शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रुग्णालयात सायंकाळी ५.४५ ते सकाळी ७.४० पर्यंत मृत्यूचे तांडव; असा आहे घटनाक्रम

By जितेंद्र कालेकर | Updated: August 14, 2023 06:05 IST

अवघ्या काही तासांतच हे मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. 

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शनिवारी सायंकाळी ५:४५ ते रविवारी सकाळी ७:४० वाजेपर्यंत एकामागून एक असे वेगवेगळ्या कारणांमुळे १८ जणांचे मृत्यू झाले. अवघ्या काही तासांतच हे मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. 

मंत्र्यांसह ठाण्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी रुग्णालयात धाव घेत प्रशासनाला जाब विचारला. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील रुग्णालयात वाॅर्ड फुल्ल झाल्यानंतर  अक्षरश: वॉर्डाबाहेर अशा खाटा टाकून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

असा आहे घटनाक्रम

- सायं. ५:४५ वा. : ताप व श्वासाचा त्रास होणारे कोपरीचे सुनील पाटील (५५) यांचा पहिला मृत्यू झाला. - रात्री ९:४० वा. : ९ ऑगस्टला दाखल झालेल्या भानुमती पाढी या ८३ वर्षीय वृद्धेचा युरिनरी इन्फेक्शनमुळे दुसरा मृत्यू झाला. - रात्री १०:४५ वा. : ७ ऑगस्टला शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या गीता यांचा तिसरा मृत्यू झाला. - रात्री १०:३० वा. : १२ ऑगस्टला ताप, श्वासोच्छश्वासाच्या त्रासामुळे आलेल्या भास्कर चाबूकस्वार (३३) यांचा रात्री ११:१५ वाजता मृत्यू झाला. - मध्यरात्री १२:५५ वा. : रॉकेल पिल्यामुळे चेतक गोडे हा चार वर्षीय बालक शहापूरमधून दाखल झाला होता. त्याचा मृत्यू झाला. - मध्यरात्री १:१५ वा. : ९ ऑगस्ट रोजी कल्याणच्या रस्ते अपघातात श्वासोच्छवासाचा त्रास झाल्यामुळे दाखल ललिताबाई चव्हाण (४२) यांचा सहावा मृत्यू झाला. - पहाटे २:५३ वा. : १२ ऑगस्टला बेशद्धावस्थेत श्वासाच्या त्रासाने दाखल झालेल्या उल्हासनगरच्या अशोक जयस्वाल (५३) यांचा आठवा मृत्यू झाला. - पहाटे २:५६ वा. :  ताराबाई गगे (५६) यांचा नववा मृत्यू झाला. - पहाटे २:५७ वा. : भिवंडीच्या अमरीन अन्सारी (३३) यांचा दहावा मृत्यू झाला. - पहाटे ३:१५ वा. : वागळे इस्टेटच्या सुनीता इंदुलकर (७०) यांचा अकरावा मृत्यू झाला. - पहाटे ३:२६ वा. : नूरजहॉं खान (६०, साकीनाका, मुंबई) यांचा बारावा मृत्यू झाला. - पहाटे ३:३० वा. : एकाचवेळी सनदी मो. हुसैन (६६), निनाद लोकुर (५२), अब्दुल खान (५८, गोवंडी) या ताप आणि श्वासाच्या रुग्णाचा, कल्पना हुमणे (६५, शहापूर) या अपघातातील जखमी महिलेचा अशा चौघांचा मृत्यू ओढवला. - पहाटे ४ वा. : निमोनियाचे रुग्ण भगवान पोतदार (६५, उपवन, ठाणे) यांचा सतरावा मृत्यू झाला. - सकाळी ७:४० वा. : अशोक निचाल (८१) यांचा अठरावा मृत्यू झाला.

 

टॅग्स :kalwaकळवाhospitalहॉस्पिटल