शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

ठाण्यातील आगीच्या घटनांत घट

By admin | Updated: November 24, 2015 01:47 IST

ठाणे महापालिका हद्दीत दिवाळीच्या चार दिवसांत विविध ठिकाणी ३३ आगीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र झाली आहे.

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत दिवाळीच्या चार दिवसांत विविध ठिकाणी ३३ आगीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत यंदा आगीच्या ३०२ घटना घडल्या आहेत. मागील वर्षी हेच प्रमाण ३१७ एवढे होते. परंतु, पालिका आणि अग्निशमन विभागाने केलेल्या विविध उपायांमुळे का होईना यंदा आग लागण्याच्या प्रमाणात काही अंशी घट झाली आहे.सहा वर्षांपूर्वी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वर्तकनगर येथील तारांगण सोसायटीमधील पुनर्वसू या इमारत क्रमांक १० मधील १४ व्या मजल्याला लागलेल्या आगीत अग्निशमन विभागाचे सहा जवान शहीद झाले होते. त्यानंतर, ठाणे महापालिका खडबडून जागी झाली होती. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच जनजागृती आणि मॉकड्रीलच्या माध्यमातून अग्निशमन विभागाने ठाणेकरांना जागरूक करण्याचे काम केले आहे.यंदा दिवाळीच्या काळात एखादी आगीची घटना घडली तरी त्यासाठी सात ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात अग्निशमन केंद्र उभारले होते. यंदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १० नोव्हेंबरला शहरात आगीची केवळ एकच घटना घडली. तर, दुसऱ्या दिवशी १६ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या. तिसऱ्या दिवशी ९ आणि चौथ्या दिवशी ५ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीत शहरात आगीच्या ३१७ घटना घडल्या होत्या. तर, यंदा याच कालावधीत ३०२ घटना घडल्या आहेत. यासंदर्भात अग्निशमन विभागाशी संपर्क साधला असता आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाय, जनजागृतीचे कार्यक्रम, मॉकड्रील आणि त्यामध्येही नागरिकांचा सहभाग, याशिवाय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी केले जात असलेले प्रशिक्षण आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यामार्फत वारंवार केले जात असलेले मार्गदर्शन यामुळे शहरात यंदा आगीच्या घटनांवर आळा बसविण्यात यश आल्याचा दावा अग्निशमन विभागाचे प्रमुख अरविंद मांडके यांनी केला आहे.(प्रतिनिधी)