शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

रुग्णालयात सायंकाळी ५.४५ ते सकाळी ७.४० पर्यंत मृत्यूचे तांडव; असा आहे घटनाक्रम

By जितेंद्र कालेकर | Updated: August 14, 2023 06:05 IST

अवघ्या काही तासांतच हे मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. 

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शनिवारी सायंकाळी ५:४५ ते रविवारी सकाळी ७:४० वाजेपर्यंत एकामागून एक असे वेगवेगळ्या कारणांमुळे १८ जणांचे मृत्यू झाले. अवघ्या काही तासांतच हे मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. 

मंत्र्यांसह ठाण्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी रुग्णालयात धाव घेत प्रशासनाला जाब विचारला. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील रुग्णालयात वाॅर्ड फुल्ल झाल्यानंतर  अक्षरश: वॉर्डाबाहेर अशा खाटा टाकून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

असा आहे घटनाक्रम

- सायं. ५:४५ वा. : ताप व श्वासाचा त्रास होणारे कोपरीचे सुनील पाटील (५५) यांचा पहिला मृत्यू झाला. - रात्री ९:४० वा. : ९ ऑगस्टला दाखल झालेल्या भानुमती पाढी या ८३ वर्षीय वृद्धेचा युरिनरी इन्फेक्शनमुळे दुसरा मृत्यू झाला. - रात्री १०:४५ वा. : ७ ऑगस्टला शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या गीता यांचा तिसरा मृत्यू झाला. - रात्री १०:३० वा. : १२ ऑगस्टला ताप, श्वासोच्छश्वासाच्या त्रासामुळे आलेल्या भास्कर चाबूकस्वार (३३) यांचा रात्री ११:१५ वाजता मृत्यू झाला. - मध्यरात्री १२:५५ वा. : रॉकेल पिल्यामुळे चेतक गोडे हा चार वर्षीय बालक शहापूरमधून दाखल झाला होता. त्याचा मृत्यू झाला. - मध्यरात्री १:१५ वा. : ९ ऑगस्ट रोजी कल्याणच्या रस्ते अपघातात श्वासोच्छवासाचा त्रास झाल्यामुळे दाखल ललिताबाई चव्हाण (४२) यांचा सहावा मृत्यू झाला. - पहाटे २:५३ वा. : १२ ऑगस्टला बेशद्धावस्थेत श्वासाच्या त्रासाने दाखल झालेल्या उल्हासनगरच्या अशोक जयस्वाल (५३) यांचा आठवा मृत्यू झाला. - पहाटे २:५६ वा. :  ताराबाई गगे (५६) यांचा नववा मृत्यू झाला. - पहाटे २:५७ वा. : भिवंडीच्या अमरीन अन्सारी (३३) यांचा दहावा मृत्यू झाला. - पहाटे ३:१५ वा. : वागळे इस्टेटच्या सुनीता इंदुलकर (७०) यांचा अकरावा मृत्यू झाला. - पहाटे ३:२६ वा. : नूरजहॉं खान (६०, साकीनाका, मुंबई) यांचा बारावा मृत्यू झाला. - पहाटे ३:३० वा. : एकाचवेळी सनदी मो. हुसैन (६६), निनाद लोकुर (५२), अब्दुल खान (५८, गोवंडी) या ताप आणि श्वासाच्या रुग्णाचा, कल्पना हुमणे (६५, शहापूर) या अपघातातील जखमी महिलेचा अशा चौघांचा मृत्यू ओढवला. - पहाटे ४ वा. : निमोनियाचे रुग्ण भगवान पोतदार (६५, उपवन, ठाणे) यांचा सतरावा मृत्यू झाला. - सकाळी ७:४० वा. : अशोक निचाल (८१) यांचा अठरावा मृत्यू झाला.

 

टॅग्स :kalwaकळवाhospitalहॉस्पिटल