१४ या वर्षाप्रमाणेच २०१५ च्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्गात कारवाई केली. त्या वेळी वेंगुर्ला पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकाऱ्याला पक डण्यात आले. २०१५ च्या जानेवारी -२२ नोव्हेंबर या अकरा महिन्यांत एकूण १३१ सापळे लावून १५८ लोकसेवकांना अटक केली. त्या केलेल्या कारवाईत १८ लाखांची सर्वाधिक तर ३० रुपयांची सर्वात कमी लाच मागणाऱ्यांना जेलमध्ये जाण्याची वेळी ओढवली आहे. जानेवारीत ४ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या पनवेल येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला पकडले. तसेच ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तीन पोलिसांना अटक केली. त्यातील एका शिपायाकडे करोडो रुपयांचा ऐवज निदर्शनास आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचबरोबर बदलीसाठी सर्वाधिक १८ लाखांची मागणी करणे ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकासह निरीक्षकाच्या हाती बेड्या पडल्या आहेत. तर जिल्हा परिषद (ग्रामीण) पाणीपुरवठा अधीक्षक अभियंत्यासह कनिष्ठ अभियंत्याला लाचप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यावेळी त्यांच्याकडून १९ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली होती. शासननिर्मित खात्यात काम करणारे लोकसेवक श्रेणीनिहाय पाहिल्यास क्लास वन श्रेणीत २०, क्लास टूमध्ये २६ आणि क्लास थ्रीमध्ये ९५ जणांचा समावेश आहे. अशा घटना या वर्षी जास्त प्रमाणात उघडकीस येणे म्हणजे नागरिकांमध्ये जागृती वाढल्याचे दिसते. तसेच एसीबी विभागाने वेळोवेळी घेतलेल्या मोहिमांचा हा प्रतिसादच असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)