शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील आगीच्या घटनांत घट

By admin | Updated: November 24, 2015 01:47 IST

ठाणे महापालिका हद्दीत दिवाळीच्या चार दिवसांत विविध ठिकाणी ३३ आगीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र झाली आहे.

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत दिवाळीच्या चार दिवसांत विविध ठिकाणी ३३ आगीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत यंदा आगीच्या ३०२ घटना घडल्या आहेत. मागील वर्षी हेच प्रमाण ३१७ एवढे होते. परंतु, पालिका आणि अग्निशमन विभागाने केलेल्या विविध उपायांमुळे का होईना यंदा आग लागण्याच्या प्रमाणात काही अंशी घट झाली आहे.सहा वर्षांपूर्वी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वर्तकनगर येथील तारांगण सोसायटीमधील पुनर्वसू या इमारत क्रमांक १० मधील १४ व्या मजल्याला लागलेल्या आगीत अग्निशमन विभागाचे सहा जवान शहीद झाले होते. त्यानंतर, ठाणे महापालिका खडबडून जागी झाली होती. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच जनजागृती आणि मॉकड्रीलच्या माध्यमातून अग्निशमन विभागाने ठाणेकरांना जागरूक करण्याचे काम केले आहे.यंदा दिवाळीच्या काळात एखादी आगीची घटना घडली तरी त्यासाठी सात ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात अग्निशमन केंद्र उभारले होते. यंदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १० नोव्हेंबरला शहरात आगीची केवळ एकच घटना घडली. तर, दुसऱ्या दिवशी १६ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या. तिसऱ्या दिवशी ९ आणि चौथ्या दिवशी ५ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीत शहरात आगीच्या ३१७ घटना घडल्या होत्या. तर, यंदा याच कालावधीत ३०२ घटना घडल्या आहेत. यासंदर्भात अग्निशमन विभागाशी संपर्क साधला असता आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाय, जनजागृतीचे कार्यक्रम, मॉकड्रील आणि त्यामध्येही नागरिकांचा सहभाग, याशिवाय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी केले जात असलेले प्रशिक्षण आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यामार्फत वारंवार केले जात असलेले मार्गदर्शन यामुळे शहरात यंदा आगीच्या घटनांवर आळा बसविण्यात यश आल्याचा दावा अग्निशमन विभागाचे प्रमुख अरविंद मांडके यांनी केला आहे.(प्रतिनिधी)