शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

ठाण्यातील आगीच्या घटनांत घट

By admin | Updated: November 24, 2015 01:47 IST

ठाणे महापालिका हद्दीत दिवाळीच्या चार दिवसांत विविध ठिकाणी ३३ आगीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र झाली आहे.

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत दिवाळीच्या चार दिवसांत विविध ठिकाणी ३३ आगीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत यंदा आगीच्या ३०२ घटना घडल्या आहेत. मागील वर्षी हेच प्रमाण ३१७ एवढे होते. परंतु, पालिका आणि अग्निशमन विभागाने केलेल्या विविध उपायांमुळे का होईना यंदा आग लागण्याच्या प्रमाणात काही अंशी घट झाली आहे.सहा वर्षांपूर्वी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वर्तकनगर येथील तारांगण सोसायटीमधील पुनर्वसू या इमारत क्रमांक १० मधील १४ व्या मजल्याला लागलेल्या आगीत अग्निशमन विभागाचे सहा जवान शहीद झाले होते. त्यानंतर, ठाणे महापालिका खडबडून जागी झाली होती. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच जनजागृती आणि मॉकड्रीलच्या माध्यमातून अग्निशमन विभागाने ठाणेकरांना जागरूक करण्याचे काम केले आहे.यंदा दिवाळीच्या काळात एखादी आगीची घटना घडली तरी त्यासाठी सात ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात अग्निशमन केंद्र उभारले होते. यंदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १० नोव्हेंबरला शहरात आगीची केवळ एकच घटना घडली. तर, दुसऱ्या दिवशी १६ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या. तिसऱ्या दिवशी ९ आणि चौथ्या दिवशी ५ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीत शहरात आगीच्या ३१७ घटना घडल्या होत्या. तर, यंदा याच कालावधीत ३०२ घटना घडल्या आहेत. यासंदर्भात अग्निशमन विभागाशी संपर्क साधला असता आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाय, जनजागृतीचे कार्यक्रम, मॉकड्रील आणि त्यामध्येही नागरिकांचा सहभाग, याशिवाय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी केले जात असलेले प्रशिक्षण आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यामार्फत वारंवार केले जात असलेले मार्गदर्शन यामुळे शहरात यंदा आगीच्या घटनांवर आळा बसविण्यात यश आल्याचा दावा अग्निशमन विभागाचे प्रमुख अरविंद मांडके यांनी केला आहे.(प्रतिनिधी)